शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखा

By admin | Updated: November 21, 2014 00:35 IST

महापौरांचे आदेश : रस्त्यांची पाहणी; रस्त्यांचा निधी खड्ड्यात नको : नागरिकांची मागणी

कोल्हापूर : महापालिकेने शहरातील लहान-मोठ्या १५०हून अधिक रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. १२५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणारे हे रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर तृप्ती माळवी यांनी आज, गुरुवारी अधिकाऱ्यांसह ‘जाऊळाचा गणपती ते रंकाळा स्टँड’ रस्त्याची पाहणी केली. अद्याप कामे सुरू न केलेल्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही महापौरांनी प्रशासनास दिल्या. मागील वेळेप्रमाणे कोट्यवधीचा निधी पुन्हा खड्ड्यात घालू नका, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे कोणत्याही प्रकारचा डांबरी रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे, असा दंडक आहे. रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी पहिली तीन वर्षे ठेकेदारांची असते. खडीचे अयोग्य प्रमाण, रोलिंग व डांबराचा अभाव, रस्त्यांची असमान पातळी, त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पहिल्या पावसातच वाहून गेले आहेत. महापालिका प्रशासन व ठेकेदारांच्या साखळीमुळेच शहर ‘डर्ट ट्रॅक’ बनले आहे. गेल्या चार वर्षांत रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटींचा चुराडा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता पुन्हा सव्वाशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांची बांधणी सुरू आहे. नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने प्रशासन व नगरसेवक खडबडून जागे झाले आहेत.दरवर्षी शहरातील गल्ली-बोळांतील रस्त्यांसाठी किमान दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च केले जातात. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, सुवर्णजयंती नगरोत्थान योजना, आमदार-खासदार फंडातून मिळालेला निधी मिळून रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होऊनही शहराला खड्ड्यांचे स्वरूप आले आहे. महापालिका प्रशासन व ठेकेदार यांच्यातील मिलिभगतमुळेच रस्त्यांची वाट लागल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौरांनी रस्त्यांच्या कामाची पाहणी करून दर्जा राखण्याबाबत आदेश दिले. (प्रतिनिधी)दर्जा राखण्याची मागणी दर्जा राखण्याची मागणीरस्त्यासाठी व ‘पीडब्ल्यूडी’च्या निकषांनंतर कारपेट, बीबीएम किंवा हॉटमिक्स अशा कोणत्याही प्रकारे केलेला रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे. मात्र, शहरातील कोणताही रस्ता कसाबसा एक पावसाळा टिकतो. ‘नाबार्ड’सारख्या संस्थेकडून केलेले रस्ते पाच-पाच वर्षे टिकतात. शहरातील रस्त्यावरच टिकाऊ पाया असतानाही रस्त्यांची चाळण का होते? याकडे मात्र सोपस्कारपणे दुर्लक्ष केले जाते. उच्च तंत्रज्ञानाला बगल देत खडी व डांबराचे व्यस्त प्रमाण वापरून शहरातील गल्ली-बोळांत डांबर फासण्याचा पुन्हा उद्योग करू नये, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.