शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

कोल्हापूर : पोलीस नाईक सुनिल पाटीलचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 16:42 IST

गेली सात दिवस मृत्यूशी झुंझ देणाऱ्या इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे मृत्यू झाला.

ठळक मुद्देअंत्यसंस्कारावेळी भडाअग्नी देण्यास मुलग्याची मानसिक्ता नव्हतीअंत्यसंस्कारावेळी भडाअग्नी देण्यास मुलग्याची मानसिक्ता नव्हती

कोल्हापूर : गेली सात दिवस मृत्यूशी झुंझ देणाऱ्या इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे मृत्यू झाला. सुनील शामराव पाटील (वय ४२, रा. जवाहरनगर चौक, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.

प्रेमप्रकरणाच्या त्रिकोणातून त्यांनी विष प्राशन केले होते. अधिक माहिती अशी, सुनील पाटील हे इचलकरंजी-शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलीस नाईक पदावर कार्यरत असून हजेरी मास्तरची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २४ सप्टेंबरला दुपारी ते शास्त्रीनगर येथील बुद्धगार्डनमध्ये बेशुद्धावस्थेत नागरिकांना मिळून आले होते. शास्त्रीनगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या त्रासाला की कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, याची चौकशी राजारामपुरी पोलीस करीत आहेत. ते यापूर्वी लक्ष्मीपुरी, गांधीनगर पोलीस ठाण्यात काम करीत होते. गांधीनगर पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून नोकरीवर असताना तेथील दोन महिला कॉन्स्टेबलशी त्यांची मैत्री झाली. त्यातून त्यांचे दोघीसोबत प्रेमसंबध जुळले. त्या दोघींकडून त्यांना वारंवार ब्लॅकमेल केले जात होते, अशी पोलीस दलात चर्चा आहे.

सुनिल पाटील यांचे वडील पोलीस दलात होते. त्यांच्या निधनानंतर ते अनुकंपाखाली पोलीस दलात भरती झाले. सुमारे चौदा वर्ष त्यांची सेवा झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.अंत्यंस्कारसुनिल पाटील यांचा मुलगा अकरावीचे शिक्षण घेतो. वडीलांच्यामुळे या कुटूंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांनी या प्रेमाच्या त्रिकोणात अडकल्याने कुटूंबाकडे दूर्लक्ष केले होते. त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारावेळी भडाअग्नी देण्यास मुलग्याची मानसिक्ता नव्हती. अखेर नातेवाईकांनी समजूत घालून त्याला अंतसंस्कार पूर्ण करण्यास लावले.

दोन्ही महिला कॉन्स्टेल त्याच्या घरी व पोलीस ठाण्यात येवून सुनील पाटील यांना धमक्या देत होत्या. तुझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन तुझे आयुष्य रस्त्यावर आणीन अशा धमक्या वारंवार दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा पोलीस दलात आहे.