शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऊस बिले न मिळाल्याचा फटका खरीप पिकांना

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

शेतकरी आर्थिक अरिष्टात : तीन महिन्यांपासून बिले न मिळाल्याने शेतीची कामे खोळंबली

दानोळी : ऊस कारखान्याला जाऊन तीन-चार महिन्यांचा काळ उलटला, तरीही ऊस बिलांचा पत्ताच नाही. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीवर आधारित अनेक उद्योगांसह खरीप पिकांवरही त्याचा परिणाम दिसून येत असून, शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे.प्रत्येकवर्षी शेतकऱ्यांना शेतातील ऊस कारखान्यास गेल्यानंतर स्वातंत्र मिळाल्यासारखा आनंद होतो. उसाचे बिल मिळाल्यानंतर त्यातून कोणती कामे करायची याचे नियोजन केले जाते. हे बिल म्हणजे वर्षभर शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचे सर्वांत मोठे फळ असते. परंतु, यावर्षी पहिल्यांदाच तीन महिने झाले, तरी उसाचे बिल मिळाले नाही व कधी मिळणार हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे आपल्या शेतीप्रधान देशात अनेक शेतकऱ्यांना आता दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले असून, अनेक शेतकरी हालाखीचे दिवस काढत आहेत. आज-उद्या बिले येतील या आशेवर उसनवारी करीत आहेत परंतु, ऊसनवारीलाही मर्यादा आल्यामुळे त्यांची अनेक कामे बिलाविना खोळंबली आहेत.खरीप पिकांच्या पूर्व तयारीसाठी शेतीची मशागत, बियाणे, मजुरांचा पगार, आदींसाठी पैसा नसल्यामुळे खरीप पिकांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे. मॉन्सून जवळ आला असून, उसाला खतांचा डोस देण्याची वेळ आली आहे; परंतु आधीची उधारी असल्यामुळे खतांचा डोस कसा द्यायचा, हा प्रश्न पडला आहे.शेतीची मशागत केलेले ट्रॅक्टर, औषध विक्रेते, रासायनिक खत विक्रेते, आदींची देणे बाकी असल्यामुळे अशा शेतीवर आधारित असणारे उद्योग अडचणीत आले आहेत. तसेच पीक कर्जासह शेतकऱ्यांची वैयक्तिक कर्जेही थकबाकीत गेली आहेत. अशा सोसायट्या, बॅँका, पतसंस्थांच्या उलाढालीवर मोठा परिणाम होत असून, त्यांचा विनाकारण लागलेल्या व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.शेतकऱ्यांना कोणतेही मासिक वेतन अथवा पेन्शन नाही, त्यामुळे वर्षातून एकदा बिलापोटी मिळणारी रक्कम एकदम खर्च करणारा शेतकरी हा एकमेव वर्ग आहे. त्यांची सर्वच खरेदी थांबल्यामुळे बाजारात मंदी निर्माण झाली आहे. सध्या शाळा, कॉलेज सुरू होत असून, मुलांची अ‍ॅडमिशन फी, शालेय साहित्य, आदी खर्च कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.ऊस बिलाचा प्रश्न ताणून धरला जात असून, कारखानदार व शासनामध्ये शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. बिले लवकर मिळाल्यास त्याचा योग्यवेळी उपयोग करून घेता येईल, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हे तर ‘सबसे बुरे दिन’यापूर्वी ऊस बिले वेळेवर मिळत असत; पण ‘अच्छे दिन आयेंगे’, म्हणत भाजप सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्याच ऊस बिलास जर तीन-चार महिन्यांहून जास्त काळ लागत असेल, तर शेतकऱ्यांसाठी हे तर ‘सबसे बुरे दिन’ आले आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे.