शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 00:53 IST

उद्योजकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : कॉरिडॉरप्रश्नी उद्योगमंत्र्यांसमवेत आज बैठक होणार

कोल्हापूर : मुंबई-बंगलोर इकॉनॉमिक कॉरिडॉरसह जिल्ह्यातील उद्योगाच्या विकासासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित ठेवा, अशी मागणी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे केली. यावर उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून केले जाईल. तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी आरक्षित करावयाच्या जागानिश्चितीसाठी उद्योजक व राज्य औद्योगिक विकास महामंडळाने पुढाकार घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधील कोल्हापूरच्या समावेशासाठी आवश्यक जागेची उपलब्धता आणि प्रादेशिक विकास आराखड्यात औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित ठेवण्याबाबत उद्योजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेतली. यात प्रारंभी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (स्मॅक) अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळले आहे. कॉरिडॉरसाठी आवश्यक असणारे विमानतळ, रेल्वेमार्ग, पोर्ट, गॅसवाहिनी, आदी सुविधांची उपलब्धता अधिक शक्य असतानाही यातून कोल्हापूरला डावलले आहे. ते येथील विकासाला मारक ठरणार आहे. कॉरिडॉरच्या माध्यमातून जिल्ह्णात विविध मोठे उद्योग येऊ शकतात. ते लक्षात घेऊन प्रादेशिक विकास आराखड्यात किमान दोन हजार हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव ठेवावी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रासाठी जागा आरक्षित करताना शक्यतो पडजमिनींचा विचार करावा. यावर जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमध्ये बारा इंडस्ट्रिअल हब तयार केले जाणार आहेत. त्याच धर्तीवर मुंबई-बंगलोर कॉरिडॉरमध्येदेखील हब होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात जागा आरक्षित ठेवण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे. आरक्षित ठेवण्यासाठीच्या जागांची निश्चिती उद्योजक व औद्योगिक विकास महामंडळाने करावी. यात शक्यतो शासकीय जागांचा विचार करावा. जागा निश्चित करून त्या आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी विभागीय आयुक्तांशी चर्चा करावी. विकास आराखड्याची अंतिम मुदत २१ सप्टेंबर असली, तरी यात चार महिन्यांमध्ये काही सुधारणा करता येतात. या शिष्टमंडळात ‘गोशिमा’चे अध्यक्ष जे. आर. मोटवाणी, माजी अध्यक्ष अजित आजरी, ‘मॅक’चे अध्यक्ष संजय जोशी, ‘स्मॅक’चे सचिन पाटील, दीपक पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कणेरी मठ, रामलिंग परिसरातील जागेची पाहणीकॉरिडॉर व भविष्यातील उद्योगांच्या विकासासाठी साधारणत: दोन हजार हेक्टरच्या दोन भूखंडांची गरज आहे. या दृष्टीने प्राथमिक स्वरूपात आम्ही कणेरी मठ व रामलिंग परिसरातील जागांची पाहणी केली असल्याचे ‘स्मॅक’चे अध्यक्ष जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, कॉरिडॉरमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यासह प्रादेशिक विकास आराखड्यात औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव जागा ठेवण्याची मागणी आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत केली जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विविध उद्योजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.