शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सरपंचपदासह उपसरपंचपदाची होणार खांडोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST

सरुड : अनिल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क यापुढे सरपंच निवड ही पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून होणार असल्याने कोणीही नाराज होऊ ...

सरुड : अनिल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क

यापुढे सरपंच निवड ही पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून होणार असल्याने कोणीही नाराज होऊ नये व ग्रा. पं.मध्ये आपल्याच गटाचे बहुमत कायम राहून वर्चस्व राहावे म्हणून पाच वर्षांच्या काळात प्रत्येक सदस्याला सरपंचपदासह उपसरपंचपदावर काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न गटप्रमुखांकडून होणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या या कालावधीमध्ये अडीच वर्षे, दिड वर्षे, सव्वा वर्ष, एक वर्ष ते शेवटी शेवटी सहा महिने अशी प्रत्येक सदस्याला सरपंचपदासह उपसरपंचपदाची संधी मिळू शकते. परिणामी प्रत्येक सदस्याला खूश करण्याच्या प्रयत्नात या दोन्ही पदांची खांडोळी होणार हे मात्र निश्चित आहे.

भाजप सरकारने सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेत थेट जनतेतुन सरपंच निवडी करण्यात आल्या. परिणामी या निर्णयामुळे ग्रा. पं.मधील उपसरपंचासह इतर सदस्यांचे महत्त्व कमी झाले होते. बहुतांश ग्रा. पं.वर सरपंच म्हणून गटप्रमुख किंवा त्यांच्याच कुटुंबीयातील व्यक्तीलाच संधी मिळाली. सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र या पदापासुन वंचित राहिले. काही ठिकाणी तर जनतेतून थेट निवड झालेले सरपंच हे इतर सदस्यांना विचारात न घेता आपल्या अधिकाराचा वापर करत मनमानी कारभार करू लागल्याचे चित्र दिसू लागले. त्याचा विपरीत परिणाम गावच्या विकासकामांवर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या राज्यात सत्ता बदल होताच महाविकास आघाडीच्या सरकारने भाजप सरकारचा थेट सरपंच निवडीचा हा निर्णय रद्द केला व यापुढे सरपंचपदाची निवड ही पूर्ववत सदस्यांच्यातूनच करण्याचा निर्णय घेतला. तसे विधेयकही मंजूर करून घेतले. परिणामी सरपंच व उपसरपंच निवडीसाठी पुन्हा एकदा सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर प्रत्येक सदस्याला काही कालावधीसाठी का होईना पण आपण सरपंच किंवा उपसरपंचपदावर विराजमान व्हावे अशी इच्छा असते. यातूनच गटातील सर्व सदस्यांना खूश ठेवण्यासाठी गटप्रमुखांना गटातील सदस्यांच्या या इच्छा, अपेक्षांचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सरपंच, उपसरपंच बदलातुन बहुतांश ग्रा. पं.मध्ये या दोन्ही पदांची खांडोळी होणार आहे.