शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

ग्रामपंचायत मतदानात पुन्हा कोल्हापूरच भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST

कोल्हापूर : राज्यात १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीसाठी इर्षेने व चुरशीने ७६ .२५ टक्के मतदान झाले असून मतदानात कोल्हापूरच पुन्हा ...

कोल्हापूर : राज्यात १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीसाठी इर्षेने व चुरशीने ७६ .२५ टक्के मतदान झाले असून मतदानात कोल्हापूरच पुन्हा भारी ठरले आहे. लोकसभा, विधानसभेपाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही कोल्हापूरात सर्वाधिक ८३.८० टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी ६८.२१ टक्के रत्नागिरी जिल्ह्यात मतदान झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील सर्वात संघर्षपूर्ण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नात्यागोत्यासह, भाऊबंदकी उफाळून येत असल्याने सर्वच ठिकाणी संघर्षपूर्ण निवडणुका झाल्याचे पहावयास मिळाले. राज्यातील १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीच्या ४६ हजार ९२१ प्रभागातील १ लाख २५ हजार ७०५ जागांसाठी दुरंगी, तिरंगी लढती झाल्या. शुक्रवारी राज्यात सगळीकडेच अतितटीने मतदान होऊन १ कोटी ६९ लाख ११ हजार ३९५ मतदारांनी हक्क बजावला.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८३.८० टक्के मतदान झाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद कोल्हापूरात झाली होती. त्याची पुनर्रावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत झाली. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८३.५८ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८२.९५ टक्के तर परभणीमध्ये ८२.९३ टक्के मतदान झाले.

‘भंडारा-गोंदियात’ महिलाराज

ग्रामपंचायतीसाठी एका एका मतासाठी उमेदवारांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहिल्याने मतदान चांगले झाले. मात्र भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पुरूषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक होते. पुरूषांच्या तुलनेत भंडारात ३६४३ तर गोंदियात ५१० महिलांचे जादा मतदान झाले.

आडाखे बांधण्यात उमेदवार गुंग

राज्यातील ४६ हजार ९२१ प्रभागात २ लाख १४ हजार ८८० उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणा बंद झाले असून प्रत्येक ठिकाणी चुरस निर्माण झाल्याने उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत. कोणत्या घरातील मतदान आपणाला झाले, कोणाचे झाले नाही,यावरून विजयी, पराजयाचे आडाखे बांधण्यात उमेदवारांसह त्यांचे समर्थक गुंग आहेत.

असे झाले जिल्हानिहाय मतदान

जिल्हा मतदानाची टक्केवारी

कोल्हापूर ८३.८०

बीड ८३.५८

भंडारा ८२.९५

परभणी ८२.९३

अहमदनगर ८२.७३

हिंगोली ८२.३२

जालना ८२.३२

दृष्टीक्षेपात राज्यातील निवडणूक

ग्रामपंचायती- १२ हजार ६०३

प्रभाग - ४६ हजार ९२१

जागा - १ लाख २५ हजार ७०५

बिनविरोध - २६ हजार ७१८

उमेदवार रिंगणात - २ लाख १४ हजार ८८०