शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

कामाच्या ताणामुळे आत्महत्येचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:59 IST

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८, रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर तुळशी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ...

ठळक मुद्दे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर : कामाच्या अतिताणामुळे करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव (वय ४८, रा. कुर्डू, ता. करवीर) यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर तुळशी नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर संतप्त झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी हा प्रकार केवळ ‘झिरो पेंडन्सी’च्या कामाच्या अतिरेकामुळे झाल्याचा आरोप करून वरिष्ठ अधिकाºयांचा निषेध करीत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच ‘काम बंद आंदोलन’ जाहीर केले.‘झिरो पेंडन्सी’साठी गेले काही दिवस जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचाºयांना रविवारची सुटीही दिली नाही. अशातच चार दिवसांपूर्वी या कामाच्या पाहणीसाठी पुण्याहून आलेले सहायक आयुक्त विलास जाधव यांच्या पाहणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी एका कर्मचाºयाला निलंबित केले, तर एकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.जिल्'ातील सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत गेले महिनाभर केवळ हेच काम सुरू असल्याने कर्मचाºयांना सुटीच्या दिवशीही कामावर यावे लागत आहे. गुरव हे दोन दिवस तणावाखालीच होते. हे काम आपल्याला झेपत नसल्याचे ते सहकाºयांना सांगत होते. मात्र ‘आपण सर्वजण मिळून तुमचे काम करू,’ असे सांगून इतरांनी त्यांची समजूत काढली. रविवारी सकाळी गुरव हे घरातून साडेनऊ वाजता बाहेर पडले. तेथून माळ्याची शिरोली येथे सासुरवाडीला गेले. तेथून साडेदहा वाजता ते बाचणी येथील तुळशी नदीवर असणाºया बंधाºयाजवळ आले. तेथे त्यांनी मोटारसायकल लावली आणि ‘ग्रामोझोन’ या तणनाशकाचे प्राशन केले. ते पिऊन त्यांनी तुळशी नदीत उडी घेतली. तेथील शेतकºयांनी हा प्रकार पाहून त्यांना तातडीने नदीतून बाहेर काढून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. थोड्याच वेळात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.विनाकारण कुणाचेही निलंबन होणार नाही‘झिरो पेंडन्सी’मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने चांगले काम केले आहे. हे सर्व कर्मचाºयांचे योगदान आहे. मात्र ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने त्याचा ताण घेऊ नये. विनाकारण कुणालाही निलंबित करणे किंवा नोटीस देण्याचे प्रकार घडणार नाहीत अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी रविवारी दिली. -वृत्त/४