शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

दूषित पाण्यामुळे कळंबेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST

कळंबा : कळंबा पाचगावसह लगतच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचू लागल्या आहेत. मिळणारे पाणी कमी दाबाने, कमी वेळेपुरते ...

कळंबा : कळंबा पाचगावसह लगतच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचू लागल्या आहेत. मिळणारे पाणी कमी दाबाने, कमी वेळेपुरते उपलब्ध होत असल्याने दैनंदिन निकडीच्या गरजा भागवण्यासाठी नागरिकांना विहिरी बोअरवेल विकतच्या पाण्याचा टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या पाण्याचे शुद्धिकरण योग्य प्रमाणात झाले नसल्याने संसर्गजन्य आजार बळावत आहेत.

काही ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलमध्ये परिसरातील अशुद्ध सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी पिण्यासाठी योग्य राहिले नाही. कळंबा तलावातील पाणी लगतच्या ग्रामीण भागासह उपनगरात वितरित केले जाते. परंतु वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून हिरवा पडला आहे शिवाय पाण्याचा उग्र घाण वास येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईमुळे टँकरचा वापर केला जात असला तरी टँकरमधून मिळणारे पाणीसुद्धा स्वच्छ नसल्याने नागरिकांना उलट्या, हगवण, अंगास आग उठणे, पचनाचे विकार व अन्य आजारांचा सामना करावा लागत आहे.

प्रदूषित पाणी पिल्याने मळमळ उलट्याचा त्रास होत आहे. हेच अशुद्ध पाणी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवल्यास यात आळ्या आढळून येते आहेत. अशुद्ध पाणी आंघोळ, स्वयंपाक, पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वापरल्याने विविध प्रकारचे त्वचेचे आजार बळावत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करून वापरणे क्रमप्राप्त बनले आहे.