शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्ह्याला पावसाने झोडपले

By admin | Updated: October 8, 2014 00:29 IST

खरीप पिकांचे मोठे नुकसान : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळले

कोल्हापूर : परतीच्या पावसाने आज, सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. धुवाधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तासभर शहरातील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. पावसाच्या सरी इतक्या वेगात होत्या की, वाहनांना दोन फुटांवरील काही दिसत नव्हते. या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या मुसळधार वळीव पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महार्गावरील वडणगे फाट्याजवळील झाड रस्त्यावर कोसळले. वाहतूक मार्गावर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती. स्थानिक नागरिक, वाहनधारक व करवीर पोलिसांनी कोसळलेले झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. २७ सप्टेंबरला सूर्याने ‘हस्त’ नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचे वाहन ‘बेडूक’ असल्याने जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे रोज जिल्ह्यात कुठे ना कुठे धुवाधार पाऊस सुरू आहे. सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवतो, दुपारी तर अंगाची लाही-लाही होते. ‘आॅक्टोबर हिट’चा तडाखा दिवसभर नागरिकांना सहन करावा लागत आहे, पण सायंकाळी जोरदार पाऊस होत असल्याने हवेत गारवा जाणवतो. आज सायंकाळी सात वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या धुवाधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या सरींचा वेग इतका प्रचंड होता की, वाहनचालकांना दोन फुटांवरील दिसत नव्हते. शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी पसरले होते. अनेक ठिकाणी सखल भागांतील गटर्समध्ये पाणी न बसल्याने रस्ते जलमय झाले होते. ग्रामीण भागात सध्या सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. भात, भुईमूग काढणीला आलेले आहेत. एक दिवस आडाने पाऊस ग्रामीण भागात सुरू असल्याने भातकापणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काढणीला आलेले भात कापले नाही तर पावसाने ते भुईसपाट होत आहे. जमिनीवर भात पडल्याने चार दिवसांत त्याला मोड येण्यास सुरुवात होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी भुईमूगाच्या शेंगांना मोड आलेत.