शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

न्यायव्यवस्था लोकाभिमुख करण्यास चालना

By admin | Updated: October 4, 2016 00:58 IST

देवानंद शिंदे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकअदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

कोल्हापूर : फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालतमुळे समाजातील तंटे सामंजस्याने सुटण्यास मदत होणार असून, या उपक्रमाच्या माध्यमातून न्यायव्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅन’च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वृक्ष पूजन करून फिरते विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, फिरत्या लोक न्यायालयासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून न्यायव्यवस्था लोकाभिमुख होत आहे, हे अत्यंत स्तुत्य म्हणावे लागेल. भारतीय न्यायव्यवस्था ही बुद्धी व विवेक यांचा जाणीवपूर्वक वापर करणारी जगातील एकमेव न्यायव्यवस्था आहे.डॉ. अमित सैनी म्हणाले, जनतेला न्यायासाठी न्यायालयापर्यंत जावे लागते. यामध्ये वेळ, पैसा व श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्या अनुषंगाने समाजामध्ये तंटे उद्भवू नयेत, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता महात्मा गांधी तंटामुक्तीसारखी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर फिरते विधी सेवा तथा लोकअदालतसारखा उपक्रम जिल्ह्यात सुरू होत आहे, हे स्तुत्य म्हणावे लागेल.प्रदीप देशपांडे म्हणाले, फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालतमुळे या चक्रव्यूहापासून सामान्य व्यक्ती दूर राहण्यास मदत होणार आहे. समाजातील बहुतांश तंटे सामंजस्य व तडजोडीतून सुटण्यास मदत झाली तर कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलिस खात्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी, लोकअदालत ही संकल्पना समाजामध्ये हळूहळू रुजत असल्याचे सांगितले.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी. एम. टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंदे्र, संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ला, आदी उपस्थित होते. यावेळी उमेशचंद्र मोरे यांनी प्रास्ताविक, तर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. एस. व्हनमोरे यांनी स्वागत केले. प्रा. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पक्षकार, विद्यार्थी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सोमवारी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅन’चे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी. एम. टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, आदी उपस्थित होते.