शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पोलीस नाईक सुनिल पाटीलचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 16:42 IST

गेली सात दिवस मृत्यूशी झुंझ देणाऱ्या इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे मृत्यू झाला.

ठळक मुद्देअंत्यसंस्कारावेळी भडाअग्नी देण्यास मुलग्याची मानसिक्ता नव्हतीअंत्यसंस्कारावेळी भडाअग्नी देण्यास मुलग्याची मानसिक्ता नव्हती

कोल्हापूर : गेली सात दिवस मृत्यूशी झुंझ देणाऱ्या इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकचा अखेर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे मृत्यू झाला. सुनील शामराव पाटील (वय ४२, रा. जवाहरनगर चौक, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.

प्रेमप्रकरणाच्या त्रिकोणातून त्यांनी विष प्राशन केले होते. अधिक माहिती अशी, सुनील पाटील हे इचलकरंजी-शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून पोलीस नाईक पदावर कार्यरत असून हजेरी मास्तरची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २४ सप्टेंबरला दुपारी ते शास्त्रीनगर येथील बुद्धगार्डनमध्ये बेशुद्धावस्थेत नागरिकांना मिळून आले होते. शास्त्रीनगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या त्रासाला की कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, याची चौकशी राजारामपुरी पोलीस करीत आहेत. ते यापूर्वी लक्ष्मीपुरी, गांधीनगर पोलीस ठाण्यात काम करीत होते. गांधीनगर पोलीस ठाण्यात हजेरी मास्तर म्हणून नोकरीवर असताना तेथील दोन महिला कॉन्स्टेबलशी त्यांची मैत्री झाली. त्यातून त्यांचे दोघीसोबत प्रेमसंबध जुळले. त्या दोघींकडून त्यांना वारंवार ब्लॅकमेल केले जात होते, अशी पोलीस दलात चर्चा आहे.

सुनिल पाटील यांचे वडील पोलीस दलात होते. त्यांच्या निधनानंतर ते अनुकंपाखाली पोलीस दलात भरती झाले. सुमारे चौदा वर्ष त्यांची सेवा झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.अंत्यंस्कारसुनिल पाटील यांचा मुलगा अकरावीचे शिक्षण घेतो. वडीलांच्यामुळे या कुटूंबियांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यांनी या प्रेमाच्या त्रिकोणात अडकल्याने कुटूंबाकडे दूर्लक्ष केले होते. त्यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कारावेळी भडाअग्नी देण्यास मुलग्याची मानसिक्ता नव्हती. अखेर नातेवाईकांनी समजूत घालून त्याला अंतसंस्कार पूर्ण करण्यास लावले.

दोन्ही महिला कॉन्स्टेल त्याच्या घरी व पोलीस ठाण्यात येवून सुनील पाटील यांना धमक्या देत होत्या. तुझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन तुझे आयुष्य रस्त्यावर आणीन अशा धमक्या वारंवार दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा पोलीस दलात आहे.