शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बीड-महे दरम्यानचा बंधारा ठरतोय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: May 27, 2015 00:56 IST

बंधाऱ्याची उंची कमी : करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील ४० गावांना दळणवळणाचे साधन असलेल्या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष

शिवराज लोंढे -सावरवाडी -बेचाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आणि करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील ४० गावांच्या दळणवळणाची सोय असलेला तसेच राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष झालेला कसबा बीड-महे दरम्यानचा भोगावती नदीपात्रातील बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. बंधाऱ्याची उंची कमी असल्याने, दुतर्फा बाजूकडील भराव खचला गेल्याने तो अपघात क्षेत्रठरत आहे. ग्रामीण भागात दळणवळणाचा वाढता गुंता आणि ग्रामीण वाहतुकीची अवस्था बिकट झाली आहे. करवीर पश्चिम भागातील सुमारे ४० गावांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २४ एप्रिल १९७३ ला कसबा बीड-महे दरम्यान भोगावती नदीपात्रात या बंधाऱ्याची उभारणी केली. मुळात या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पूर परिस्थितीत पंधरा दिवस पुराचे पाणी बंधाऱ्यावर येते. पूर काळात पश्चिम भागातील ग्रामीण दळणवळण बंद होते. परिणामी पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होते. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला भराव नसल्यामुळे बंधाऱ्याजवळील रस्ता खचला आहे. त्यामुळे लहानमोठे अपघात होतात. कसबा बीड-महे दरम्यान या बंधाऱ्यावरून दररोज लहानमोठी हजारो वाहने ये-जा करतात. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूस चढ असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूकडील रस्ता खचला गेल्याने मोठी वाहने उलटतात. बंधाऱ्याचा पृष्ठभागही अत्यंत खराब झाला आहे. बंधाऱ्याच्या देखरेखीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.बंधाऱ्याचे नव्याने बांधकाम करून उंची वाढविण्याचा प्रस्ताव गेल्या २० वर्षांपूर्वीपासून शासनदरबारी रेंगाळला आहे. आमदार, खासदार यांच्या दुर्लक्षामुळे कसबा बीड बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. तो आणखी कितीजणांचा बळी घेणार, हा प्रश्न सामान्य जनतेसमोर आहे. पश्चिम भागातील अपघातस्थळ म्हणून कसबा बीड बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन कामास सुरुवात करणे आवश्यक आहे.कसबा बीड-महे बंधाऱ्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. हे ठिकाण अपघातस्थळ म्हणून परिचित आहे. या बंधाऱ्यामुळे ४० गावांचे जनजीवन ठप्प होते. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लोकांनी लढा पुकारून तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे. - कॉ. नामदेवराव गावडे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभाकसबा बीड हा बंधारा सध्या धोकादायक अपघात क्षेत्र बनला आहे. बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूला मोठा चढ आहे. दुतर्फा भराव टाकलेला नाही. नव्या पर्यायी उड्डाणपुलाची उभारणी करणे गरजेचे आहे. - भगवान सूर्यवंंशी, काँग्रेस (आय) पक्ष