शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर शेतीप्रश्नावर पुढील आठवड्यात राष्ट्रपतींना भेटणार --: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:34 IST

काश्मीरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यपाल व राष्ट्रपतींकडे भेटीची मागणी केली होती; पण त्यांची वेळ न मिळू शकल्याने या शिष्टमंडळाने वेळ मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पुढील आठवड्यात वेळ मिळाल्यानंतर काश्मीरमधील सफरचंद व केशर उत्पादक शेतकºयांच्या व्यथांची मांडणी त्यांच्याकडे केली जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले.

ठळक मुद्देअखिल भारतीय किसान संघर्ष समितीची महिनाअखेरीस दिल्लीत बैठक

कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात पुढील आठवड्यात राष्ट्रपतींची भेट घेतली जाणार आहे, असे अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे सदस्य व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने घातलेले निर्बंध आणि त्यानंतर अवेळी सुरू झालेल्या बर्फवृष्टीने काश्मीरमधील सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. या शेतकºयांच्या विनंतीवरून अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने १३ ते १५ नोव्हेंबर असा तीनदिवसीय काश्मीर दौरा पूर्ण केला. दरम्यान, काश्मीरसह देशभरातील शेतकºयांच्या परिस्थितीवर विचारविमर्श करण्यासाठी या महिनाअखेरीस (दि. २९ व ३0) दिल्लीमध्ये बैठक होत आहे.

काश्मीरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यपाल व राष्ट्रपतींकडे भेटीची मागणी केली होती; पण त्यांची वेळ न मिळू शकल्याने या शिष्टमंडळाने वेळ मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पुढील आठवड्यात वेळ मिळाल्यानंतर काश्मीरमधील सफरचंद व केशर उत्पादक शेतकºयांच्या व्यथांची मांडणी त्यांच्याकडे केली जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले.

काश्मीरमधील फळबागांना विम्याचे कवच नसल्याने मदतीच्या संदर्भात घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती घोषित करून त्यातून मदत द्यावी, कर्जमाफी करावी, अशा प्रमुख मागण्या या काश्मिरी शेतकºयांच्या वतीने शिष्टमंडळामार्फत राष्ट्रपतींकडे केल्या जाणार आहेत, असेही शेट्टी यांनी सांगितले.काश्मिरी शेतक-यांसाठी संघटना एकवटल्याकेंद्राच्या निर्बंधामुळे आधी व्यापाºयांनी सफरचंदांची खरेदीच केली नाही. ७० टक्के माल पडून सडून गेला. दर हंगामात १० कोटी बॉक्सची खरेदी होत असताना, ती आता कशीबशी केवळ दीड कोटीपर्यंत पोहोचली आहे. यावरून या शेतकºयांच्या नुकसानीचा अंदाज बांधता येतो. या शेतक-यांना न्याय देण्यासाठी देशभरातील २५० शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmer strikeशेतकरी संप