शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कळंबा कारागृहाच्या सुरक्षेलाच ‘सुरुंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST

कोल्हापूर : राज्यातील महत्वाच्या कारागृहांपैकी एक असलेल्या येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या दहा दिवसात मोबाईलसह बॅटऱ्या, पेनड्राईव्ह, गांजा सापडल्याच्या ...

कोल्हापूर : राज्यातील महत्वाच्या कारागृहांपैकी एक असलेल्या येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या दहा दिवसात मोबाईलसह बॅटऱ्या, पेनड्राईव्ह, गांजा सापडल्याच्या घटना लागोपाठ घडल्या. अतिसुरक्षित व्यवस्था, भक्कम तटबंदीला भगदाड पाडून या वस्तू कैद्यांपर्यंत पोहोचतात. गेल्या चार-पाच वर्षात अशा अनेक घटना घडल्या, त्यांचे व्हिडीओही व्हायरल झाले, कर्मचाऱ्यांच्या बदल्याही झाल्या. परंतु, त्यानंतरही या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कळंबा कारागृहात कोल्हापूरसह मुंबई, पुणे व राज्यातील तसेच परराज्यातील कैदी आहेत. या कारागृहात गंभीर गुन्ह्यांसह जहाल, धोकादायक कैदी तसेच मोक्कांतर्गत २५ टोळ्यांमधील साडेचारशेहून अधिक गुंड आहेत. मात्र, सद्यस्थितीत या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. कारागृहात ओल्या-गांजा पार्टी चालतात, कैदीही मोबाईल वापरतात, त्याचे चार्जिंगही करुन दिले जाते, त्यासाठी कैद्यांकडून काही कर्मचारी आर्थिक मोबदला घेतात, असा आरोप २०१५मध्ये जामीनावर सुटलेल्या कैद्याने केला होता. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. यावरुनच कारागृहाची सुरक्षा किती ‘भक्कम’ आहे, ते दिसते.

गेल्या दहा दिवसात कारागृहातील तीन घटनांमध्ये १२ मोबाईलसह बॅटऱ्या, पेनड्राईव्ह, गांजा कैद्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. भाजीपाला, बांधकाम साहित्यातून तसेच बुटातूनच मोबाईल लपवून सुरक्षा व्यवस्था भेदल्याचे स्पष्ट झाले. अधिकारी रजेवर अथवा बदलीवर गेल्यानंतरच नवीन अधिकाऱ्यांच्या झडतीत मोबाईल सापडल्याच्या घटना घडतात. त्यामुळे येथील अधिकारी व सुरक्षा रक्षकांच्या राजकारणाचाही फटका सुरक्षा व्यवस्थेला बसत आहे.

क्षमतेपेक्षा अधिक कैदी, कमी सुरक्षा

कळंबा कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता १,७८९ आहे, प्रत्यक्षात याठिकाणी सुमारे २,४०० कैदी आहेत. तसेच ४० बराक असून, १० अंडा सेल आहेत. या कारागृहासाठी १५८ अधिकारी व कर्मचारी मंजूर असताना प्रत्यक्षात १३७ कर्मचारीच कार्यरत आहेत.

तीन अधिकारी, २८ कर्मचाऱ्यांची बदली

२०१६मध्ये कारागृहात गांजा पार्टीसह मोबाईल सापडल्याबद्दल अक्षीक्षकांसह १२ सुरक्षा रक्षकांचे निलंबन झाले, तर २०१९मध्ये कैदी संतोष पोळने बनावट रिव्हॉल्व्हरचा व्हिडीओ व्हायरल केल्याने १६ कर्मचारी निलंबित झाले. तीन तुरुंग अधिकाऱ्यांसह १५ कर्मचाऱ्यांची चौकशीही झाली.

मोबाईल सापडतात, सीमकार्ड गायब

कारागृहात मोबाईल सापडतात, सीमकार्ड नाही यात काहीतरी गौडबंगाल आहे. सीमकार्ड सापडल्यास कॉल डिटेल्स, किती दिवस वापरले आदी रेकॉर्ड पोलीस तपासात उजेडात येईल, यासाठी सीमकार्डच नष्ट केले जात असल्याची चर्चा आहे.

पुण्यातील कैद्यांकडे संशयाची सुई

दीड महिन्यांपूर्वी चेंडूत गांजा भरुन फेकताना पुण्यातील तीन युवक सापडले. त्याचा तपास सुरु असतानाच दहा दिवसांपूर्वी चारचाकीतून आलेल्या युवकांनी कारागृहात मोबाईल, गांजाचे गठ्ठे फेकले. हे वाहन पुन्हा पुण्याच्या दिशेने गेल्याचे किणी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले.