शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

कामाच्या ताणामुळे आत्महत्येचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:59 IST

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८, रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर तुळशी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ...

ठळक मुद्दे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८, रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर तुळशी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ‘झिरो पेंडन्सी’च्या कामाच्या अतिरेकामुळे झाल्याचा आरोप करून वरिष्ठ अधिकाºयांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच ‘काम बंद आंदोलन’ जाहीर केले.‘झिरो पेंडन्सी’साठी गेले काही दिवस जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचाºयांना रविवारची सुटीही दिली नाही. अशातच चार दिवसांपूर्वी या कामाच्या पाहणीसाठी पुण्याहून आलेले सहायक आयुक्त विलास जाधव यांच्या पाहणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका कर्मचाºयाला निलंबित केले, तर एकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.जिल्'ातील सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत गेले महिनाभर केवळ हेच काम सुरू असल्याने कर्मचाºयांना सुटीच्या दिवशीही कामावर यावे लागत आहे. गुरव हे दोन दिवस तणावाखालीच होते. हे काम आपल्याला झेपत नसल्याचे ते सहकाºयांना सांगत होते. मात्र ‘आपण सर्वजण मिळून तुमचे काम करू,’ असे सांगून इतरांनी त्यांची समजूत काढली. रविवारी सकाळी गुरव हे घरातून साडेनऊ वाजता बाहेर पडले. तेथून माळ्याची शिरोली येथे सासुरवाडीला गेले. तेथून साडेदहा वाजता ते बाचणी येथील तुळशी नदीवर असणाºया बंधाºयाजवळ आले. तेथे त्यांनी मोटारसायकल लावली आणि ‘ग्रामोझोन’ या तणनाशकाचे प्राशन केले. ते पिऊन त्यांनी तुळशी नदीत उडी घेतली. तेथील शेतकºयांनी हा प्रकार पाहून त्यांना तातडीने नदीतून बाहेर काढून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. थोड्याच वेळात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.विनाकारण कुणाचेही निलंबन होणार नाही‘झिरो पेंडन्सी’मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने चांगले काम केले आहे. हे सर्व कर्मचाºयांचे योगदान आहे. मात्र ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने त्याचा ताण घेऊ नये. विनाकारण कुणालाही निलंबित करणे किंवा नोटीस देण्याचे प्रकार घडणार नाहीत अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी दिली. -वृत्त/४