शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

ग्रामपंचायत मतदानात पुन्हा कोल्हापूरच भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST

कोल्हापूर : राज्यात १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीसाठी इर्षेने व चुरशीने ७६ .२५ टक्के मतदान झाले असून मतदानात कोल्हापूरच पुन्हा ...

कोल्हापूर : राज्यात १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीसाठी इर्षेने व चुरशीने ७६ .२५ टक्के मतदान झाले असून मतदानात कोल्हापूरच पुन्हा भारी ठरले आहे. लोकसभा, विधानसभेपाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही कोल्हापूरात सर्वाधिक ८३.८० टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी ६८.२१ टक्के रत्नागिरी जिल्ह्यात मतदान झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील सर्वात संघर्षपूर्ण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नात्यागोत्यासह, भाऊबंदकी उफाळून येत असल्याने सर्वच ठिकाणी संघर्षपूर्ण निवडणुका झाल्याचे पहावयास मिळाले. राज्यातील १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीच्या ४६ हजार ९२१ प्रभागातील १ लाख २५ हजार ७०५ जागांसाठी दुरंगी, तिरंगी लढती झाल्या. शुक्रवारी राज्यात सगळीकडेच अतितटीने मतदान होऊन १ कोटी ६९ लाख ११ हजार ३९५ मतदारांनी हक्क बजावला.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८३.८० टक्के मतदान झाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद कोल्हापूरात झाली होती. त्याची पुनर्रावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत झाली. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८३.५८ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८२.९५ टक्के तर परभणीमध्ये ८२.९३ टक्के मतदान झाले.

‘भंडारा-गोंदियात’ महिलाराज

ग्रामपंचायतीसाठी एका एका मतासाठी उमेदवारांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहिल्याने मतदान चांगले झाले. मात्र भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पुरूषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक होते. पुरूषांच्या तुलनेत भंडारात ३६४३ तर गोंदियात ५१० महिलांचे जादा मतदान झाले.

आडाखे बांधण्यात उमेदवार गुंग

राज्यातील ४६ हजार ९२१ प्रभागात २ लाख १४ हजार ८८० उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणा बंद झाले असून प्रत्येक ठिकाणी चुरस निर्माण झाल्याने उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत. कोणत्या घरातील मतदान आपणाला झाले, कोणाचे झाले नाही,यावरून विजयी, पराजयाचे आडाखे बांधण्यात उमेदवारांसह त्यांचे समर्थक गुंग आहेत.

असे झाले जिल्हानिहाय मतदान

जिल्हा मतदानाची टक्केवारी

कोल्हापूर ८३.८०

बीड ८३.५८

भंडारा ८२.९५

परभणी ८२.९३

अहमदनगर ८२.७३

हिंगोली ८२.३२

जालना ८२.३२

दृष्टीक्षेपात राज्यातील निवडणूक

ग्रामपंचायती- १२ हजार ६०३

प्रभाग - ४६ हजार ९२१

जागा - १ लाख २५ हजार ७०५

बिनविरोध - २६ हजार ७१८

उमेदवार रिंगणात - २ लाख १४ हजार ८८०