शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

कसबा बीडच्या गणेश तलावाला केंदाळाचा वेढा!

By admin | Updated: September 18, 2015 23:41 IST

अकराव्या शतकाचा साक्षीदार : पाणी बनले दूषित, वाढत्या अतिक्रमणामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात

शिवराज लोंढे -- सावरवाडी  --अकराव्या शतकात भोज राजाने बांधलेल्या आणि प्राचीन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कसबा बीड (ता. करवीर) गावच्या प्राचीन तलावाची सध्या अवस्था बिकट झाली आहे. तलावात वाढत्या जलपर्णीने वेढा दिला आहे. केंदाळ, पान वनस्पती, गारवेलीचे वाढते साम्राज्य यामुळे पाणी दूषित बनले आहे. तलावाभोवती वाढत्या आक्रमणामुळे भविष्यात या गणेश तलावाचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अकराव्या शतकात भोज राजाने या तलावाची उभारणी केली. त्या काळात या तलावाचा जनतेने पिण्यासाठी पाण्याचा वापर केला होता. कालांतराने या तलावाची देखभाल करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले.सर्व्हे नंबर २२१/१ मधील सोळा एकर क्षेत्राच्या परिसरात या गणेश तलावाची उभारणी केली आहे. तलावामध्ये गेल्या ३० वर्षांपासून प्रचंड स्वरूपाचा गाळ साचलेला आहे. गाळामुळे तलावातील पाणी दूषित बनल्याने दुर्गंधीयुक्त हवामान निर्माण झाले आहे. तलावामध्ये गेल्या २५ वर्षांपासून पान वनस्पती, जलपर्णी, केंदाळाचे साम्राज्य वाढलेले आहे. तलावाच्या पश्चिम बाजूला गारवेली वाढलेल्या आहेत. तलावाच्या पूर्वेस दगडी भराव बांधलेला होता; पण त्याचीही कालांतराने पडझड झाली होती. तलावासभोवार अतिक्रमणे वाढलेली आहेत.पूर्वी तलावातील पाण्याचा वापर शेतीसाठी व मच्छ व्यवसायासाठी केला जात होता; पण शासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या या गणेश तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गणेश तलावाला अद्याप शासकीय निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे या परिसराचा गेली कित्येक वर्षे विकास खुंटलेला आहे. राज्य शासनाने कसबा बीड नगरीला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिला; पण शासकीय निधीअभावी अनेक कामे ठप्प झाली आहेत. गणेश तलाव परिसरात मिनी रंकाळ््याचे स्वप्न अधुरे राहिले. पर्यावरणाच्या दृष्टीने तलावाला महत्त्व देण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात या ऐतिहासिक स्थळाचे अस्तित्व धोक्यात येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. नव्या बदलत्या काळात गणेश तलाव परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. गणेश तलाव हा प्राचीन ऐतिहासिक परिसर आहे. याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्य शासनाकडे निधीचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.- सुवर्णा सूर्यवंशी, (सरपंच, कसबा बीड)