शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

कर्नाटकात उद्योजकांना 'बुरे दिन'

By admin | Updated: May 28, 2015 00:59 IST

मुरगेश निराणी : राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत, काँग्रेस सरकारमुळे उद्योगवाढीला ब्रेक

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर महाराष्ट्रातील उद्योजकांना कर्नाटकात या म्हणून एकिकडे कर्नाटक सरकार पायघड्या घालत असताना दुसरीकडे कर्नाटकातील उद्योजक राज्यात पुरेशा दर्जेदार सेवासुविधा मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना ‘बुरे दिन’ आले आहेत. परिणामी, बाहेरच्या राज्यात जाण्याच्या मानसिकतेत ते आहेत. कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.निराणी एका कार्यक्रमानिमित्त येथे आले होते. त्यावेळी त्यांच्याशी बातचित केली. गेल्या दोन वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक कर्नाटकात जाण्याचा इशारा देत आहेत; त्यामुळे कर्नाटकात उद्योगवाढीचे धोरण काय, असे विचारले असता ते म्हणाले, कर्नाटकात भाजप सत्तेवर असताना उद्योजकांना चांगले दिवस होते. बी. एस. येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना हत्तरगी (ता. हुक्केरी) जवळ ‘एसईझेड’मध्ये मोठा आयटी उद्योग आला आहे. सलग तीन वर्षे आम्ही बंगलोरमध्ये जागतिक स्तरावरील औद्योगिक प्रदर्शन (मेळावा) भरविला होते. जिल्हानिहाय कोणते उद्योग चालू शकतात, याचा आराखडा तयार केला होता. इच्छुक उद्योजकांना भूखंडही दिले होते. दरम्यान, सन २०१३ मध्ये कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेवर आला अन् उद्योगवाढीला ब्रेक लागला. आम्ही तयार केलेला आराखडा धूळ खात पडून आहे. राज्यात नवे मोठे उद्योग आणण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत; त्यामुळे कर्नाटकातील उद्योजक नाराज आहेत. पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांना ‘बुरे दिन’ आले आहेत. त्यामुळे अनेक उद्योजक बाहेरच्या राज्यांत जाण्याच्या मानसिकतेत आहेत. नव्या साखर कारखान्यांना परवाना नकोकारखानदारी वाढल्याने उसाचे क्षेत्र वाढत आहे. साखरेचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन नियंत्रित करण्यासाठी पुढील पाच वर्षांत नव्या साखर कारखान्यांना परवानगी देऊ नये. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन, सहविद्युत प्रकल्प अशा माध्यमांतून अडचणीतील साखर उद्योगाला सावरणे शक्य आहे, असेही निराणी यांनी सांगितले.