शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

गुणवंत विद्यार्थी निर्माणासाठी कार्यरत राहावे

By admin | Updated: November 18, 2014 23:33 IST

जी. डी. यादव : शिवाजी विद्यापीठाचा ५२ वा वर्धापनदिन साजरा; गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर : जगात गुणवत्तेला पर्याय नाही आणि असे गुणवान विद्यार्थी निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने कार्यरत राहावे. नवीन ज्ञानाची निर्मिर्ती हा कोणत्याही विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू असतो आणि त्याची पूर्तता शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक आणि माजी विद्यार्र्थी या चार प्रमुख स्तंभांच्या सक्षमतेवर अवलंबून असते. या चार स्तंभांची एकत्र सांगड घातल्यास विद्यापीठाची वाटचाल योग्य प्रकारे होते, असे प्रतिपादन माटुंगा (मुंबई) येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रा. जी. डी. यादव यांनी आज, मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. विद्यापीठाच्या राजर्र्षी शाहू सभागृहात बोलताना यादव म्हणाले, ज्या विद्यापीठात शिक्षक उत्कृष्ट काम करीत असतात, ज्ञानसंपन्न असतात, त्यांचा लौकिक वृद्धिंगत होतो. अशा ठिकाणी उत्कृष्ट विद्यार्र्थी निर्माण होण्याची शक्यता वाढते. उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट विद्यार्र्थी हे दोन्ही घटक एकमेकांकडून सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा करतात आणि दर्जा वृद्धिंगत होतो. विद्यापीठामधील संशोधन हे लोकाभिमुख असलेच पाहिजे. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाने आदर्श प्रथा व परंपरा जोपासत असतानाच ग्रामीणतेचा न्यूनगंड मात्र झुगारून दिला आहे. एकविसाव्या शतकातील विद्यापीठाची वाटचाल आता ही वैश्विकतेकडे होते आहे. विद्यापीठाच्या पुढील दहा वर्षांच्या वाटचालीचा कृतिशील आराखडा आम्ही तयार केला असून, त्यानुसार आमची वाटचाल सुरू आहे.प्रा. यादव यांच्या हस्ते विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक यांना पारितोषिके देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय सेवकांच्या गुणवत्ताधारक पाल्यांचाही विद्यापीठ प्रशासकीय व कल्याण निधी पारितोषिके देऊन गुणगौरव केला. प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पारितोषिके देऊन गौरविले. दरम्यान, आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. पवार व प्रा. यादव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले. बीसीयूडी संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) यांचा झाला सत्कार विद्यापीठातील गुणवंत शिक्षक प्रा. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान अधिविभाग), महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक डॉ. शैलजा माने (सहयोगी प्राध्यापक, कला व वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे, जि. सातारा), बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. अशोक हजारे (कॉलेज आॅफ फार्मर्सी, मोरेवाडी, जि. कोल्हापूर), प्राचार्य सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त शिक्षिका डॉ. प्रज्ञा घोरपडे (आटर्स अ‍ॅँड कॉमर्स कॉलेज, कासेगाव), विद्यापीठातील गुणवंत सेवक रमेश गवळी (अधीक्षक), सुरेखा आडके (वरिष्ठ सहायक), आनंदा वारके (शिपाई), महाविद्यालयीन गुणवंत सेवक संतोष गायकवाड (मुख्य लिपिक, बाळासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडी).