शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

कोल्हापूर आणि डॉ. बाबासाहेब

By admin | Updated: April 13, 2016 23:38 IST

छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांची पहिली भेट

कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या चळवळीत सुशिक्षित अस्पृश्य तरुण होते. दत्तोबा संतराम पोवार हे त्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावायचे. छत्रपती शाहू महाराजांचे ते अतिशय निष्ठावंत सहकारी होते. दत्तोबा पोवार यांचा १९१७ साली आंबेडकर यांच्याशी परिचय झाला. डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणामुळे पोवार भारावून गेले. त्यांनी ही माहिती शाहू महाराजांना दिली. अस्पृश्य समाजातील तरुणाने इतके शिक्षण घेतले आहे, हे ऐकून शाहू महाराजांना अपार आनंद झाला अन् लगेचच त्यांनी डॉ. बाबासाहेबांशी ओळख करून द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. १९१९ मध्ये डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी शाहू महाराज मुंबईला गेले. आंबेडकर परळमधील चाळीत राहात होते. कोल्हापूरचे राजे आपल्याला भेटण्यासाठी आले आहेत, असा निरोप मिळताच दुसऱ्या मजल्यावरून ते खाली आले आणि महाराजांना भेटले. महाराजांनी बाबासाहेबांना ते उतरलेल्या पन्हाळा लॉजवर नेले. या ठिकाणी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत महाराजांनी आंबेडकरांना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले. बाबासाहेबांनी हे निमंत्रण स्वीकारले.दलित प्रजा परिषद खासबाग मैदानावर ३० डिसेंबर १९३९ रोजी दलित प्रजा परिषद घेण्यात आली होती. तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर होते. या दिवशी रिसाल्याजवळ त्यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर तिथून डॉ. आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अधिवेशनास प्रारंभ झाला. दलित प्रजा परिषदेत झालेले ठराव छत्रपती राजाराम महाराजांना देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी त्यांची भेट घेतली. परिषदेतील ठराव त्यांच्यासमोर मांडले. यावेळी राजाराम महाराजांनी त्यांना या ठरावांच्या कामी योग्य ते लक्ष देण्याचे आश्वासन दिले. डॉ. आंबेडकर यांना राजवाड्यावर भोजनाची अनेक निमंत्रणे राजाराम महाराजांनी दिली होती. इतका या दोघांतील स्नेहभाव घट्ट होता. खासबाग मैदान येथील प्रजा परिषदेनिमित्त कोल्हापुरात आल्यानंतर दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास डॉ़ आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ याप्रसंगी बी़ एच़ वराळे, गंगाराम कांबळे, मसू लिगाडे, थळू बेळे-सातार्डेकर, शांताराम सरनाईक, केरू बनगे, आबा सरनाईक, खोडा गंगाराम, संभाजी भातवे, रामचंद्र अंबपकर, दादासाहेब शिर्के, यशवंत सुळगावकर, आदी.डॉ. आंबेडकरांची कोल्हापूरची शेवटची भेटराजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात भाषण देण्याच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर २४ आणि २५ डिसेंबर १९५२ रोजी कोल्हापुरात आले. कोल्हापूरकरांसाठी ही त्यांची भेट शेवटची ठरली; कारण त्यानंतर ते कोल्हापुरात येऊ शकले नाहीत.