शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

के. पीं.च्या आघाडीला दादांच्या ताकदीचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:12 IST

शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : गेली दहा वर्षे बिद्री कारखान्यात केलेला मनमानी कारभार, कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, जिल्ह्यातील अनेक नेत्यांची केलेली फसवणूक यातून बिद्रीच्या सत्तेचा राज्यमार्ग काढण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांना चंद्रकांतदादांच्या (भाजपच्या) ताकदीची आवश्यकता का हवीशी वाटली आहे? कारखाना प्रचंड नफ्यात आणला असा ...

शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : गेली दहा वर्षे बिद्री कारखान्यात केलेला मनमानी कारभार, कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, जिल्ह्यातील अनेक नेत्यांची केलेली फसवणूक यातून बिद्रीच्या सत्तेचा राज्यमार्ग काढण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांना चंद्रकांतदादांच्या (भाजपच्या) ताकदीची आवश्यकता का हवीशी वाटली आहे? कारखाना प्रचंड नफ्यात आणला असा दावा करणाºया या जोडीला आता भाजपच्या सोबतीची निकड का? घराणेशाही, तोडणी कार्यक्रमाचा वचपा मतदार काढतील अशी भीती? अपात्र सभासदांचा मुद्दा ‘किमयागार’ होण्यात कमी पडत आहे का?माजी आमदार के. पी. पाटील यांनी भाजपशी युती केल्यानंतर सर्वसामान्य मतदारांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले आहे. हजारो सभासद अपात्र केल्याची टीका आमदार आबिटकर गटावर करीत गावागावांत संपर्क सभांचा सपाटा लावला असताना भाजप आणि के. पी. यांची युती म्हणजे के. पी. पाटील गटाने आत्मविश्वास गमावल्याचे द्योतक आहे का? म्हणूनच आघाडी केल्याची जोरदारपणे चर्चा सुरू झाली आहे.भाजप पर्यायाने चंद्रकांतदादा यांच्या कारभाराची खिल्ली उडवणारी आणि त्यांच्यावर प्रचंड टीका करणारी त्याचबरोबर चंद्रकांतदादांच्या घरावर मोर्चा काढणारी हसन-किसनची जोडी आज मात्र बिद्रीच्या राजकारणात सत्तेच्या मोहासाठी भाजप- राष्ट्रवादीच्या युतीबद्दल ढोल-ताशा बडवताना दिसत आहे. आजपर्यंत एकाही भाजपच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने या युतीला दुजोरा दिलेला नाही. सध्यातरी केवळ के. पी. पाटील यांना या युतीचे प्रचंड डोहाळे लागले आहेत असंच दिसतंय.विरोधकांनी अभ्यासपूर्ण कागदोपत्री पुराव्यांसह शोधलेले प्रचंड भ्रष्टाचाराचे मुद्दे, त्या मुद्द्यांवर आक्रमक असलेले विरोधक, त्यातून के.पीं.च्या भ्रष्टाचाराची होणारी पोलखोल यामुळे माजी आमदार के. पी. पाटील भलतेच भयभीत झाले आहेत. येणाºया काळात शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठीच निष्कलंक, राज्य शासनात प्रचंड प्रभाव असणाºया मंत्री चंद्रकांतदादांना या पापाचा वाटेकरी करण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिद्रीच्या गत निवडणुकीतील के. पी. पाटील यांच्या आघाडीची रचना पाहता आणि सध्याच्या भाजपशी संधान बांधून के. पीं.नी काय वाढीव साध्य केले? असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या भाजपवासी असणारे कागलचे समरजितसिंह घाटगे, राधानगरीतील पनोरीचे भगवान पातले, फराळेचे बळवंत पाटील, भदरगडमधील युवा नेते देवराज बारदेसकर, कोनवडेचे ए. व्ही. पाटील, गंगापूर येथील अमर पाटील, वेंगरुळचे एन. के. देसाई, देवर्डेचे बाजीराव कोटकर, कडगावचे दिगंबर देसाई, पुष्पनगरचे जयवंत चोरगे, शिंदे सालपेवाडी हे जिल्हा परिषद, पं. स. निवडणूक लढवणारे सर्व कार्यकर्ते मागच्या निवडणुकीत ताकदीने के.पीं.च्या आघाडीबरोबर कार्यरत होते. केवळ माजी आमदार बजरंग अण्णांचा एक गट वगळता सर्व के. पीं.च्या बरोबर कार्यरत होते.याउलट के. पीं.च्या आघाडीमधून सरवडेचे माजी संचालक विजयसिंह मोरे, कडगाव तिरवडे येथील कोकण केसरी के. जी. नांदेकर हे बाहेर पडले आहेत. त्यांच्याबरोबर जाधव गुरुजी तळाशी, प्रकाश आबिटकरांच्या आमदारकीच्या काळात छोटेमोठे बाहेर पडलेले कार्यकर्ते, कागलमधून राजेखान जमादार बाहेर पडले आहेत.आबिटकर गट सक्रियके. जी. नांदेकर आणि विजयसिंह मोरे यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. केवळ आमदार आबिटकर गटाचे प्रमुख नेते म्हणून गटासाठी घेतलेल्या या भेटीने भाजप नेते वेगळ्याच भूमिकेत पोहोचले आहेत. यापुढे भाजप आणि आमदार आबिटकर गट एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास नवल वाटू नये!