शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीन जागांचे तरी आ‘रक्षण’ ठेवा

By admin | Updated: June 30, 2016 01:08 IST

‘पर्चेस’ची दुकानदारी : वर्षाच्या विलंबाने प्रस्ताव मंजूर

भारत चव्हाण --कोल्हापूर --महानगरपालिकेने सार्वजनिक हितासाठी शहराच्या विविध भागांत टाकलेल्या आरक्षणातील सात जागा मूळ मालकांना सन्मानाने परत देण्यास प्रशासकीय गोंधळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या ज्या चार जागांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यांची प्रक्रिया तरी मुदतीत राबवून त्या ताब्यात घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे; पण तीन प्रस्ताव तब्बल एक वर्षानंतर महासभेत मंजूर झाले आहेत. त्याला विलंब का झाला, याची माहिती समोर आल्यास जबाबदार अधिकारी आणि पदाधिकाऱ्याची नावे समोर येतील. आरक्षणातील जमिनींचा मोबदला मागणे हा मूळ मालकांचा कायदेशीर हक्क आहे आणि ज्या कारणांसाठी त्यांच्या जागा आरक्षित केल्या, त्या खरेदी करणे महानगरपालिके ची जबाबदारी आहे. अनेक वर्षे आरक्षण टाकून जमिनी ताब्यात ठेवायच्या, त्या खरेदी करायच्या नाहीत, अशीच नीती महापालिकेच्या अधिकाऱ्यांची राहिली आहे. सात जमिनी मूळ मालकांना परत द्याव्या लागण्यामागे हीच नीती कारणीभूत ठरली असल्याचा आक्षेप महासभेत घेण्यात आला. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशी मराठीत एक म्हण आहे. आरक्षणातील सात जमिनी जाण्याची नामुष्की ओढवल्यानंतर तरी प्रशासनाला अक्कल यायला पाहिजे होती; परंतु त्यांनी त्यातून अद्यापही काही धडा घेतलेला नाही. ज्या चार जमीन मालकांनी पर्चेस नोटिसा दिल्या, त्यांवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक होते. पर्चेस नोटीस पोहोचल्यानंतर तब्बल एक वर्षाने महासभेत तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. आता येथून पुढे आणखी किती दिवस ही प्रक्रिया चालणार आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. अधिकारी कागदी घोडे नाचवीत बसणार आहेत. त्यामुळे या तीन जागाही मूळ मालकांना परत जाण्याचा धोका आहे. म्हणून त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे जमीन संपादन करून त्यांना त्यांचा मोबदला अदा करणे आवश्यक आहे. एका पर्चेस नोटिसीचा प्रस्ताव तर अद्याप महासभेने मंजूर करावयाचा आहे. तीन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर आरक्षणात बाधित होणारी आपली जमीन खरेदी घेण्याची नोटीस दिल्यानंतर यासंबंधीच्या तीन प्रस्तावांना १६ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या महासभेत एकाच दिवशी मान्यता देण्यात आली. त्यानंतर महानगरपालिका नगरररचना विभागातर्फे सहायक संचालक धनंजय खोत यांनी ३ मे २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महासभेचे प्रस्ताव पाठवून या प्रकरणातील जमिनी दोन वर्षांच्या मुदतीत संपादन करण्याची प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने भूसंपादन अधिकाऱ्यांकडे त्वरित देण्यात यावे, असे कळविले आहे. दोन महिने होत आले तरी मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकरिता विशेष दक्षता घेतलेली नाही, हे स्पष्ट आहे. प्रस्ताव मंजुरीस विलंब पर्चेस नोटिसीद्वारे जमीन संपादन करण्याची प्रक्रिया जाणीवपूर्वक विलंबाने राबविली जाते, हा मुख्य आक्षेप आहे. रमेश बाजीराव पाटील यांनी १७/०३/२०१५ रोजी, तर राहुल बाळासाहेब कारदगे यांनी २१/०५/२०१५ रोजी जागाखरेदीची नोटीस दिली आहे. उत्तम आनंदराव भोसले व राहुल आनंदराव भोसले यांनी १५/०१/२०१६ रोजी जागाखरेदी नोटीस दिली आहे; परंतु भोसले यांचा प्रस्ताव वगळता अन्य दोन प्रस्ताव महासभेत मंजूर होण्यास एक वर्षाचा कालावधी लागला आहे. आता हा दोष कोणाचा, हा वादाचा मुद्दा आहे. प्रलंबित जागांचे प्रस्ताव आरक्षण क्रमांक ३७३ अ - प्राथमिक शाळा - ई वॉर्ड, कसबा बावडा, रि.स.नं. ९०५/१ पैकी क्षेत्र - ३४३६.६७ चौरस मीटर. चीफ प्रमोटर रमेश बाजीराव पाटील.आरक्षण क्र मांक ३६९- बगीचा - ई वॉर्ड, रि.स.नं. ८५.२ ब, पैकी क्षेत्र - २५३४ चौरस मीटर व ८६/२ पैकी १८० चौरस मीटर. मालक- उत्तम आनंदराव भोसले व राहुल आनंदराव भोसले. आरक्षण क्र मांक ३६९- बगीचा - ई वॉर्ड, रि.स.नं. ८५.२ ब पैकी २५३४ चौरस मीटर व ८६/२ व क्षेत्र - ५४० चौरस मीटर. मालक - राहूल बाळासो कारदगे.