शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

दूषित पाण्यामुळे कळंबेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST

कळंबा : कळंबा पाचगावसह लगतच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचू लागल्या आहेत. मिळणारे पाणी कमी दाबाने, कमी वेळेपुरते ...

कळंबा : कळंबा पाचगावसह लगतच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा पोहोचू लागल्या आहेत. मिळणारे पाणी कमी दाबाने, कमी वेळेपुरते उपलब्ध होत असल्याने दैनंदिन निकडीच्या गरजा भागवण्यासाठी नागरिकांना विहिरी बोअरवेल विकतच्या पाण्याचा टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या पाण्याचे शुद्धिकरण योग्य प्रमाणात झाले नसल्याने संसर्गजन्य आजार बळावत आहेत.

काही ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलमध्ये परिसरातील अशुद्ध सांडपाणी मिसळत असल्याने हे पाणी पिण्यासाठी योग्य राहिले नाही. कळंबा तलावातील पाणी लगतच्या ग्रामीण भागासह उपनगरात वितरित केले जाते. परंतु वाढत्या प्रदूषणामुळे पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून हिरवा पडला आहे शिवाय पाण्याचा उग्र घाण वास येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईमुळे टँकरचा वापर केला जात असला तरी टँकरमधून मिळणारे पाणीसुद्धा स्वच्छ नसल्याने नागरिकांना उलट्या, हगवण, अंगास आग उठणे, पचनाचे विकार व अन्य आजारांचा सामना करावा लागत आहे.

प्रदूषित पाणी पिल्याने मळमळ उलट्याचा त्रास होत आहे. हेच अशुद्ध पाणी दोन दिवसांपेक्षा जास्त काळ साठवल्यास यात आळ्या आढळून येते आहेत. अशुद्ध पाणी आंघोळ, स्वयंपाक, पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वापरल्याने विविध प्रकारचे त्वचेचे आजार बळावत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करून वापरणे क्रमप्राप्त बनले आहे.