शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘केएमटी’ देणार तिमाही पास

By admin | Updated: December 12, 2014 23:37 IST

प्रशासनाचा निर्णय : जानेवारीपासून सुरुवात, शाहू मैदानाजवळ आणखी एक केंद्र--‘लोकमत’ हेल्पलाईन

कोल्हापूर : केएमटीतून प्रवास करणाऱ्यांसाठी तीन महिन्यांचा पास देण्याचा निर्णय केएमटी प्रशासनाने घेतला आहे. येथील महाराणा प्रताप चौकातील पास वितरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेवून असेच आणखी एक केंद्र शाहू मैदानाजवळ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक संजय भोसले यांनी आज, शुक्रवारी ‘लोकमत’ला दिली. एका जागरुक पालकाने ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तशी मागणी केली. ‘लोकमत’ने केएमटी प्रशासनाच्या ती निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तातडीने तसा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पास काढणाऱ्या दहा हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठी सोय होणार आहे. कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (केएमटी)च्या बसद्वारे प्रवास करणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पासद्वारे ४० ते ६० टक्क्यांपर्यंत बसच्या मासिक भाड्यामध्ये सवलत दिली जाते. दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के, सातवी ते दहावीपर्यंत ५० टक्के, तर पहिली ते सातवीपर्यंत ६० टक्के मासिक भाड्यामध्ये केएमटी सवलत देते. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होतो. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने केएमटीचे पास वाटप केंद्र मात्र एकच महाराणा प्रताप चौक येथेच आहे. त्यामुळे उपनगरांसह शहर व वडगाव, करवीर तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांना पाससाठी ताटकळत थांबावे लागते. याचा अनुभव घेतलेल्या टोप (ता. हातकणंगले) येथील सतीश शहापूरकर या पालकांनी ‘लोकमत हेल्पलाईन’ला गुरुवारी संपर्क साधला. त्यांचा मुलगा व मुलगी पासचा वापर करतात. मुलांचा पास काढण्यासाठी त्यांना महिन्यांतून दोनवेळा रांगेत थांबावे लागत होते. त्यादिवशी त्यांना रजाच काढावी लागे. हे टाळण्यासाठी केएमटीनेही रेल्वेप्रमाणे तीन-तीन महिन्यांचा पास एकदाच द्यावा, त्यामुळे पालकांचे हेलपाटे वाचतील असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी केलेली सूचना योग्य असल्याने ‘लोकमत’ने केएमटी व्यवस्थापनाकडे त्यासंबंधीची विचारणा केली. त्यावर व्यवस्थापक भोसले म्हणाले, ‘तिमाही पासची सुविधा सुरु करण्यात कोणतीच अडचण नसून नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून तसे पास पालकांना देण्यात येतील. पालकांना पाससाठी रांगेत तिष्ठत थांबावे लागू नये यासाठी शाहू मैदान चौकात आणखी एक पास वाटप केंद्र तातडीने सुरू करण्यात येईल. तिमाही पासमुळे विद्यार्थी व पालकांचा वेळ वाचणार आहे. तसेच केएमटीकडे आगाऊ पैसेही उपलब्ध होतील. (प्रतिनिधी)के एमटी प्रशासनाने गेली आठ महिने विद्यार्थ्यांना पाससाठी आवश्यक असणारी ओळखपत्रे दिलेली नाहीत. पावतीच्या आधारेच नवीन पास दिला जातो. अनेक पालक व विद्यार्थ्यांकडून पावती गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. नेमका त्याच विद्यार्थ्याने पासचा वापर करावा, यासाठीही हे ओळखपत्र महत्त्वाचे आहे. मात्र, केएमटी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. - तुकाराम पाटील (पालक)