शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

दररोज तीनशे लिटर सांडपाणी जमिनीत मुरविणारे जोशी कुटुंब

By admin | Updated: May 26, 2016 01:04 IST

अभिनव उपक्रम : पाणी पातळी वाढण्यास मदत; प्रदूषणावरही उपाय

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर --पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे म्हटले जाते. वाढती लोकसंख्या, शहरीकरण यांच्या पाण्याच्या गरजा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारावर पूर्ण करणे सोेपे नाही. पाणीबचतीसाठी घराघरांमधून निर्माण होणारे सांडपाणी हादेखील एक पर्याय असू शकतो. या सांडपाण्यावर घरामध्ये पुनर्प्रक्रिया करून ते पाणी जमिनीत मुरविता येते, हे सरनोबतवाडी-मणेरमाळ मार्गावर राहणाऱ्या जोशी कुटुंबीयांनी करून दाखविले आहे. जिथे जिथे नागरी वस्त्या होतात तिथे सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविकच असते. अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणाऱ्या, कपडे व भांडी घासून तयार होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या सांडपाण्यावर साधी प्रक्रियाही केली जात नाही. ते जसेच्या तसे नदी-नाल्यांत, ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण वाढण्यास मदत होते. प्रत्येक घरामधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे हे शक्य आहे. असे केल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर थोड्याफार प्रमाणात आपण मात करू शकतो. या गोष्टींचा विचार करून सरनोबतवाडी-मणेरमाळ या मार्गावर राहणारे अवधूत जोशी यांनी आपल्या घरामध्येच सांडपाणी जमिनीत मुरविण्यासाठी अत्यंत अल्प खर्चात उपाययोजना केली आहे. या उपाययोजनेमुळे दररोज सुमारे तीनशे लिटर सांडपाणी जमिनीत मुरविण्यात येते. या उपक्रमामुळे त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.