शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कसबा बावडा जलउपसा केंद्र बंदच

By admin | Updated: December 16, 2014 00:18 IST

लाखोंची मशिनरी ‘स्क्रॅप’ : तीन वर्षांपासून टाळे असल्याने केंद्राच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य

रमेश पाटील - कसबा बावडा -राजाराम बंधाऱ्याजवळील बावडा जल उपसा केंद्र गेल्या अडीच वर्षांपासून बंद करण्यात आल्याने उपसा केंद्रातील लाखो रुपयांची मशिनरी आता स्क्रॅप झाली आहे. दरम्यान, हे उपसा केंद्र सध्या स्टँडबाय ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.या उपसा केंद्रातून दूषित पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे हे केंद्र त्वरित बंद करावे व शिंगणापूर उपसा केंद्रातून उपसलेले पाणी फिल्टर करून ‘ई’ वॉर्डला पुरवावे, अशी मागणी होत होती. त्यामुळे बावडा जलउपसा केंद्र बंद करण्यात आले. या केंदा्रतील पाण्याच्या मोटारीचा वापर फक्त अन्य ठिकाणी होऊ शकला. अन्य माशिनरीचा वापर मात्र महापालिकेला अन्य ठिकाणी करता येऊ शकलेला नाही. कारण मशिनरी हे बांधकामाच्या डिझाईननुसार तयार करून बसविण्यात आल्या होत्या. पाणी उपसा केंद्राने अंतर, पाईप, पंप, मोटारे आदी उपसा केंद्राच्या क्षमतेनुसार बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या साहित्याचा अन्य ठिकाणी उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या ही मशिनरी स्क्रॅप झाली आहे.दरम्यान, उपसा केंद्र जरी बंद असले, तरी या केंद्राच्या आवारात बुधवार, शुक्रवार आणि रविवारी रस्सामंडळ पार्टी होत आहेत. त्यामुळे उपसा केंद्राच्या समोरच मद्याच्या बाटल्या आणि कचरा वाढत चालला आहे. या उपसा केंद्राची इमारत मात्र अद्यापही टोलेजंग अशी आहे. या इमारतीचा उपयोग असा काही कारणासाठीच होतो काय, हे महापालिकेने पाहणे गरजेचे आहे. उपसा केंद्राचा आवार खूप मोठा आहे. उपसा केंद्र सध्या स्टँडबाय अवस्थेत असले, तरी भविष्यात त्याचा वापर पूरनियंत्रण कक्ष किंवा एखाद्या गोडावूनसाठी होऊ शकतो. महापालिकेने त्यादृष्टीने त्याकडे पाहणे गरजेचे आहे.मशिनरीचा वापर होऊ शकत नाहीसध्या उपसा केंद्र बंद आहे. शक्य आहे त्या मशिनरींचा वापर अन्यत्र करण्यात आला आहे. मात्र, अन्य इतर मशिनरींचा दुसऱ्या ठिकाणी वापर होऊ शकत नाही. ही वस्तूस्थिती आहे.- मनीष पवार, जल अभियंता, कोल्हापूर महानगरपालिका