शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

कोगे-कुडित्रे पुलाच्या भरावाने वाकरे, कुडित्रेकर पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : कोगे-कुडित्रे पुलाच्या भरावाने पाण्याला मोठा बांध घातल्यासारखी स्थिती झाली आहे. या पुलाला भराव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : कोगे-कुडित्रे पुलाच्या भरावाने पाण्याला मोठा बांध घातल्यासारखी स्थिती झाली आहे. या पुलाला भराव टाकण्याऐवजी दोन्ही बाजूंना मोठ्या मोऱ्या ठेवल्या असत्या, तर कुडित्रेसह तुळशी व कुंभी या नद्यांच्या काठांवर असणाऱ्या गावांत पुराचे पाणी शिरले नसते. अशीच परिस्थिती शिंगणापूर बंधाऱ्याचे बरगे काढले नसल्याने होऊन भोगावती नदीकाठांवर असणाऱ्या दोनवडे-वाकरे या गावांत पाणी शिरल्याचा अनुभव ग्रामस्थांनी बोलून दाखविला आहे.

डौलदार पिके व दिमाखदार घरे ही करवीर तालुक्यातील अनेक गावांची ओळख आहे. यात वाकरे, दोनवडे, कुडित्रे या तीन गावांना कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या सान्निध्याने सामाजिक, राजकीय व शैक्षणिक श्रीमंतीत भर पडली आहे; यामुळे येथे ग्रामीण संस्कृती व शहरी झगमगाट पाहायला मिळतो; पण गेल्या तीन वर्षांत दोन वेळा महापूर आल्याने पहिल्या महापुरातून सावरताना दुसऱ्यांदा आलेल्या महापुराने संसार विस्कटल्याने अनेकांची त्रेधातिरपीट उडत आहे.

वाकरे येथे महापुराचे पाणी पोवार गल्लीपर्यंत येईल; तसेच २०१९च्या पुराच्या रेषेतच पुराचे पाणी राहील, असा ग्रामस्थांचा अंदाज होता; पण तोरस्कर गल्लीसह वाकरेपैकी पोवारवाडी येथे पुराचे पाणी शिरल्याने १५० कुटुंबांना जनावरांसह, अंगावरील कपड्यांसह स्थलांतरित व्हावे लागले. यात दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत; तर आठ ते दहा घरांची पडझड झाली आहे. पूर ओसरू लागला आहे तसतशा पुरातील नुकसानीच्या भयावह दृश्यांनी ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकाश विठ्ठल पाटील यांचे दुमजली व आनंदा पांडुरंग पाटील यांचे तीनमजली राहते घर पडले असून १५ ते १६ घरांची मोठी पडझड झाली आहे. ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कुडित्रे-कोगे येथे पुलाच्या आजूबाजूला किमान १० फुटांनी भराव टाकण्यात आला आहे; यामुळे महापुराच्या पाण्याची पातळी वाढून पाण्याचा निचरा न झाल्याने कुडित्रे येथील कुंभार गल्लीत पाणी शिरले. १०० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते. ८ ते १० घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती दोनवडे येथे झाली होती. दोनवडेतील ६५ टक्के नागरी वस्तीत पाणी शिरल्याने सात ते आठ घरांची पडझड झाली.

कुडित्रे-कोगे पुलाचा तसा कोणताच फायदा होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळ्यात हा पूल वाहतुकीला सुरू झाल्यापासून अनेक दिवस पाण्याखाली असतो. पुलाला भराव टाकल्याने वाकरे, कुडित्रे ही गावे व शेती पाण्याखाली जात असून लाखोंचे नुकसान होत आहे.

संजय पाटील (वाकरे)

वाकरे (ता. करवीर) येथे आनंदा पांडुरंग पाटील यांचे दुमजली घर जमीनदोस्त झाले.