शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी प्रशासनाचा उफराटा न्याय

By admin | Updated: May 17, 2016 01:17 IST

३५ हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात : शेतीच्या पाण्यात १०० टक्के, तर उद्योगधंद्यांची २० टक्के पाणी कपात

प्रकाश पाटील- कोपार्डे --पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने १३ मेपासून शेतीच्या पाण्यासाठी संपूर्ण उपसाबंदी लागू केली आहे. मात्र, याचवेळी उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याला मात्र केवळ २० टक्के कपात लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा उद्योगधंद्यांना लागणारे पाणी अत्यल्प असल्याचा दावा यावेळी प्रशासकीय पातळीवर करण्यात येत असला तरी शेतीसाठीच्या पाण्याला दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य असताना १०० टक्के उपसाबंदी का? असा सवाल केला जात आहे. पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता १३ मेपासून शेतीसाठीच्या पाण्याला राधानगरी ते शिरोळ दरम्यानच्या भोगावती, पंचगंगा नद्यांच्या तीरावरील विद्युतपंपांना उपसाबंदी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. राधानगरी धरणात केवळ पाऊण टी.एम.सी. (०.६९) पाणी शिल्लक आहे. जर जूनमध्ये पावसाला सुरुवात नाहीच झाली, तर १५ जुलैपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेतीसाठी पाणी देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे राधानगरी खोऱ्यासह पंचगंगा, भोगावती नदीच्या तीरावर असणारे ३५ हजार उसाचे क्षेत्र धोक्यात आले आहे. सध्या आॅक्टोबर हीटचा अनुभव येत असून, जिल्हा उष्णतेने करपतानाचे चित्र आहे. अशावेळी बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगात सुरू असते. यामुळे या काळात पिकांना पाण्याची आवश्यकता जास्त असते; पण संपूर्ण उपसाबंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना आता वरुणदेवाकडेच पावसासाठी प्रार्थना करण्याव्यतिरिक्त पर्याय उरलेला नसून बळिराजा अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांचा काळ कठीण सध्या साखरेला दर चांगला मिळत आहे. मात्र, कच्चा माल उपलब्ध होणाऱ्या मुख्य पंचगंगा व भोगावती खोऱ्यातील ३५ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र पाण्याच्या दुर्भीक्षाने अडचणीत आले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे हेक्टरी उत्पादनात फार मोठी घट होणार आहे. त्यामुळे गाळप उद्दिष्ट गाठण्याएवढा ऊस उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची पळवापळवी करावी लागणार आहे.