शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

कागलचे बाप-लेक अपघातात ठार

By admin | Updated: January 10, 2016 01:05 IST

कुटुंबातील तिघे जखमी : यवतमाळ जिल्ह्यात कळंबजवळ थांबलेल्या ट्रकवर कार आदळली

कळंब : यवतमाळ जिल्ह्यातील कळंबनजीक थांबलेल्या ट्रकवर स्विफ्ट कार आदळून झालेल्या भीषण अपघातात विवाहित मुलगीसह पिता ठार, तर तीनजण जखमी झाले. अपघातातील मृत आणि जखमी कागल (जि. कोल्हापूर) येथील आहेत. मृतांमध्ये स्वाती सुनील मांगले (वय ४०) आणि सेवानिवृृत्त जवान पांडुरंग बापू साठे (६५, रा. कागल, जि. कोल्हापूर) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुनील बंडूजी मांगले (४५), दीपक सुनील मांगले (११) आणि वैभव सुनील मांगले (६) यांना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. यवतमाळ-नागपूर मार्गावर कळंबनजीकच्या माथा वस्तीजवळ शनिवारी पहाटे ६ वाजता हा अपघात झाला. सुनील मांगले कामठी (जि. नागपूर) येथे सैन्यदलात कार्यरत आहेत. हणबरवाडी येथून स्विफ्ट कारने (एमएच १२ एफएस ९०९९) कामठीला जात होते. ही कार पांडुरंग साठे चालवित होते. दरम्यान, येथून एक किलोमीटरवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थांबलेल्या ट्रकवर (यूपी ७८ सीटी १२२१) आदळली. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. यात स्वाती मांगले आणि पांडुरंग साठे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह जेसीबीने ओढून बाहेर काढावे लागले. नागरिकांनी जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात व तेथून नागपूरला हलविण्यात आले. अपघातग्रस्त कारमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. मृत महिला आणि जखमींच्या अंगावरील आणि डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने पोलिसांजवळ सुरक्षित आहेत. जमादार चंद्रशेखर ठाकरे यांनी ते ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी) कागलवर शोककळा कागल : पांडुरंग साठे व विवाहित मुलगी स्वाती सुनील मांगले हे भीषण अपघातात ठार झाल्याचे वृत्त येथे येताच येशीला पार्क परिसरात तसेच साठे यांचे गाव हणबरवाडी (ता. कागल) येथे दु:खाचे सावट पसरले. अपघाताचे वृत्त मिळताच नातेवाईक, मित्र यवतमाळकडे रवाना झाले. पांडुरंग साठे सेवानिवृत्त जवान आहेत. निवृत्तीनंतर काही काळ शाहू साखर कारखान्यात चालक म्हणून नोकरी करीत होते. त्यामुळे ते येथील येशीला पार्कात राहात होते. त्यांचे जावई सुनील मांगले यांचे गाव माद्याळ (ता. कागल) आहे. ते सैन्यात आहेत. नागपुरात ते नोकरीस आहेत. पांडुरंग साठे यांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न कागल येथे झाले. ६ जानेवारीला स्वागत समारंभही झाला. सुनील यांनी नवीन स्विफ्ट कार खरेदी केली होती. ती नागपूरला घेऊन जाण्यासाठी त्यांनी सासरे साठे यांना सोबत घेतले. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सासरा, जावई, मुलगी, दोन नातू रवाना झाले होते. कळंब येथे शनिवारी सकाळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. (प्रतिनिधी)