शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

न्यायव्यवस्था लोकाभिमुख करण्यास चालना

By admin | Updated: October 4, 2016 00:58 IST

देवानंद शिंदे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकअदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

कोल्हापूर : फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालतमुळे समाजातील तंटे सामंजस्याने सुटण्यास मदत होणार असून, या उपक्रमाच्या माध्यमातून न्यायव्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅन’च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वृक्ष पूजन करून फिरते विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, फिरत्या लोक न्यायालयासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून न्यायव्यवस्था लोकाभिमुख होत आहे, हे अत्यंत स्तुत्य म्हणावे लागेल. भारतीय न्यायव्यवस्था ही बुद्धी व विवेक यांचा जाणीवपूर्वक वापर करणारी जगातील एकमेव न्यायव्यवस्था आहे.डॉ. अमित सैनी म्हणाले, जनतेला न्यायासाठी न्यायालयापर्यंत जावे लागते. यामध्ये वेळ, पैसा व श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्या अनुषंगाने समाजामध्ये तंटे उद्भवू नयेत, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता महात्मा गांधी तंटामुक्तीसारखी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर फिरते विधी सेवा तथा लोकअदालतसारखा उपक्रम जिल्ह्यात सुरू होत आहे, हे स्तुत्य म्हणावे लागेल.प्रदीप देशपांडे म्हणाले, फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालतमुळे या चक्रव्यूहापासून सामान्य व्यक्ती दूर राहण्यास मदत होणार आहे. समाजातील बहुतांश तंटे सामंजस्य व तडजोडीतून सुटण्यास मदत झाली तर कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलिस खात्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी, लोकअदालत ही संकल्पना समाजामध्ये हळूहळू रुजत असल्याचे सांगितले.याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी. एम. टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंदे्र, संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ला, आदी उपस्थित होते. यावेळी उमेशचंद्र मोरे यांनी प्रास्ताविक, तर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. एस. व्हनमोरे यांनी स्वागत केले. प्रा. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पक्षकार, विद्यार्थी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सोमवारी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅन’चे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी. एम. टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, आदी उपस्थित होते.