शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा

By admin | Updated: January 12, 2015 00:37 IST

पन्नालाल सुराणा : 'भविष्यातील राष्ट्रसेवादल व परिवर्तनाची लढाई' विषयावर परिसंवाद

कोल्हापूर : दुबळ्यांचे आर्थिक बळ वाढत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने परिवर्तन होणार नाही. त्यामुळे या लढाईत प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी आज, शनिवारी येथे केले.भरत लाटकर गौरव समारंभानिमित्त मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे 'भविष्यातील राष्ट्रसेवादल व परिवर्तनाची लढाई' या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य होते.पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते राष्ट्रसेवा दलाचा ध्वज लावून परिसंवादाचे उद्घाटन झाले. यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, बाबासाहेब नदाफ, भरत लाटकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सुराणा म्हणाले, परिवर्तन सत्तेच्या मार्गाने ज्यांना करायचे आहे त्यांना करू देत, परंतु आपण सेवादलाच्या माध्यमातून शिस्तीच्या चौकटीत राहून ते करायचे आहे. आपला हा विचार बहुजन समाजासाठी आहे. दलित व वंचितांना समाजात बरोबरीने स्थान मिळवून देण्याची जबाबदारी राष्ट्रसेवा दलावर आहे. भांडवलशाहीचे विदारक परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. या विरोधात सर्वच राष्ट्रात चळवळ सुरू आहे. संपत्तीचे केंद्रीकरण व भांडवलदारांचा मदमस्तपणा या विरोधात सेवादलाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याचा तर्कशास्त्र पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. ते पुढे म्हणाले, सामाजिक विषमतेला सुरूंग लावायचा असल्यास दलितांना व वंचितांना आर्थिक सक्षम बनविले पाहिजे. यासाठी संघटना बांधण्याचे काम हाती घेतले पाहिजे. दलाच्या पाईकांनी कंबर कसून याद्वारे घराघरांत जाऊन प्रत्येकाला या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी करून घेतले पाहिजे.तांबोळी म्हणाले, हिंदुत्ववादी व ‘एमआयएम’ यांंच्यासारख्या सडलेल्या मेंदूतून येणाऱ्या भाषेमुळे सामाजिक अशांतता माजत आहे. अलीकडच्या काळात अशा घटना अनेक घडत असून त्याची यादी वाढत आहे. तीनवेळा बंदी घातलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यातच आता देशाची सत्ता आली आहे. अलीकडच्या पिढीत अराजक व धर्मांधपणा आला आहे. तो उखडून टाकण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज आहे. डॉ. वैद्य म्हणाले, देशात सध्या भगव्या करमणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘कॉमेडी शो’प्रमाणे दररोज मोदी सरकारमधील मंत्र्यांकडून विनोद केले जात आहेत. भगवत्गीतेला देशाचा राष्ट्रीय ग्रंथ करण्याची भाषा होऊ लागली आहे, परंतु ही क्षमता फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमध्येच आहे. या घटनेची तुलना कुठल्याही धार्मिक ग्रंथाशी होऊ शकत नसल्याचे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.यावेळी शिवाजीराव परूळेकर, हुसेन जमादार, मनोहर नवनाळे, अशोक शेवडे यांच्यासह राष्ट्रसेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेब नदाफ यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत मुद्दापुरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)