शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

जिद्द आणि मेहनतीला संयमाची जोड हेच यशाचे गमक

By admin | Updated: June 16, 2015 01:14 IST

‘मीट द टॉपर’ चर्चासत्रातील सूर : प्रामाणिक प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षेत यश अवघड नाही

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटीबरोबरच संयमाची तितकीच आवश्यकता आहे़ पूर्व आणि मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत या चार टप्प्यांमधून जाताना उमेदवारांच्या संयमाची अग्निपरीक्षाच असते; पण प्रामाणिक प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे फार अवघड नाही, असा कानमंत्र पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उज्ज्वला भिंगुडे आणि प्रियांका पाटील यांनी दिला़ ‘लोकमत’तर्फे राजारामपुरी येथील डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवनात शनिवार (दि़ १३)पासून सुरू असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फे अर’चा समारोप सोमवारी झाला़ समारोपादिवशी दुपारी ‘मीट द टॉपर’ या सत्राचे आयोजन केले होते़ यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख आणि इव्हेंट मॅनेजर दीपक मनाठकर यांच्या हस्ते उज्ज्वला भिंगुडे आणि प्रियांका पाटील यांचा सत्कार करण्यात आला़ प्रमुख पाहुणे म्हणून स्टडी सर्कलचे केंद्र समन्वयक राहुल पाटील उपस्थित होते़ उज्ज्वला भिंगुडे म्हणाल्या, बी़ ई़ केल्यानंतर ‘पीएसआय’ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले़ पहिल्यापासूनच खाकी वर्दीचे आकर्षण असल्याने या परीक्षेकडे वळले़ दररोज सहा तास नियोजनबद्ध अभ्यास केला. परीक्षा कोणत्याही असो, पालकांचे मनोधैर्य हे खूप महत्त्वाचे असते़; पण करिअरबाबतचा निर्णय हा आपण स्वत:च घ्यावा़ ‘लोकमत’ने अगदी योग्य वेळी शैक्षणिक प्रदर्शन घेतले असून, त्याचा फ ायदा विद्यार्थ्यांना होईल़ प्रियांका पाटील म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संयमाची खूप गरज आहे़ किती तास अभ्यास केला, यापेक्षा घेतलेला एखादा टॉपिक व्यवस्थितपणे पूर्ण वाचून त्याचे योग्य आकलन करून घेणे महत्त्वाचे आहे़ सातवी ते दहावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांच्या वाचनाबरोबरच इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, आदी पुस्तकांचे सखोल वाचन हवे़ वाचनादरम्यान आवडते विषय सुरुवातीला घ्यावे़ मुलाखतीदरम्यान येत नसलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे न देता, प्रांजळपणे उत्तरे येत नसल्याचे सांगून गोंधळ टाळावा. राहुल पाटील म्हणाले, स्पर्धा परीक्षा हा करिअरचा चांगला आणि आश्वासक मार्ग आहे़ स्पर्धा परीक्षेत उतरू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येये बाळगली पाहिजेत़ ‘एमपीएससी’ शिवाय ‘यूपीएससी’कडेही वळले पाहिजे़ यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या परीक्षा सोप्या जातात़ या क्षेत्राकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता, समाजसेवेचा एक उत्कृष्ट मार्ग म्हणून पाहिल्यास उज्ज्वल भविष्याची संधी मिळेल़ प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)यावेळी उज्ज्वला भिंगुडे आणि प्रियांका पाटील यांच्या हस्ते ‘लोकमत’तर्फे घेण्यात आलेल्या कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल्स भाग - २ स्पर्धेतील प्रथम क्रमाकांचा विजेता योगेश माळी याचा सत्कार करण्यात आला़ सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख ५००१ असे या सत्काराचे स्वरूप होते़