शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

केएमटीने जुन्या बसेस स्क्रॅप कराव्यात, अन्यथा बंदोबस्त करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 17:16 IST

केएमटीकडील आयुष्यमान संपलेल्या जुन्या गाड्या महानगरपालिका प्रशासनाने तातडीने बंद कराव्यात, अन्यथा आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असा गंभीर इशारा येथील नॅशनल ब्लॅक पॅँथर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दिला. अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना त्यांच्या कार्यालयातच ठाण मारुन ठोस आश्वासन दिल्याखेरीज कार्यालयातून बाहेर जाणार नाही असा इशारा दिल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

ठळक मुद्देनॅशनल ब्लॅक पॅँथर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला गंभीर इशारा अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या कार्यालयातच ठाण आयुक्त कार्यालयात पोलिस बंदोबस्तात वाढ

कोल्हापूर : केएमटीकडील आयुष्यमान संपलेल्या जुन्या गाड्या महानगरपालिका प्रशासनाने तातडीने बंद कराव्यात, अन्यथा आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असा गंभीर इशारा येथील नॅशनल ब्लॅक पॅँथर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दिला. अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना त्यांच्या कार्यालयातच ठाण मारुन ठोस आश्वासन दिल्याखेरीज कार्यालयातून बाहेर जाणार नाही असा इशारा दिल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

सकाळी अकरा वाजता नॅशनल ब्लॅक पॅँथर पक्षाचे कार्यकर्ते आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कार्यालयात गेले. पण कार्यालयात आयुक्त नसल्याने अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी त्यांची भेट घेतली व त्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

आयुष्यमान संपलेल्या बसेस चोवीस तासात बंद कराव्यात अन्यथा त्यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी मनपा अधिकाऱ्यांवर राहिल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. अपघातास जबाबदार असणाºया चालकांसह अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे असा आग्रह धरताना अपघात होऊन तीन दिवस होऊन गेले कसली चौकशी करताय अशी विचारणा कार्यकर्त्यांनी केली. अपघातातील मयतांच्या वारसांना सेवेत सामावून घ्या अशी मागणी केली.

कार्यकर्त्यांनी आमच्या मागण्याबाबत लेखी पत्र देण्याची मागणी अतिरीक्त आयुक्तांकडे केली. तथापि आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेतो असे पाटणकर यांनी सांगताच कार्यकर्त्यांनी त्यांना अपशब्द वापरले. त्यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना समजावले. शांततेत आपले म्हणणे मांडा.

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक दोष तपासले जात आहे. अपघाताची चौकशी सुरु आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात लक्ष घातले आहे,त्यामुळे शांतपणे आपले म्हणणे मांडा असे सावंत यांनी समजावले.

चौकशी अहवाल येताच सर्व संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे लेखी पत्र पाटणकर यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यावेळी दुपारी अडीच वाजता कार्यकर्ते तेथून बाहेर पडले.

यावेळी सहायक शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, सहायक आयुक्त मंगेश शिंदे, संजय भोसले , संजय सरनाईक उपस्थित होते. तर अतिरीक्त आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात जीवनसिंग, अभिनंदन राव, ताहिर इनामदार, शंभू महापुरे, इजाज शेख, राकेश कांबळे, किरण जासूद यांचा समावेश होता.