शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

कोल्हापूरच्या पंचांना मिरजेत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2016 08:34 IST

फुटबॉल सामन्यावेळी घटना : पराभवामुळे मैदानाचा आखाडा

मिरज : मिरजेत सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी रात्री मिरजेतील संघाचा पराभव झाल्यानंतर कोल्हापूरच्या पंचांना जमावाने मारहाण केली. त्यामुळे संतप्त पंचांनी बहिष्काराचा पवित्रा घेतल्यानंतर माफी मागून प्रकरण मिटविण्यात आले. मिरजेत फुटबॉल सामन्यात वारंवार मारामाऱ्या होत असल्याने मैदानाचा आखाडा बनला आहे. मिरजेतील शिवाजी क्रीडांगणावर विद्युतझोतातील फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत मुंबई, केरळ, हैदराबाद, अमरावती, हुबळी, बंगलोर, मिरजेसह १८ संघ सहभागी झाले आहेत. गुरुवारी रात्री मिरजेतील रेल्वे यंग बॉईज विरुद्ध मुंबई संघादरम्यान सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात प्रेक्षकांनी स्थानिक संघाला जोरदार प्रोत्साहन दिले. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना मुंबईच्या खेळाडूस नियमबाह्य पद्धतीने अडविल्याच्या कारणावरून कोल्हापूरचे पंच अजिंक्य दळवी यांनी मुंबई संघास पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा घेऊन मुंबई संघाने गोल नोंदवून १-० असा विजय मिळविला. मुंबई संघाच्या विजयामुळे मिरज संघाच्या समर्थकांनी सामना संपल्यानंतर पंच दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांना मैदानातच बेदम मारहाण केली. यावेळी मध्यस्थीचा प्रयत्न करणारे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष जग्गू सय्यद यांनाही जमावाने धक्काबुक्की केली. या घटनेमुळे प्रेक्षकांचीही धावपळ झाली. मारहाणीच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या पंचांनी स्पर्धेतील पुढील सामन्यांवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. मात्र, फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून, मारहाण करणाऱ्यांना पंचांची माफी मागण्यास भाग पाडून, प्रकरण मिटविल्याची चर्चा होती.दरम्यान, कोल्हापूरच्या पंचांनी मारहाणीच्या घटनेबाबत वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. दोन दिवसांपूर्वी येथे प्रेक्षकांतही मारामारीचा प्रकार घडला होता. पोलीस बंदोबस्त नसल्याने मारामाऱ्या होत आहेत. (वार्ताहर)वारंवार प्रकारमिरजेत फुटबॉल स्पर्धेदरम्यान पंचांना, खेळाडूंना मारहाण, प्रेक्षकांत हाणामारीचे प्रकार वारंवार होत असल्याने, फुटबॉल क्रीडांगणाचा आखाडा झाला आहे. मारहाणीच्या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष वसंत अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता, फुटबॉल स्पर्धेत असे किरकोळ प्रकार घडतात, असे त्यांनी सांगितले.