शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

ज्ञानकेंद्रित उद्योगासाठी कौशल्य हवे

By admin | Updated: December 15, 2015 00:28 IST

‘गोशिमा’ची वार्षिक सभा : विजय ककडे यांचे व्याख्यान; मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर : लोकशाही आणि युवा लोकसंख्येचा वापर करून ज्ञानकेंद्रित उद्योग-व्यवसाय विस्तारण्याची संधी आहे. त्यासाठी कौशल्य व शिक्षण यांचा वापर आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विजय ककडे यांनी रविवारी येथे केले.येथील मधुसूदन हॉलमध्ये झालेल्या गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘भारतीय अर्थव्यवस्था, उद्योगांसमोरील आव्हाने’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. डॉ. ककडे म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्थेचे भारताच्या विकासावर लक्ष असून, सन २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था चीननंतर दुसऱ्या क्रमांकाची असेल, असे अंदाज आहेत. कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्याचे आव्हान आहे. त्यसाठी औद्योगिक संस्था आणि विद्यापीठे यांनी एकत्रित कार्यरत राहणे आवश्यक आहे. चीनने उद्योगांना प्रोत्साहित केले, तसेच आता आर्थिक सुधारणांच्या दुसऱ्या टप्प्यात आवश्यक आहे. स्कील इंडिया व मेक इन इंडिया एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न महत्त्वाचे आहेत. माजी अध्यक्ष अजित आजरी म्हणाले, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ब्लॉक वाईज मिटिंग सुरू केली. शासन दरबारी तक्रारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक किरण पाटील यांची ‘गोशिमा’च्या फौंड्री सबक्लस्टरच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. ‘गोशिमा’मध्ये सभागृह बांधण्यासाठी मदत करणारे ज्येष्ठ उद्योजक वसंत भट यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, ‘मॅक’चे अध्यक्ष संजय जोशी, इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय आंगडी, उपाध्यक्ष बाबासो कोंडेकर, ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे, चंद्रकांत जाधव, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. एस. वराळे, उपअभियंता संजय जोशी, सचिन शिरगावकर, मोहन मुल्हेरकर, आर. पी. पाटील, योगेश कुलकर्णी, श्रीकांत पोतनीस, जे. बी. अनघोळकर, संग्राम पाटील, प्रदीपभाई कापडिया, आदी उपस्थित होते. जे. आर. मोटवाणी यांनी स्वागत केले. मोहन पंडितराव यांनी सूत्रसंचालन केले. सुरजितसिंग पवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कर्नाटकसाठी ४५० उद्योजक तयारकर्नाटकातील तवंदी घाटात उद्योग उभारण्यासाठी तातडीने जागा घेण्याची तयारी महाराष्ट्रातील ४५० उद्योजकांनी दर्शविली आहे. त्यादृष्टीने त्यांनी आपली तयारी ‘गोशिमा’कडे लेखी स्वरूपात नोंदविली असल्याचे नूतन अध्यक्ष देवेंद्र दिवाण यांनी सांगितले. ते म्हणाले, वीज, पाणी आणि जमीन या पायाभूत सुविधा योग्य प्रमाणात मिळत नसल्याने महाराष्ट्रातील १६०० उद्योजकांनी कर्नाटकात विस्तारीकरण, स्थलांतरणाचा निर्णय घेतला. कर्नाटक सरकारने त्यांना तवंदी घाटाच्या परिसरात सुमारे ८५० एकर जागा देण्याची तयारी दर्शविली. याबाबत गेल्या दीड महिन्यांपूर्वी कर्नाटक सरकारने जागा मागणी करणाऱ्या एकूण उद्योजकांपैकी ज्यांना तातडीने जमीन हवी आहे, अशा उद्योजकांची माहिती पाठवून द्यावी, असे पत्र ‘गोशिमा’ला पाठविले. त्यानुसार ‘गोशिमा’ने आढावा घेतला असता ४५० उद्योजकांनी तवंदी घाट परिसरातील संबंधित ठिकाणी तातडीने जागा हवी असल्याची मागणी केली आहे.मंदी नव्हे, संधी मानाउद्योजकांनी सध्याची मंदीही आपले उद्योगधंदेपुनर्रचना करण्याची संधी मानून कार्यरत रहावे, असे आवाहन डॉ. ककडे यांनी केले. ते म्हणाले, भविष्यकाळातील मोठ्या विकासाची तयारी करण्यासाठी उद्योजकांनी संबंधित पुनर्रचना वापरणे आवश्यक आहे.