शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

शेतकऱ्यांसाठी प्रशासनाचा उफराटा न्याय

By admin | Updated: May 17, 2016 01:17 IST

३५ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात : शेतीच्या पाण्यात १०० टक्के, तर उद्योगधंद्यांची २० टक्के पाणी कपात

प्रकाश पाटील- कोपार्डे --पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने १३ मेपासून शेतीच्या पाण्यासाठी संपूर्ण उपसाबंदी लागू केली आहे. मात्र, याचवेळी उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याला मात्र केवळ २० टक्के कपात लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा उद्योगधंद्यांना लागणारे पाणी अत्यल्प असल्याचा दावा यावेळी प्रशासकीय पातळीवर करण्यात येत असला तरी शेतीसाठीच्या पाण्याला दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य असताना १०० टक्के उपसाबंदी का? असा सवाल केला जात आहे. पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता १३ मेपासून शेतीसाठीच्या पाण्याला राधानगरी ते शिरोळ दरम्यानच्या भोगावती, पंचगंगा नद्यांच्या तीरावरील विद्युतपंपांना उपसाबंदी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राधानगरी धरणात केवळ पाऊण टी.एम.सी. (०.६९) पाणी शिल्लक आहे. जर जूनमध्ये पावसाला सुरुवात नाहीच झाली, तर १५ जुलैपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेतीसाठी पाणी देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे राधानगरी खोऱ्यासह पंचगंगा, भोगावती नदीच्या तीरावर असणारे ३५ हजार उसाचे क्षेत्र धोक्यात आले आहे. सध्या आॅक्टोबर हीटचा अनुभव येत असून, जिल्हा उष्णतेने करपतानाचे चित्र आहे. अशावेळी बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगात सुरू असते. यामुळे या काळात पिकांना पाण्याची आवश्यकता जास्त असते; पण संपूर्ण उपसाबंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना आता वरुणदेवाकडेच पावसासाठी प्रार्थना करण्याव्यतिरिक्त पर्याय उरलेला नसून बळिराजा अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांचा काळ कठीण सध्या साखरेला दर चांगला मिळत आहे. मात्र, कच्चा माल उपलब्ध होणाऱ्या मुख्य पंचगंगा व भोगावती खोऱ्यातील ३५ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र पाण्याच्या दुर्भीक्षाने अडचणीत आले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे हेक्टरी उत्पादनात फार मोठी घट होणार आहे. त्यामुळे गाळप उद्दिष्ट गाठण्याएवढा ऊस उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची पळवापळवी करावी लागणार आहे.