शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

न्याय संस्थेवरील विश्वास अबाधित राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 23:53 IST

राजेंद्र सावंत : गडहिंग्लजला नूतन न्याय संकुलाचे शानदार उद्घाटन

गडहिंग्लज : न्यायालयात गेले तरच न्याय मिळतो, अशी धारणा आजही समाजात आहे. लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी न्यायाधीश आणि वकिलांवर आहे. न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास व आदर अबाधित राखण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. राजेंद्र सावंत यांनी केले.येथील नूतन न्याय संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट होते. न्यायसंकुलाच्या भव्यदिव्य इमारतीची पूर्तता हे सर्वांच्या प्रयत्नांचे फलित आहे, असे सावंत यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले, वकिली हा व्यवसाय नसून पेशा आहे. त्यामुळे वकिलांनी आपले कौशल्य व ज्ञान वाढवून पक्षकारांना वेळेवर व योग्य न्याय मिळण्यासाठी सहकार्य करावे. न्या. अवचट म्हणाले, गडहिंग्लज शहराला वेगळी ओळख आहे. २० वर्षांत एक रुपयाचीही भाडेवाढ न करता नगरपालिकेने जिल्हा न्यायालयासाठी इमारत उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पालिकेचे आभारी आहोत.कार्यक्रमास नगराध्यक्षा स्वाती कोरी, आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ विधितज्ज्ञ डी. बी. भोसले, शिवाजीराव चव्हाण, न्यायाधीश यामिनी बोरावके, आनंद व्होडावडेकर, संग्राम काळे, सतीश चंदगडे, राजेंद्र रोटे, रवी नडगदल्ली, मकरंद कुलकर्णी, श्रीनिवास पटवर्धन, धैर्यशील नलवडे, सुभाष घाटगे, अभिजित देसाई, कोकितकर, किसनराव कुराडे, मल्लाप्पाण्णा चौगुले, अ‍ॅड. कुंडलिक गावडे, ंआदी उपस्थित होते. ‘न्यायदीप’ या स्मरणिकेचे प्रकाशन न्यायमूर्ती सावंत यांच्या हस्ते झाले. गडहिंग्लज वकील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पोवार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी आभार मानले. मीरा जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.