शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

दररोज तीनशे लिटर सांडपाणी जमिनीत मुरविणारे जोशी कुटुंब

By admin | Updated: May 26, 2016 01:04 IST

अभिनव उपक्रम : पाणी पातळी वाढण्यास मदत; प्रदूषणावरही उपाय

प्रदीप शिंदे -- कोल्हापूर --पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे म्हटले जाते. वाढती लोकसंख्या, शहरीकरण यांच्या पाण्याच्या गरजा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारावर पूर्ण करणे सोेपे नाही. पाणीबचतीसाठी घराघरांमधून निर्माण होणारे सांडपाणी हादेखील एक पर्याय असू शकतो. या सांडपाण्यावर घरामध्ये पुनर्प्रक्रिया करून ते पाणी जमिनीत मुरविता येते, हे सरनोबतवाडी-मणेरमाळ मार्गावर राहणाऱ्या जोशी कुटुंबीयांनी करून दाखविले आहे. जिथे जिथे नागरी वस्त्या होतात तिथे सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविकच असते. अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणाऱ्या, कपडे व भांडी घासून तयार होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या सांडपाण्यावर साधी प्रक्रियाही केली जात नाही. ते जसेच्या तसे नदी-नाल्यांत, ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण वाढण्यास मदत होते. प्रत्येक घरामधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे हे शक्य आहे. असे केल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर थोड्याफार प्रमाणात आपण मात करू शकतो. या गोष्टींचा विचार करून सरनोबतवाडी-मणेरमाळ या मार्गावर राहणारे अवधूत जोशी यांनी आपल्या घरामध्येच सांडपाणी जमिनीत मुरविण्यासाठी अत्यंत अल्प खर्चात उपाययोजना केली आहे. या उपाययोजनेमुळे दररोज सुमारे तीनशे लिटर सांडपाणी जमिनीत मुरविण्यात येते. या उपक्रमामुळे त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.