शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST

आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा नगरपालिकेच्या ‘कारभारा’ची जबाबदारी मात्र झटकण्याचा प्रयत्न अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी ...

आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा

नगरपालिकेच्या ‘कारभारा’ची जबाबदारी मात्र झटकण्याचा प्रयत्न

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : वस्त्रनगरीचा विकास करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे प्रलंबित आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी धडपडण्याऐवजी मंजूर झालेल्या एखाद्या कामाचे श्रेय घेण्यातच धडपड सुरू आहे. मंजूर झालेले हे काम माझ्यामुळेच झाले, असा दावा करीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. विकासकामांच्या श्रेयवादात रंगलेल्या व्यक्तींच्या ताब्यातच इचलकरंजीची नगरपालिका आहे. तेथील ‘कारभारा’विषयी मात्र जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातो. याकडे पाहताना खरच शहराची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.

शहराचा विकास होण्यासाठी आजी-माजी आमदार, खासदारांसह नगरपालिकेचा कारभार यांच्या संयुक्त सामंजस्यातून राज्य, तसेच केंद्र शासनाकडे संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु, इचलकरंजीतील राजकारण वेगळ्याच वळणावर निघाले आहे.

अशा शह-काटशहाच्या नीतीमुळे विकासकामांना गती मिळण्याऐवजी खीळ बसत चालली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण कामे खोळंबली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इचलकरंजीला मंजूर झालेले आरटीओ कार्यालय. त्यावेळी या कामामध्येही सुरुवातीला श्रेयवाद रंगला. त्यानंतर शह-काटशहाचे राजकारण झाले आणि मंजूर झालेले एम-५० हे आरटीओ कार्यालय कऱ्हाडला वर्ग झाले. त्याचबरोबर काळम्मावाडीतून थेट पाईपलाईन , वारणा योजना एकूणच इचलकरंजीचा पाणीप्रश्न आजही प्रलंबित आहे. अशा सर्व प्रश्नांवर शहरातील सर्व राजकीय व्यक्तींनी आपापल्यापरीने एकत्रित प्रयत्न केले असते, तर शहराचा नक्कीच विकास झाला असता.

निवडणुकीच्या काळात श्रेयवाद, आरोप-प्रत्यारोप करा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट -

शहराच्या राजकारणाचे मंत्र्यांकडे रडगाणे

आमदार प्रकाश आवाडे यांनी यापूर्वी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री इचलकरंजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही राजकारण वातावरण तापले होते. त्यानंतर आता श्रेयवाद रंगला. त्यामुळे अमूक विकासकामे आपल्याचमार्फत झाले असल्याचे सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी आपणासोबत झालेला पत्रव्यवहार दाखविला पाहिजे, मीटिंग घेतली पाहिजे, अशा भावनेतून स्थानिक नेते मंत्र्यांकडे रडगाणे मांडतात. त्यातून शहरातील असले राजकारण सर्वदूर पोहोचते, याचेही भान आवश्यक आहे.