शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शिरोळ तालुक्यात सत्तेसाठी जुगलबंदी

By admin | Updated: February 12, 2017 23:45 IST

प्रचारात आरोप-प्रत्यारोप : आज माघारीनंतर चित्र स्पष्ट; पालकमंत्री, कृषिमंत्र्यांच्या प्रचार सभा

संदीप बावचे ल्ल जयसिंगपूरशिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. गावोगावी प्रचार फेऱ्या, बैठका, मतदार भेटीला वेग आला आहे. सर्वच उमेदवार तुल्यबळ असल्याने उमेदवारांना गर्दी जमविणे व आपले कार्यकर्ते सांभाळणे आव्हान ठरत आहेत. स्वाभिमानीसह भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेनेकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज, सोमवारी माघारीचा अंतिम एकच दिवस असल्याने मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीचे चौदा गण आहेत. गत निवडणुकीत स्वाभिमानीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व भाजप यांच्यासह छत्रपती ग्रुप, ताराराणी विकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, भाकप, आदींसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला असून, आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या मुलांना जि. प. अध्यक्षपदासाठी उमेदवारी देऊन स्वार्थी राजकारण सुरू केले आहे, तर सामान्य शेतकऱ्यांना स्वाभिमानीने उमेदवारी दिली आहे, असा स्वाभिमानीच्या प्रचारातील मुद्दा आहे. नृसिंहवाडी येथे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारादरम्यान, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजप हे दोन्हीही पक्ष जातीवादी आहेत. त्यांना मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन केले आहे. कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला असून, आणखी विकासकामांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार उल्हास पाटील यांनी प्रचारादरम्यान केले आहे, तर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करण्यासाठी मतदारांनी कमळ फुलवावे, असे आवाहन करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ऊस उत्पादकांना आंदोलनाशिवाय एफआरपी मिळाली. त्यामुळे शिरोळ तालुक्यात भाजपला साथ द्यावी, आणखी विकास घडेल, असा आशावाद पालकमंत्री पाटील यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे. एकूणच शिरोळ तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे तालुका संवेदनशील बनला आहे. वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.