शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अवजारे खरेदीत शेतकऱ्यांच्या पसंतीला ‘खो’

By admin | Updated: October 13, 2015 23:57 IST

कृषी विभागाचे निर्देश : अनुदानावर मिळणारी अवजारे महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाकडून खरेदी करा

प्रकाश पाटील- कोपार्डे---शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करण्याची तरतूद केंद्राने केली होती. मात्र, याचवर्षी दोन महिन्यांपूर्वी केंद्राने दिलेल्या निर्देशाला फाटा देऊन राज्य कृषी विभागाने अवजारे खरेदीची सुधारित पद्धत राबविण्यासंदर्भात नवीन निर्देश जाहीर केले असून, शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडूनच अवजारे खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या राज्य शासनाच्या निर्णयाने प्रचलित पद्धतीत सुधारणा करून या योजनेतील भ्रष्टाचार दूर करण्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अवजारांसाठीच्या प्रचलित पद्धतीत बदल करून सुधारित पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश राज्याच्या कृषी विभागाला दिले होते. त्यामध्ये अवजारांचे अनुदान थेट ‘लाभार्थी’ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आणि शेतकऱ्यांना आपल्या पसंतीच्या कंपनींची अवजारे खुल्या बाजारातून खरेदी करण्याची मुभा देणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश होता. राज्य कृषी विभागाने त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनाही केल्या होत्या. मात्र, याला फाटा देत मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. त्याबाबतचा सुधारित तपशील व प्रपत्र असलेल्या नवीन मार्गदर्शन सूचना राज्याचे कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक के. व्ही. देशमुख यांच्या सहीने नुकत्याच जारी करण्यात आल्या आहेत. कृषी आयुक्तांनी आढावा सभेमध्ये दिलेल्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी अवजारांची खरेदी ही ‘महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ’ यांच्यामार्फतच करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशांमध्ये अंशत: बदल करण्यात आले आहेत, असे या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर अनुदान जमा करण्याच्या बाबतीत मात्र बदल झालेला नाही. दरम्यान, शेतकऱ्यांना प्रमाणित अवजारे मिळावीत, याच हेतूने हा अंशत: बदल करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येत असला तरी या निर्णयामागे पुरवठादारांची लॉबी व कृषी खात्यातील काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतल्याचे सांगण्यात येते. राज्यात निविष्ठा आणि अवजारे वाटपाची प्रचलित पद्धत गैरव्यवहारांना पोषक असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची उत्पादने मिळतात. त्याचबरोबर वेळेवर पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. सध्याच्या सदोष पद्धतीत बदल करून निविष्ठा व अवजारे खरेदीचे ‘गुजरात मॉडेल’ राबवावे, अशी मागणी होत आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात अजून ठोस पावले उचलली नसताना केंद्राच्या दबावामुळे किमान केंद्राच्या ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान’ या एका योजनेसाठी तरी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा लागला होता. मात्र, राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून अवजारे निवडण्याचे आणि खरेदी करण्याचे स्वातंत्र हिरावून घेत त्यातही खोडा घातला आहे. निविष्ठा व अवजारे खरेदीसाठी गुजरात मॉडेल अशी मागणी.लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर अनुदान जमा करण्याच्या बाबतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यात निविष्ठा आणि अवजारे वाटपाची प्रचलित पद्धत गैरव्यवहारांना पोषक असून, त्यामुळे निकृष्ट दर्जाची उत्पादने. सध्याच्या पद्धतीत शेतकऱ्यांना आपल्या पसंतीची उत्पादने निवडण्याचे स्वातंत्र्य नाही.