शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांनी आव्हानांना सामोरे जावे

By admin | Updated: January 7, 2017 01:11 IST

संपादक परिषदेमधील सूर : शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाचा कार्यक्रम

कोल्हापूर : पत्रकारितेतील संधी साधण्यासह आव्हाने पेलण्यासाठी सखोल अभ्यास आणि पक्की वैचारिक बैठक आवश्यक आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा विस्तार वेगाने होत असून, त्यानुसार सामाजिक बदल होत आहे. हे बदल माध्यमांनी अंगीकारणे आवश्यक आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठातील संपादक परिषदेमध्ये शुक्रवारी व्यक्त झाला.विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभाग, मास कम्युनिकेशन आणि विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकार दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळित, ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, ‘तरुण भारत’चे निवासी संपादक जयसिंग पाटील, ‘बी न्यूज’चे संपादक चारुदत्त जोशी यांनी सहभाग घेतला. अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्रमुख उपस्थित होते. त्यात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, आजची नवी पिढी सजग आणि जगाशी संबंधित असल्याने त्यादृष्टीने माध्यमांनी विषय स्वीकारून आशयसमृद्ध मांडणी केली पाहिजे. प्रत्येक माहितीत नवीन विचार, नवा आशय असायला हवा. पारंपरिक माध्यमांसमोर नवमाध्यमांचे मोठे आव्हान असले, तरी माध्यमांचा हा विस्तार सकारात्मक आहे. हा विस्तार आणखी गतीने होणार असून, त्यात अनेक संधी आणि आव्हाने दडलेली आहेत. या संधी साधण्यासह ती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारितेमध्ये येणाऱ्या युवा पिढीने सखोल अभ्यास, वैचारिक बैठक पक्की करावी. माहिती उपसंचालक सतीश लळित म्हणाले, सध्या देशाला विकास पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर म्हणाले, बदलत्या काळानुसार पत्रकारिता, माहितीचे स्रोत, तंत्रज्ञान बदलले, तरी ज्ञानसंपादनाची गरज कायम राहणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, डॉ. राजेंद्र पारिजात, सुमेधा साळुंखे, श्रीहरी देशपांडे, रावसाहेब पुजारी, चंद्रशेखर वानखेडे, आदी उपस्थित होते. वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. शीतल काळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सकारात्मक पत्रकारिताकोल्हापूरची पत्रकारिता सकारात्मक आहे. येथील पत्रकार हे विचारमंच आहे. त्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण असून, ते सोडविण्याची तळमळ असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, नकारात्मक पत्रकारिता ही अल्पायुषी असते. एक विचार घेऊन पत्रकारिता होणे आवश्यक आहे. पत्रकारितेमधील सकारात्मकता आयुष्यभर जपावी.शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी पत्रकार दिनानिमित्त संपादक परिषद हा कार्यक्रम झाला. यावेळी डावीकडून चारुदत्त जोशी, जयसिंग पाटील, श्रीराम पवार, वसंत भोसले, दशरथ पारेकर, प्रा. डॉ. निशा पवार, वर्षा पाटोळे, आलोक जत्राटकर उपस्थित होते.