शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

‘केडीसीसी’ दोन्ही काँग्रेसकडेच

By admin | Updated: May 8, 2015 01:00 IST

१३ जागांवर विजय : बँकेची सूत्रे पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार ?; शिवसेना-भाजपला केवळ एकच जागा

कोल्हापूर : ‘जिल्ह्यााची आर्थिक नाडी’ अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेच बाजी मारली. त्यामुळे पाच वर्षांनंतर बँकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा या दोन पक्षांच्या ताब्यात आल्या आहेत. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी चार जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. राष्ट्रवादीला सात, काँग्रेसला सहा, विनय कोरे यांना दोन, अपक्षांना तीन, तर मंडलिक गटास एक जागा मिळाली. शिवसेना-भाजपने सहा उमेदवार उभे केले होते. त्यांना एका जागेवरच यश मिळाले. गगनबावडा संस्था गटातील निकाल राखीव ठेवला आहे. पूर्वी एकतर्फी सत्ता असलेल्या बँकेत ‘राष्ट्रवादी’च्या बरोबरीने काँग्रेसही मजबूत झाल्याचे चित्र निकालातून दिसले.शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, माजी उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड व प्रा. जयंत पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. माजी आमदार पी. एन. पाटील, विनय कोरे, आमदार महादेवराव महाडिक व राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती.गुरुवारी दुपारपर्यंत येथील रमणमळा परिसरातील शासकीय गोदामात ३६ टेबलांवर मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेश कदम यांनी अधिकृत निकाल जाहीर केला. या बँकेसाठी मंगळवारी (दि. ५) चुरशीने ७०६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.जिल्हा बँकेत २००६ ते २०११ या पंचवार्षिकसाठी २००६ मध्ये दोन्ही काँग्रेसमध्येच झुंज झाली व त्यामध्ये राष्ट्रवादीचे पॅनेल बहुमताने सत्तेत आले. बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीचे १५, काँग्रेसचे ८, ‘जनसुराज्य’चे ४ आणि जनता दलाचा एक (ऊर्मिला श्रीपतराव शिंदे) असे बलाबल होते. परंतु, बँकेचा एनपीए ४१ टक्के झाला, नियमबाह्य कर्जपुरवठा, कर्जवसुलीसाठी प्रयत्न नाहीत, शाखांच्या तपासणीतील गंभीर दोष, रिझर्व्ह बँक व ‘नाबार्ड’चे निकष डावलून केलेला कर्जपुरवठा यांची दखल घेऊन तत्कालीन सहकार आयुक्तांनी १३ नोव्हेंबर २००९ ला संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. गेली सहा वर्षे बँकेत प्रतापसिंह चव्हाण यांनी प्रशासक म्हणून चांगला कारभार करून बँक रुळावर आणली. त्यामुळे निवडणूक प्राधिकरणाने बँकेची निवडणूक घेतली. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने बँक अडचणीत आणली अशी टीका केली, त्याच पक्षाकडे पुन्हा बँकेची सूत्रे जाण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)१२ संचालकांवर टांगती तलवारबँकेत संचालक म्हणून निवडून आलेल्या तब्बल १२ संचालकांवर सहकार विभागाने यापूर्वीच नुकसानीची जबाबदारी निश्चित केली आहे. ही नुकसानभरपाईची वसुली न झाल्यास या संचालकांवर पुन्हा अपात्रतेची कारवाई होऊ शकते. राज्य शासन त्याबाबत कितपत आग्रही राहते यावर या गोष्टी अवलंबून असतील. उच्च न्यायालयाने या संचालकांवरील राज्य शासनाच्या कारवाईस स्थगिती दिल्याने त्यांना ही निवडणूक लढविता आली.वाटून खाऊ...‘आम्ही दोघे भाऊ-भाऊ... मिळेल ते वाटून खाऊ’, अशीच जिल्ह्याच्या राजकारणातील दोन्ही काँग्रेसची स्थिती आहे. गोकुळ दूध संघात राष्ट्रवादीने काँग्रेसला ‘बाय’ दिला व जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची सोय होईल, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे या दोन्ही संस्थांवरील दोन्ही पक्षांचे किंबहुना ठरावीक नेत्यांचे वर्चस्व कायम राहिले. शिवसेना-भाजपने लढतीचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना फारसे यश मिळाले नाही.प्रमुख पराभूत : शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, बँकेचे माजी उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड व कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणातील कारभारी नगरसेवक प्रा. जयंत पाटीलप्रमुख विजयी : माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार नरसिंगराव पाटील, शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर, वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजू आवळे.