शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

केळोशी प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

By admin | Updated: March 8, 2016 00:45 IST

काम बंद पाडले : प्रकल्पग्रस्त दाखले, जमिनी त्वरित द्या; अन्यथा काम करू देणार नाही

धामोड : धरणासाठी वडिलोपार्जित मिळकतीचा सातबारा कसलाही विचार न करता आपल्या स्वाधीन करत संसारावर पाणी ओतले. त्यावेळी शासन प्रकल्पात गेलेल्या जमिनींच्या मोबदल्यात आम्हाला प्रकल्पग्रस्त दाखले व जमीन देईल असे वाटले होते; पण १२ वर्षांचा कालखंड लोटला, तरी आमची दखल कोणीच घेण्यास तयार नाहीत. याच उद्वेगातून रविवारी केळोशी बुद्रुक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी धरणस्थळावर जाऊन १२ वर्षांनंतर सुरू झालेले काम बंद पाडले. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे बंद झालेले रस्ते करून दिल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही, असा इशारा या प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारा दिला आहे.निवेदनात म्हटले आहे, केळोशी बुद्रुक प्रकल्पाच्या कामाला २००१ मध्ये सुरुवात झाली. प्रकल्पाचा मूळ खर्च १0 कोटी ७३ लाख ८५ हजार २५ रुपये इतका निश्चित करून कामाला सुरुवात झाली. यातील भूसंपादनासाठीचे एक कोटी ८४ लाख ४२ हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले; पण त्यानंतर भक्कम अशा स्वरूपाचा निधी न मिळाल्याच्या कारणास्तव प्रकल्पाचे काम १२ वर्षे रेंगाळले. त्यामुळे धरणाचा खर्च २५ कोटींच्या घरात गेला आहे. आता या धरणाला निधी प्राप्त झाला असून, जवळपास १२ वर्षांनंतर कामाला सुरुवात झाली आहे; पण असे असले तरी या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, अशा बहुतांशी शेतकऱ्यांना अद्याप कोणताच मोबदला मिळालेला नाही. पैकी काही शेतकऱ्यांना पर्यायी जमीनही दिलेली नाही. एवढेच नाही तर साधा प्रकल्पग्रस्त असल्याचा दाखलाही शासनाने देण्याचे धाडस दाखविले नाही. आमच्या या मागण्यांसंदर्भात राधानगरीचे तहसीलदार यांना मा. जिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी बैठकीच्या तारखा देऊ नही या बैठका घेण्यासाठी कार्यकारी अभियंता अथवा तहसीलदार राधानगरी यांना वेळ मिळत नसावा, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब आहे. वरील सर्व बाबी आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविल्या असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे.प्रकल्पग्रस्तांंचे रखडलेले पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप, प्रकल्पामुुळे बंद झालेले शेतकऱ्यांचे रस्ते, आदी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय धरणाचे काम पूर्ववत सुरू करू देणार नाही, असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी गणपती सखाराम पाटील, एम. के . पाटील, महिपती पाटील, एकनाथ पाटील, विष्णू पाटील, कृष्णात पाटील, गणपती गोविंदा पाटील, सदाशिव पाटील, दत्तात्रय पाटील, जोतिराम चौगले, राजाराम पाटील, मारुती चौगले, आदी शेतकरी उपस्थित होते.दृष्टिक्षेपात धरणकामास प्रारंभ - मे २००१, साठवण क्षमता - ५६०३.२२५ सहस्त्र घनमीटर, प्रकल्पाची लांबी ५५० मीटर, सांडवा - ७४ हेक्टर, लाभ क्षेत्र - ६२१ हेक्टर, शेतकरी बुडीत जमीन ८.५० हेक्टर, वन विभागाची बुडीत जमीन १३.८४ हेक्टर.जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही - गणपती पाटील, प्रकल्पग्रस्त