शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शिरोळ तालुक्यात सत्तेसाठी जुगलबंदी

By admin | Updated: February 12, 2017 23:45 IST

प्रचारात आरोप-प्रत्यारोप : आज माघारीनंतर चित्र स्पष्ट; पालकमंत्री, कृषिमंत्र्यांच्या प्रचार सभा

संदीप बावचे ल्ल जयसिंगपूरशिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. गावोगावी प्रचार फेऱ्या, बैठका, मतदार भेटीला वेग आला आहे. सर्वच उमेदवार तुल्यबळ असल्याने उमेदवारांना गर्दी जमविणे व आपले कार्यकर्ते सांभाळणे आव्हान ठरत आहेत. स्वाभिमानीसह भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेनेकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज, सोमवारी माघारीचा अंतिम एकच दिवस असल्याने मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीचे चौदा गण आहेत. गत निवडणुकीत स्वाभिमानीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व भाजप यांच्यासह छत्रपती ग्रुप, ताराराणी विकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, भाकप, आदींसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला असून, आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या मुलांना जि. प. अध्यक्षपदासाठी उमेदवारी देऊन स्वार्थी राजकारण सुरू केले आहे, तर सामान्य शेतकऱ्यांना स्वाभिमानीने उमेदवारी दिली आहे, असा स्वाभिमानीच्या प्रचारातील मुद्दा आहे. नृसिंहवाडी येथे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारादरम्यान, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजप हे दोन्हीही पक्ष जातीवादी आहेत. त्यांना मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन केले आहे. कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला असून, आणखी विकासकामांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार उल्हास पाटील यांनी प्रचारादरम्यान केले आहे, तर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करण्यासाठी मतदारांनी कमळ फुलवावे, असे आवाहन करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ऊस उत्पादकांना आंदोलनाशिवाय एफआरपी मिळाली. त्यामुळे शिरोळ तालुक्यात भाजपला साथ द्यावी, आणखी विकास घडेल, असा आशावाद पालकमंत्री पाटील यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे. एकूणच शिरोळ तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे तालुका संवेदनशील बनला आहे. वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.