शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

कसबा तारळेत ५० हजारांचा ढपला

By admin | Updated: December 29, 2014 00:10 IST

जिल्हा बँक शाखा : लिपिकाकडून खातेदाराच्या नावावरील रक्कम लंपास

राजाराम लोंढे - कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कसबा तारळे शाखेत एका खातेदाराच्या नावावरील ५० हजार रुपये परस्पर लंपास करण्याचा प्रताप ‘देवाच्या नावा’ने असणाऱ्या या बॅँकेच्या एका लिपिकाने केला आहे. या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा असून, तालुक्यातील एका वजनदार नेत्याच्या दबावापोटी ही चर्चा बँकेच्या प्रशासकांपर्यंत पोहोचलेली नाही. ‘शेतकऱ्यांची अर्थवाहिनी’ म्हणून जिल्हा बॅँकेकडे पाहिले जाते. संचालक मंडळाच्या प्रतापामुळे बॅँकेवर प्रशासक आले तरी शेतकऱ्यांची बॅँकेबद्दलची आस्था थोडीही कमी झालेली दिसत नाही. त्यामुळेच प्रशासकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी बॅँकेचे भागभांडवल वाढीसाठी मदत केली. इतका विश्वास शेतकऱ्यांचा बँकेवर आहे; पण या विश्वासाला तडा देण्याचे काम बँकेचे काही कर्मचारी करत आहेत. आठ दिवसांपूर्वी बॅँकेच्या कसबा तारळे शाखेत धक्कादायक प्रकार घडला. शाखेतील एका खातेदाराने विश्वासू व्यक्ती म्हणून लिपिकाकडे ४० हजार रकमेचा चेक वठवण्यास दिला होता. लिपिकाने हे पैसे संबंधिताला दिले; पण हे पैसे काढताना खात्यात मोठी रक्कम असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर लिपिकाने दुसऱ्या दिवशी स्लीपने ५० हजार रुपये काढले. पासबुक भरल्यानंतर संबंधित खातेदाराला घडला प्रकार लक्षात आला. नेमके काय झाले याची माहिती दोन दिवसांत दिली जाईल, असे सांगत शाखाधिकाऱ्यांनी खातेदाराची समजूत काढली. त्याच दिवशी सायंकाळी शाखाधिकाऱ्यांनी झालेल्या व्यवहाराची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आपल्यावर कारवाई होणार म्हटल्यावर संबंधित लिपिकाने राधानगरी तालुक्यातील वजनदार नेत्याशी बोलून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. संबंधित खातेदाराने बॅँकेच्या निरीक्षकांपर्यंत तक्रार केल्यानंतर त्यांनी चौकशी करून हे प्रकरण बॅँकेच्या व्यवस्थापकांपर्यंत गेले; पण तिथेच हे प्रकरण थांबले.राज्यातील जिल्हा बँकांमध्ये ‘सर्वाधिक पगार’ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांना आहेत. बॅँकेचा शिपाई ३० हजार रुपये पगार घेतो. ५० हजारांचा ढपला पाडणाऱ्या लिपिकाला ३८ हजार रुपये पगार आहे. गलेलठ्ठ पगार असतानाही ऐशोरामासाठी माती खाण्याचा प्रकार बॅँकेत होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बारा वर्षे याच शाखेत तळप्रशासकांनी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे काहींच्या बदल्याही झाल्या; पण हा लिपिक एकाच शाखेत तब्बल १२ वर्षे तळ ठोकून असल्याने त्याला सर्व खातेदारांच्या सह्या अवगत आहेत.