शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

ऊस बिले न मिळाल्याचा फटका खरीप पिकांना

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

शेतकरी आर्थिक अरिष्टात : तीन महिन्यांपासून बिले न मिळाल्याने शेतीची कामे खोळंबली

दानोळी : ऊस कारखान्याला जाऊन तीन-चार महिन्यांचा काळ उलटला, तरीही ऊस बिलांचा पत्ताच नाही. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीवर आधारित अनेक उद्योगांसह खरीप पिकांवरही त्याचा परिणाम दिसून येत असून, शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे.प्रत्येकवर्षी शेतकऱ्यांना शेतातील ऊस कारखान्यास गेल्यानंतर स्वातंत्र मिळाल्यासारखा आनंद होतो. उसाचे बिल मिळाल्यानंतर त्यातून कोणती कामे करायची याचे नियोजन केले जाते. हे बिल म्हणजे वर्षभर शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचे सर्वांत मोठे फळ असते. परंतु, यावर्षी पहिल्यांदाच तीन महिने झाले, तरी उसाचे बिल मिळाले नाही व कधी मिळणार हे सुद्धा माहीत नाही. त्यामुळे आपल्या शेतीप्रधान देशात अनेक शेतकऱ्यांना आता दैनंदिन गरजा भागविणेही कठीण झाले असून, अनेक शेतकरी हालाखीचे दिवस काढत आहेत. आज-उद्या बिले येतील या आशेवर उसनवारी करीत आहेत परंतु, ऊसनवारीलाही मर्यादा आल्यामुळे त्यांची अनेक कामे बिलाविना खोळंबली आहेत.खरीप पिकांच्या पूर्व तयारीसाठी शेतीची मशागत, बियाणे, मजुरांचा पगार, आदींसाठी पैसा नसल्यामुळे खरीप पिकांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे. मॉन्सून जवळ आला असून, उसाला खतांचा डोस देण्याची वेळ आली आहे; परंतु आधीची उधारी असल्यामुळे खतांचा डोस कसा द्यायचा, हा प्रश्न पडला आहे.शेतीची मशागत केलेले ट्रॅक्टर, औषध विक्रेते, रासायनिक खत विक्रेते, आदींची देणे बाकी असल्यामुळे अशा शेतीवर आधारित असणारे उद्योग अडचणीत आले आहेत. तसेच पीक कर्जासह शेतकऱ्यांची वैयक्तिक कर्जेही थकबाकीत गेली आहेत. अशा सोसायट्या, बॅँका, पतसंस्थांच्या उलाढालीवर मोठा परिणाम होत असून, त्यांचा विनाकारण लागलेल्या व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.शेतकऱ्यांना कोणतेही मासिक वेतन अथवा पेन्शन नाही, त्यामुळे वर्षातून एकदा बिलापोटी मिळणारी रक्कम एकदम खर्च करणारा शेतकरी हा एकमेव वर्ग आहे. त्यांची सर्वच खरेदी थांबल्यामुळे बाजारात मंदी निर्माण झाली आहे. सध्या शाळा, कॉलेज सुरू होत असून, मुलांची अ‍ॅडमिशन फी, शालेय साहित्य, आदी खर्च कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.ऊस बिलाचा प्रश्न ताणून धरला जात असून, कारखानदार व शासनामध्ये शेतकरी विनाकारण भरडला जात आहे. बिले लवकर मिळाल्यास त्याचा योग्यवेळी उपयोग करून घेता येईल, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हे तर ‘सबसे बुरे दिन’यापूर्वी ऊस बिले वेळेवर मिळत असत; पण ‘अच्छे दिन आयेंगे’, म्हणत भाजप सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्याच ऊस बिलास जर तीन-चार महिन्यांहून जास्त काळ लागत असेल, तर शेतकऱ्यांसाठी हे तर ‘सबसे बुरे दिन’ आले आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहे.