शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

के. पीं.च्या आघाडीला दादांच्या ताकदीचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:12 IST

शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : गेली दहा वर्षे बिद्री कारखान्यात केलेला मनमानी कारभार, कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, जिल्ह्यातील अनेक नेत्यांची केलेली फसवणूक यातून बिद्रीच्या सत्तेचा राज्यमार्ग काढण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांना चंद्रकांतदादांच्या (भाजपच्या) ताकदीची आवश्यकता का हवीशी वाटली आहे? कारखाना प्रचंड नफ्यात आणला असा ...

शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : गेली दहा वर्षे बिद्री कारखान्यात केलेला मनमानी कारभार, कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, जिल्ह्यातील अनेक नेत्यांची केलेली फसवणूक यातून बिद्रीच्या सत्तेचा राज्यमार्ग काढण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांना चंद्रकांतदादांच्या (भाजपच्या) ताकदीची आवश्यकता का हवीशी वाटली आहे? कारखाना प्रचंड नफ्यात आणला असा दावा करणाºया या जोडीला आता भाजपच्या सोबतीची निकड का? घराणेशाही, तोडणी कार्यक्रमाचा वचपा मतदार काढतील अशी भीती? अपात्र सभासदांचा मुद्दा ‘किमयागार’ होण्यात कमी पडत आहे का?माजी आमदार के. पी. पाटील यांनी भाजपशी युती केल्यानंतर सर्वसामान्य मतदारांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले आहे. हजारो सभासद अपात्र केल्याची टीका आमदार आबिटकर गटावर करीत गावागावांत संपर्क सभांचा सपाटा लावला असताना भाजप आणि के. पी. यांची युती म्हणजे के. पी. पाटील गटाने आत्मविश्वास गमावल्याचे द्योतक आहे का? म्हणूनच आघाडी केल्याची जोरदारपणे चर्चा सुरू झाली आहे.भाजप पर्यायाने चंद्रकांतदादा यांच्या कारभाराची खिल्ली उडवणारी आणि त्यांच्यावर प्रचंड टीका करणारी त्याचबरोबर चंद्रकांतदादांच्या घरावर मोर्चा काढणारी हसन-किसनची जोडी आज मात्र बिद्रीच्या राजकारणात सत्तेच्या मोहासाठी भाजप- राष्ट्रवादीच्या युतीबद्दल ढोल-ताशा बडवताना दिसत आहे. आजपर्यंत एकाही भाजपच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने या युतीला दुजोरा दिलेला नाही. सध्यातरी केवळ के. पी. पाटील यांना या युतीचे प्रचंड डोहाळे लागले आहेत असंच दिसतंय.विरोधकांनी अभ्यासपूर्ण कागदोपत्री पुराव्यांसह शोधलेले प्रचंड भ्रष्टाचाराचे मुद्दे, त्या मुद्द्यांवर आक्रमक असलेले विरोधक, त्यातून के.पीं.च्या भ्रष्टाचाराची होणारी पोलखोल यामुळे माजी आमदार के. पी. पाटील भलतेच भयभीत झाले आहेत. येणाºया काळात शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठीच निष्कलंक, राज्य शासनात प्रचंड प्रभाव असणाºया मंत्री चंद्रकांतदादांना या पापाचा वाटेकरी करण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बिद्रीच्या गत निवडणुकीतील के. पी. पाटील यांच्या आघाडीची रचना पाहता आणि सध्याच्या भाजपशी संधान बांधून के. पीं.नी काय वाढीव साध्य केले? असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या भाजपवासी असणारे कागलचे समरजितसिंह घाटगे, राधानगरीतील पनोरीचे भगवान पातले, फराळेचे बळवंत पाटील, भदरगडमधील युवा नेते देवराज बारदेसकर, कोनवडेचे ए. व्ही. पाटील, गंगापूर येथील अमर पाटील, वेंगरुळचे एन. के. देसाई, देवर्डेचे बाजीराव कोटकर, कडगावचे दिगंबर देसाई, पुष्पनगरचे जयवंत चोरगे, शिंदे सालपेवाडी हे जिल्हा परिषद, पं. स. निवडणूक लढवणारे सर्व कार्यकर्ते मागच्या निवडणुकीत ताकदीने के.पीं.च्या आघाडीबरोबर कार्यरत होते. केवळ माजी आमदार बजरंग अण्णांचा एक गट वगळता सर्व के. पीं.च्या बरोबर कार्यरत होते.याउलट के. पीं.च्या आघाडीमधून सरवडेचे माजी संचालक विजयसिंह मोरे, कडगाव तिरवडे येथील कोकण केसरी के. जी. नांदेकर हे बाहेर पडले आहेत. त्यांच्याबरोबर जाधव गुरुजी तळाशी, प्रकाश आबिटकरांच्या आमदारकीच्या काळात छोटेमोठे बाहेर पडलेले कार्यकर्ते, कागलमधून राजेखान जमादार बाहेर पडले आहेत.आबिटकर गट सक्रियके. जी. नांदेकर आणि विजयसिंह मोरे यांनी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. केवळ आमदार आबिटकर गटाचे प्रमुख नेते म्हणून गटासाठी घेतलेल्या या भेटीने भाजप नेते वेगळ्याच भूमिकेत पोहोचले आहेत. यापुढे भाजप आणि आमदार आबिटकर गट एकत्र येऊन निवडणूक लढविल्यास नवल वाटू नये!