शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दूरदृष्टीमुळेच केनवडेत जलसमृद्धी

By admin | Updated: May 24, 2016 00:50 IST

तलावात मुबलक पाणी : दहा वर्षांपूर्वीच ग्रामस्थांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीचा यशस्वी प्रयोग --जलमित्र

दत्तात्रय पाटील --म्हाकवे -सर्वत्र सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे तहान लागल्यानंतर विहीर खुदाईच्या प्रकाराप्रमाणे शासनाने आता गांभीर्याने घेत ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतले आहे; परंतु तब्बल दहा वर्षांपूर्वीच केनवडे (ता. कागल) येथील ग्रामस्थांच्या सहकार्यातून ग्रामपंचायतीने हा प्रयोग यशस्वीपणे राबविला. गावच्या तलावाच्या वरच्या बाजूला पाणी स्रोतांमध्ये ठिकठिकाणी बंधारे व चरी मारून पाणी अडविले आहे. त्यामुळे डोंगर उतारावर हा तलाव असतानाही आणखी महिनाभर पाऊस नाही पडला तरीही गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. माजी सरपंच दत्ता पाटील यांची धडपड व विशेष प्रयत्न यामुळेच गावाला जलसमृद्धी लाभल्याचेही ग्रामस्थ सांगतात. १९७२ मध्ये दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषदेमार्फत गावच्या उत्तरेला असणाऱ्या डोंगर कपारीमध्ये पाझर तलाव बांधण्यात आला; परंतु डोंगर उतार जास्त प्रमाणात असल्यामुळे या तलावात फारसा पाणीसाठा होत नव्हता. २००३ मध्ये आमदार हसन मुश्रीफ यांचे सहकार्य आणि लघुपाटबंधारे विभागाच्या मदतीमुळे या तलावाचे भाग्यच उजळले.माजी सरपंच दत्ता पाटील यांनी पाच ते सहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर या तलावाची उंची दहा फुटाने वाढवून घेतली. तसेच तलावाच्या उत्तरेकडील भाग हा खडकाळ व डोंगराळ असल्यामुळे पावसाळ्यातील बहुतांशी पाणी ओढ्या-नाल्यातून वाहून जात असे. याचा विचार करून ११ व्या वित्त आयोगातून तलावाच्या वरील भागात चार कि.मी.च्या चरी मारण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत स्तरावरून वळण बंधारेही बांधण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवून ते जिरविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. त्याची फलश्रुती आज दिसत आहे. सर्वत्र पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असताना येथील ग्रामस्थांसह त्यांच्या जनावरांना मुबलक व शुद्ध पाणी मिळत आहे. तीन हजारांहून अधिक लोकवस्तीचे हे गाव आहे. यापूर्वी पाण्यासाठी खासगी विहिरींचा तसेच कूपनलिकेचा आधार घ्यावा लागत होता; परंतु दूरदृष्टी आणि नियोजनामुळे पिण्याच्या पाण्यासह डोंगर कपारीतील १०० एकरांवरील पिकांनाही अप्रत्यक्षरीत्या मुबलक पाणी मिळत आहे. तलावाची उंची वाढविणे, जॅकवेल बांधणे, पाणी योजना, आदी विविध कामांसाठी शासन स्तरावरून या गावाला अर्धा कोटीहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, केनवडे गावाप्रमाणे सर्वच गावांनी याचा आदर्श घेऊन जलस्रोत वाढविला, तर गावागावांत जलसमृद्धी अवतरायला वेळ लागणार नाही.‘ मी सरपंच पदाची सूत्रे हाती घेताच राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, आदी गावांना भेटी दिल्या. त्यांनी निर्माण केलेले जलस्रोत पाहिले आणि त्याप्रमाणे आपल्याकडेही काम करता येईल याचा विचार केला आणि आज सरकार ज्या जलयुक्त शिवाराचा पाठपुरावा करीत आहे. ती संकल्पना मी दहा वर्षांपूर्वीच ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबविली, त्यात यशस्वी झालो. त्याचीच फलश्रुती म्हणून आज गावात जलसमृद्धी साकारली आहे.- दत्ता पाटील-केनवडेकर, माजी सरपंच.