शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कोल्हापूर ‘ड’ वर्गातच

By admin | Updated: September 3, 2014 00:16 IST

नेत्यांनीच केला घात : कोट्यवधींच्या निधीला शहर मुकले

कोल्हापूर : शासनाने राज्यातील महापालिकांची वर्गवारी काल, सोमवारी जाहीर केली. अपेक्षित दरडोई उत्पन्न असूनही निव्वळ लोकसंख्येच्या निकषांस पात्र न ठरल्याने कोल्हापूरची महापालिका ‘ड’ वर्गातच राहिली आहे. लोकसंख्येचा निकष व वर्गवारीनुसारच राज्य व केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता होत असते. हद्दवाढीला राजकीय कारणास्तव ‘खो’ घातल्यानेच महापालिके ची वर्गवारी वाढू शकली नाही. शहर विकासाचा बळी नेत्यांनीच घेतल्याची चर्चा आहे.कोल्हापूर शहराची २०११ च्या जनगणनेसुसार पाच लाख ४९ हजार २८३ इतकी लोकसंख्या आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न एक लाख एक हजार ६२८ इतके आहे. मात्र, दहा लाख लोकसंख्येचा निकष पूर्ण करू न शकल्याने केंदाच्या जवाहरलाल नेहरू नागरी विकास योजनेअंतर्गत हजारो कोटींचा निधी मिळविण्यास शहर अपात्र ठरत आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात राजकीय अपरिपक्वता सिद्ध होत असतानाच, दुसऱ्या बाजूला हद्दवाढ करून विशेष बाब म्हणून कोट्यवधींचा निधी आणण्याची संधीही राज्यकर्त्यांनी सोईच्या राजकारणासाठी घालविली. महापालिका ‘ड’ वर्गातच राहिल्याने केंद्र व राज्यांकडून मिळणाऱ्या अनेक योजनांच्या निधीसाठी वंचितच राहावे लागणार आहे. नाशिक व नागपूर महापालिकांना वर्गवारीत शासनाने विशेष बाब म्हणून वरच्या वर्गात घातले. कोल्हापूरचे नगरपालिकेतून महापालिकेत रूपांतर करताना लोक संख्येच्या निकषाला बगल देत राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर विशेष बाब म्हणून मंजुरी दिली होती. त्यावेळी राज्यातील ‘बेबी कार्पाेरेशन’ म्हणून शहराचा उल्लेख होई. अशीच राजकीय मुत्सद्दी नंतर कोणीही दाखविला नाही. हद्दवाढीच्या विरोधास राजकीय हवा मिळत आहे. नेत्यांच्या राजकारणामुळेच शहराचा बळी गेल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)वर्गवारीचे निकष‘अ’प्लस वर्ग- एक कोटी लोकसंख्या व ५० हजार दरडोई उत्पन्न‘अ’ वर्ग- २५लाख ते एक कोटी लोक संख्या व आठ हजारांपेक्षा अधिक दरडोई उत्पन्न‘ब’ वर्ग- १५ ते २५ लाख लोक संख्या व पाच हजारांपेक्षा अधिक दरडोई उत्पन्न‘क’ वर्ग- १० ते १५ लाख लोक संख्या व तीन हजारांपेक्षा अधिक दरडोई उत्पन्न‘ड’ वर्ग- तीन ते दहा लाख लोक संख्या