शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

केळोशी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

By admin | Updated: March 8, 2016 00:45 IST

काम बंद पाडले : प्रकल्पग्रस्त दाखले, जमिनी त्वरित द्या; अन्यथा काम करू देणार नाही

धामोड : धरणासाठी वडिलोपार्जित मिळकतीचा सातबारा कसलाही विचार न करता आपल्या स्वाधीन करत संसारावर पाणी ओतले. त्यावेळी शासन प्रकल्पात गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यात आम्हाला प्रकल्पग्रस्त दाखले व जमीन देईल असे वाटले होते; पण १२ वर्षांचा कालखंड लोटला, तरी आमची दखल कोणीच घेण्यास तयार नाहीत. याच उद्वेगातून रविवारी केळोशी बुद्रुक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी धरणस्थळावर जाऊन १२ वर्षांनंतर सुरू झालेले काम बंद पाडले. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे बंद झालेले रस्ते करून दिल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही, असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारा दिला आहे.निवेदनात म्हटले आहे, केळोशी बुद्रुक प्रकल्पाच्या कामाला २००१ मध्ये सुरुवात झाली. प्रकल्पाचा मूळ खर्च १0 कोटी ७३ लाख ८५ हजार २५ रुपये इतका निश्चित करून कामाला सुरुवात झाली. यातील भूसंपादनासाठीचे एक कोटी ८४ लाख ४२ हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले; पण त्यानंतर भक्कम अशा स्वरूपाचा निधी न मिळाल्याच्या कारणास्तव प्रकल्पाचे काम १२ वर्षे रेंगाळले. त्यामुळे धरणाचा खर्च २५ कोटींच्या घरात गेला आहे. आता या धरणाला निधी प्राप्त झाला असून, जवळपास १२ वर्षांनंतर कामाला सुरुवात झाली आहे; पण असे असले तरी या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, अशा बहुतांशी शेतकऱ्यांना अद्याप कोणताच मोबदला मिळालेला नाही. पैकी काही शेतकऱ्यांना पर्यायी जमीनही दिलेली नाही. एवढेच नाही तर साधा प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखलाही शासनाने देण्याचे धाडस दाखविले नाही. आमच्या या मागण्यांसंदर्भात राधानगरीचे तहसीलदार यांना मा. जिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी बैठकीच्या तारखा देऊ नही या बैठका घेण्यासाठी कार्यकारी अभियंता अथवा तहसीलदार राधानगरी यांना वेळ मिळत नसावा, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब आहे. वरील सर्व बाबी आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविल्या असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे.प्रकल्पग्रस्तांंचे रखडलेले पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप, प्रकल्पामुुळे बंद झालेले शेतकऱ्यांचे रस्ते, आदी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय धरणाचे काम पूर्ववत सुरू करू देणार नाही, असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी गणपती सखाराम पाटील, एम. के . पाटील, महिपती पाटील, एकनाथ पाटील, विष्णू पाटील, कृष्णात पाटील, गणपती गोविंदा पाटील, सदाशिव पाटील, दत्तात्रय पाटील, जोतिराम चौगले, राजाराम पाटील, मारुती चौगले, आदी शेतकरी उपस्थित होते.दृष्टिक्षेपात धरणकामास प्रारंभ - मे २००१, साठवण क्षमता - ५६०३.२२५ सहस्त्र घनमीटर, प्रकल्पाची लांबी ५५० मीटर, सांडवा - ७४ हेक्टर, लाभ क्षेत्र - ६२१ हेक्टर, शेतकरी बुडीत जमीन ८.५० हेक्टर, वन विभागाची बुडीत जमीन १३.८४ हेक्टर.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही - गणपती पाटील, प्रकल्पग्रस्त