शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

बस्स ! आता रडायचं नाय... लढायचं

By admin | Updated: October 16, 2016 00:07 IST

मागे हटायचं नाही, मराठा आरक्षण मिळवायचं : ऐतिहासिक दसरा चौकात धडाडली रणरागिणींच्या वक्तृत्वाची तोफ

कोल्हापूर : कोपर्डीत १६ वर्षांच्या निष्पाप मुलीवर झालेला अत्याचार, दोषींना शिक्षा ठोठावण्यात होत असलेला वेळकाढूपणा, अट्रॉसिटी कायद्याचा होणारा गैरवापर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण नसल्याने मराठा समाजातील मुलांची होणारी होरपळ या सगळ््या संतापाला शनिवारी सकल मराठा क्रांती मूक मोर्चाने वाट करून दिली. आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी पुतळ््यासमोर कोल्हापूरच्या पाच रणरागिणींच्या वक्तृत्वाच्या तोफा धडाडल्या. गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असलेला मराठा क्रांती मूक मोर्चा शनिवारी कोल्हापुरात निघाला. ‘न भूतो, न भविष्यती’ निघालेल्या अशा या मोर्चाचे नेतृत्व केले कोल्हापूरच्या रणरागिणींनी. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामित्वाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक दसरा चौकात दुपारी साडेबारा वाजता सई कुंडलिक पाटील (दोनवडे), प्रज्ञा प्रदीप जाधव (नवे पारगाव), तेजस्विनी संजय पांचाळ (कोल्हापूर), शिवानी नानासाो जाधव, स्नेहल दिलीपराव दुर्गुळे या कोल्हापूरच्या पाच कन्यांनी आपल्या भाषणांतून मोर्चामागील उद्देश विशद केला. सई पाटील म्हणाली, स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे. रयतेचे राज्य स्थापन करून माणुसकीचा, समानतेचा भगवा झेंडा फडकावला त्या महाराष्ट्रात आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत झालीच कशी, कोपर्डी येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशांचा माझ्या राजांनी कडेलोट, शिरच्छेद केला असता. आता त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. आता रडायचं नाही, लढायचं. मागे हटायचं नाही, मराठा आरक्षण मिळवायचं. स्नेहल दुर्गुळे म्हणाली, कोपर्डीतील बहिणीच्या अखेरच्या श्वासाने आम्ही बांधलो गेलो. क्रांतीसाठी रक्ताचा इतिहास लागतो, असे म्हणतात; अशा किती बहिणी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या अपेक्षित आहे. मराठा समाज आतापर्यंत देणारा होता आता मागणारा झालाय, पण ओरबडणारा नाही म्हणूनच हा मूकमोर्चा. गुणवत्ता नसेल तर खुशाल शिक्षणाची दारे बंद करा पण आरक्षण नाही म्हणून आता माघार नाही. अट्रॉसिटीच्या कायद्यात खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांवर तीव्र कारवाई झालीच पाहिजे. त्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायला पाहिजे. शिवानी जाधव म्हणाली, लाखोंचे विक्रम मोडत जिल्ह्या-जिल्ह्यांत निघणारे मराठ्यांचे मोर्चे कोणाला भीती घालण्यासाठी नाही. मोर्चात चालणारी माणसं फक्त शेतकऱ्यांची कोंडी फोडू मागताहेत. १६ वर्षांच्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या म्हणतोय आणि प्रत्येक गोष्टीत डावलल्या जाणाऱ्या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणतोय. तेजस्विनी पांचाळ म्हणाली, कोपर्डीच्या मुलीने आपल्याला एकत्र आणले. अट्रॉसिटी कायदा पूर्णपणे रद्द व्हावा, अशी आमची मागणी नाही पण त्याचा गैरवापर होता कामा नये, यासाठी तत्काळ सुधारणा करा. हा मूक मोर्चा असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. ही शांतता आहे तोपर्यंतच काय तो निर्णय घ्या, नाही तर एकदा का वादळ पेटलं तर कळायचं बी नाय काय होईल ते. आता इंग्लिशमध्ये सांगणार नाय तर अस्सल झणझणीत, सणसणीत कोल्हापुरी रांगड्या भाषेत सांगणार. ‘अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी समद्यांच्या म्होरं, आम्हा मराठ्यांची पोरं, छत्रपती शिवराय, शाहूराजेंचे इचार थोर समद्यांच्या म्होरं आम्ही मराठ्यांची पोरं.’ प्रज्ञा जाधव म्हणाली, एकमेकांशी खूप भांडलो, आपसांत खूप लढलो, अनेकांनी वापर केला, अनेकांचा प्रचार केला, अनेकांची ढाल झालो, अनेकांच्या मागं धावलो. आता हे घडणार नाही, मराठा बळी पडणार नाही. शब्दांना आग आली आहे. जिजाऊंची लेक जागी झाली आहे. आता मराठाच मराठ्यांना वाचवेल, यशाच्या शिखरांपर्यंत पोहोचवेल, दाखवू पुन्हा जगाला, काय असतो धाक मराठा, एक मराठा : लाख मराठा. कोल्हापूरच्या या रणरागिणी कन्यांचे भाषण झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रगीताने मूक मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)