शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST

आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा नगरपालिकेच्या ‘कारभारा’ची जबाबदारी मात्र झटकण्याचा प्रयत्न अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी ...

आमदार - महाविकास आघाडी प्रतिनिधी यांच्यात कलगीतुरा

नगरपालिकेच्या ‘कारभारा’ची जबाबदारी मात्र झटकण्याचा प्रयत्न

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : वस्त्रनगरीचा विकास करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे प्रलंबित आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी धडपडण्याऐवजी मंजूर झालेल्या एखाद्या कामाचे श्रेय घेण्यातच धडपड सुरू आहे. मंजूर झालेले हे काम माझ्यामुळेच झाले, असा दावा करीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. विकासकामांच्या श्रेयवादात रंगलेल्या व्यक्तींच्या ताब्यातच इचलकरंजीची नगरपालिका आहे. तेथील ‘कारभारा’विषयी मात्र जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जातो. याकडे पाहताना खरच शहराची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.

शहराचा विकास होण्यासाठी आजी-माजी आमदार, खासदारांसह नगरपालिकेचा कारभार यांच्या संयुक्त सामंजस्यातून राज्य, तसेच केंद्र शासनाकडे संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु, इचलकरंजीतील राजकारण वेगळ्याच वळणावर निघाले आहे.

अशा शह-काटशहाच्या नीतीमुळे विकासकामांना गती मिळण्याऐवजी खीळ बसत चालली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण कामे खोळंबली. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे इचलकरंजीला मंजूर झालेले आरटीओ कार्यालय. त्यावेळी या कामामध्येही सुरुवातीला श्रेयवाद रंगला. त्यानंतर शह-काटशहाचे राजकारण झाले आणि मंजूर झालेले एम-५० हे आरटीओ कार्यालय कऱ्हाडला वर्ग झाले. त्याचबरोबर काळम्मावाडीतून थेट पाईपलाईन , वारणा योजना एकूणच इचलकरंजीचा पाणीप्रश्न आजही प्रलंबित आहे. अशा सर्व प्रश्नांवर शहरातील सर्व राजकीय व्यक्तींनी आपापल्यापरीने एकत्रित प्रयत्न केले असते, तर शहराचा नक्कीच विकास झाला असता.

निवडणुकीच्या काळात श्रेयवाद, आरोप-प्रत्यारोप करा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चौकट -

शहराच्या राजकारणाचे मंत्र्यांकडे रडगाणे

आमदार प्रकाश आवाडे यांनी यापूर्वी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री इचलकरंजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही राजकारण वातावरण तापले होते. त्यानंतर आता श्रेयवाद रंगला. त्यामुळे अमूक विकासकामे आपल्याचमार्फत झाले असल्याचे सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी आपणासोबत झालेला पत्रव्यवहार दाखविला पाहिजे, मीटिंग घेतली पाहिजे, अशा भावनेतून स्थानिक नेते मंत्र्यांकडे रडगाणे मांडतात. त्यातून शहरातील असले राजकारण सर्वदूर पोहोचते, याचेही भान आवश्यक आहे.