शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण योजनेत ‘गूळ’ वितळणार

By admin | Updated: January 20, 2016 01:04 IST

फायद्यापेक्षा अडचणीच अधिक : शेतकऱ्यांना आगाऊ पैशासाठी व्याज मोजावे लागणार

राजाराम लोंढे -- कोल्हापूर -शेतमाल तारण योजनेत गुळाचा समावेश करण्याची तयारी सरकारने केली तरी बाजार समित्यांमधील सुविधा, गुळाचा टिकाऊपणा व शेतकऱ्यांची मानसिकता पाहता, ही योजना तडीस जाईल, असे वाटत नाही. समितीच्या ताब्यात गूळ देऊन त्यावर सहा टक्के व्याजाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मिळणार असले तरी बाजारपेठेत लवकर दर वाढले तर ठीक; अन्यथा व्याजासह मुद्दलही गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार असल्याने शेतकऱ्यांसाठी या योजनेत अडचणीच अधिक दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने १९९० मध्ये शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, भात, सूर्यफूल, आदी पंधरा शेतमालांचा समावेश करण्यात आला. सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुळाचा समावेश शेतमाल तारण योजनेत करण्याची घोषणा सोमवारी (दि. १८) केली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा आश्वासक निर्णय असला तरी गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या तो पचनी पडणे कठीण आहे. दर कमी असताना शेतकऱ्यांना घाईने गूळ विकायची गरज नाही. बाजारात ज्यावेळी दर चांगला असेल, त्यावेळी तो लावता येईल, हा या योजनेचा फायदा आहे. कोल्हापुरातील गूळ व्यवसायाची पद्धत वेगळी आहे. उत्पादित केलेला गूळ अडत्याकडे सौद्यासाठी लावला जातो. अडत्या सौद्यापूर्वीच शेतकऱ्यांना बिनव्याजी ८५ टक्के उचल देतो. पंधरा-तीन आठवड्यांनी गुळाची पट्टी होऊन हिशेब बघितला जातो. तारण योजनेमुळे बाजारात दर नसेल तर समितीच्या ताब्यात देऊन भविष्यात दर चांगला असेल त्यावेळी गूळ बाजारात लावता येतो. हे जरी खरे असले तरी समित्यांकडे कोल्ड स्टोअरेज नाहीत. शासनाच्या मदतीने कोल्ड स्टोअरेज उभी केली तरी स्टोअरेजमधील गूळ तीन दिवसांत पातळ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्याला मागणी राहणार का? हे महत्त्वाचे आहे. अडत दुकानात गूळ लावण्यासाठी फारच कमी शेतकरी येतात. गुऱ्हाळमालकच अडत्याकडे गूळ पाठवीत असल्याने दराबाबत निर्णय घ्यायचा कोणी? त्यात अडत्याकडून बिनव्याजी ८५ टक्के उचल मिळत असेल तर हा खटाटोप कशासाठी, अशी शेतकऱ्यांची मानसिकता आहे. तारण योजनेत फायद्यापेक्षा शेतकऱ्यांना अडचणीच अनेक असल्याने सरकारने जरी ठरविले तरी या योजनेत गूळ वितळण्याची शक्यता अधिक आहे. या शेती उत्पादनांचा आहे समावेश :तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, भात, करडई, सूर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा. तारण योजनेऐवजी ‘हमीभाव’ गरजेचागूळ उत्पादकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे; पण गूळ व्यवसायातील परिस्थिती पाहता तारण योजना यशस्वी होईल, असे नाही. त्याऐवजी गुळाला हमीभाव देण्याबाबत पणनमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पणनमंत्र्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे; पण समित्यांकडे कोल्ड स्टोअरेज नसल्याने अडचणी आहेत. त्यासाठी सरकारने मदत करावी. - परशराम खुडे,सभापती, बाजार समितीया योजनेत गुळाचा समावेश करताना काही दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. त्याबाबत पणनमंत्र्यांशी बोलून गुळासाठी चांगली योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करू. - भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना ७० लाखांच्या अंशदानचापरतावा शून्यकोल्हापूर जिल्ह्यातील चार बाजार समित्यांकडून पणन मंडळाला एकूण उलाढालीच्या पाच टक्के ‘अंशदान’ द्यावे लागते. जिल्ह्यातून वर्षाला ७० लाख रुपये ‘पणन’कडे जमा होतात. त्या बदल्यात ‘पणन’ समित्यांना काय देते ? कर्ज पाहिजे असेल तर आठ टक्के व्याजाने घ्यावे लागते. तरतुदीच्या चौपट उलाढाल‘पणन’ने २०१५-१६ मध्ये या योजनेसाठी (पंधरा शेतीमालासाठी) २०० कोटींची तरतूद केली आहे; पण एकट्या कोल्हापूर बाजार समितीची गुळाची २२५ कोटींची उलाढाल आहे. राज्यातील शेतीमालाच्या तुलनेत ही तरतूद फारच तोकडी असल्याने समित्यांना कसरत करावी लागणार आहे. समित्यांच्या हातात धुपाटणेच!पणन मंडळाकडून सहा टक्के व्याजाने घेऊन शेतकऱ्यांना आगाऊ पैसे द्यायचे, शेतकऱ्यांकडून वसुली करून ती पणन मंडळाला दिल्यानंतर समितीला व्याजातील तीन टक्के प्रोत्साहन अनुदान मिळणार; पण या तीन टक्क्यांसाठी शेतकऱ्यांचा माल सांभाळण्याची जोखीम घ्यावी लागणारच; पण भविष्यात दराची घसरणच राहिली तर शेतकऱ्यांना दिलेल्या आगाऊ रकमेची ही वसुली होणार नाही. त्यामुळे या निर्णयाने समित्यांच्या हातात शेवटी धुपाटणेच येणार हे नक्की. शेतमाल तारण योजना म्हणजे काय?शेतकऱ्यांनी बाजारात माल आणल्यानंतर त्यादिवशी जर दर योग्य वाटला नाही, तर त्यांनी समितीच्या ताब्यात माल द्यावा. या मोबदल्यात समितीने संबंधित शेतकऱ्यांना मालाच्या किमतीच्या (मालानुसार) ५० ते ७५ टक्के सहा टक्के व्याजाने आगाऊ पैसे द्यायचे. माल विकल्यानंतर ते पैसे शेतकऱ्यांकडून वसूल करायचे. वसूल सहा टक्के व्याजापैकी तीन टक्के पणन मंडळाला परतावा, तर तीन टक्के समितीला प्रोत्साहनपर अनुदान म्हणून मिळणार आहे.