शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

‘केएमटी’ देणार तिमाही पास

By admin | Updated: December 12, 2014 23:37 IST

प्रशासनाचा निर्णय : जानेवारीपासून सुरुवात, शाहू मैदानाजवळ आणखी एक केंद्र--‘लोकमत’ हेल्पलाईन

कोल्हापूर : केएमटीतून प्रवास करणाऱ्यांसाठी तीन महिन्यांचा पास देण्याचा निर्णय केएमटी प्रशासनाने घेतला आहे. येथील महाराणा प्रताप चौकातील पास वितरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेवून असेच आणखी एक केंद्र शाहू मैदानाजवळ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक संजय भोसले यांनी आज, शुक्रवारी ‘लोकमत’ला दिली. एका जागरुक पालकाने ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तशी मागणी केली. ‘लोकमत’ने केएमटी प्रशासनाच्या ती निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तातडीने तसा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पास काढणाऱ्या दहा हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठी सोय होणार आहे. कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (केएमटी)च्या बसद्वारे प्रवास करणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पासद्वारे ४० ते ६० टक्क्यांपर्यंत बसच्या मासिक भाड्यामध्ये सवलत दिली जाते. दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के, सातवी ते दहावीपर्यंत ५० टक्के, तर पहिली ते सातवीपर्यंत ६० टक्के मासिक भाड्यामध्ये केएमटी सवलत देते. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होतो. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने केएमटीचे पास वाटप केंद्र मात्र एकच महाराणा प्रताप चौक येथेच आहे. त्यामुळे उपनगरांसह शहर व वडगाव, करवीर तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांना पाससाठी ताटकळत थांबावे लागते. याचा अनुभव घेतलेल्या टोप (ता. हातकणंगले) येथील सतीश शहापूरकर या पालकांनी ‘लोकमत हेल्पलाईन’ला गुरुवारी संपर्क साधला. त्यांचा मुलगा व मुलगी पासचा वापर करतात. मुलांचा पास काढण्यासाठी त्यांना महिन्यांतून दोनवेळा रांगेत थांबावे लागत होते. त्यादिवशी त्यांना रजाच काढावी लागे. हे टाळण्यासाठी केएमटीनेही रेल्वेप्रमाणे तीन-तीन महिन्यांचा पास एकदाच द्यावा, त्यामुळे पालकांचे हेलपाटे वाचतील असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी केलेली सूचना योग्य असल्याने ‘लोकमत’ने केएमटी व्यवस्थापनाकडे त्यासंबंधीची विचारणा केली. त्यावर व्यवस्थापक भोसले म्हणाले, ‘तिमाही पासची सुविधा सुरु करण्यात कोणतीच अडचण नसून नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून तसे पास पालकांना देण्यात येतील. पालकांना पाससाठी रांगेत तिष्ठत थांबावे लागू नये यासाठी शाहू मैदान चौकात आणखी एक पास वाटप केंद्र तातडीने सुरू करण्यात येईल. तिमाही पासमुळे विद्यार्थी व पालकांचा वेळ वाचणार आहे. तसेच केएमटीकडे आगाऊ पैसेही उपलब्ध होतील. (प्रतिनिधी)के एमटी प्रशासनाने गेली आठ महिने विद्यार्थ्यांना पाससाठी आवश्यक असणारी ओळखपत्रे दिलेली नाहीत. पावतीच्या आधारेच नवीन पास दिला जातो. अनेक पालक व विद्यार्थ्यांकडून पावती गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. नेमका त्याच विद्यार्थ्याने पासचा वापर करावा, यासाठीही हे ओळखपत्र महत्त्वाचे आहे. मात्र, केएमटी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. - तुकाराम पाटील (पालक)