शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वारणानगर रोकड चोरी प्रकरणी झुुंजार सरनोबत यांच्यावरही खटले

By admin | Updated: May 11, 2017 18:26 IST

घनवटसह कांबळेच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ११ : कोल्हापूर जिल्हयातील वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणी फिर्याद दाखल केलेले बांधकाम व्यावसायिक झुंजार सरनोबत यांच्यावर दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे २० प्रलंबित व निकाली न्यायालयात खटले दाखल असल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील व सातारा येथील अ‍ॅड.आर.के.धायगुडे यांनी गुरुवारी केला.जिल्हा न्यायालयातील तदर्थ जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन एस.एम.कोचे यांच्या न्यायालयात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट व कॉन्स्टेबल कुलदीप कांबळे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुमारे दोन तास अशंत: सुनावणी झाली. याची पुढील सुनावणी सोमवारी (दि. १५) होणार आहे.संशयित आरोपी घनवट व कांबळे यांच्यावतीने सातारा येथील अ‍ॅड. आर.के.धायगुडे यांनी युक्तिवाद केला. यावेळी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल उपस्थित होते. वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील खोलीमधील चोरी प्रकरणी पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्यासह सात जणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी संशयित घनवट व कुलदीप कांबळे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. यापुर्वी या प्रकरणातीलचार पोलिसांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यावेळी अ‍ॅड. आर. के. धायगुडे यांनी, वारणानगर चोरीतील फिर्यादी झुंजार सरनोबत यांच्याविरोधातत दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे सुमारे २० न्यायालयीन प्रकरणे (खटले) आहेत. त्यामुळे त्यांना कायद्याची चांगली जाण आहे. या शिक्षक कॉलनीत त्यांनी ठेवलेले पैसे हे सशंयास्पद आहे. या खोलीशेजारी एका संस्थेची रेकॉर्ड रुम आहे. त्यांचा हा केवळ दिखावा आहे. ते तपास यंत्रणेची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा प्राप्तिकर ५० लाख रुपये प्राप्तिकर विभागाला भरणा केला आहे. त्यांनी जमीन खरेदीचा बनाव केला आहे. तसेच सुमारे १४ कोटी रुपयांच्या रक्कमेचा कोणताही पुरावा त्यांनी दिलेला नाही. प्राप्तिकर विभागाला त्यांनी ३ ते ४ कोटी रुपयांचा खुलासा केला आहे व तेवढ्याच रकमेचा आयकर भरला आहे. तसेच कोडोली पोलिसांनी केलेले चार्जशीट (दोषारोपपत्र) मध्ये जप्त केलेल्या रकमेचा व ही रक्कम कोठून आली याचा खुलासा नाही आहे. याचा तपास तत्कालीन शाहूवाडी पोलिस विभागाचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक विकास जाधव यांनी केला. सरनोबत यांचे नातेवाईक,नातेवाईकांचा मुलगा यांचा जबाब नोंदविला आहे. सुमारे चार कोटी ६४ लाख रुपये रक्कम जप्त केल्याचा उल्लेख दोषारोपपत्रात केला आहे.या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याचा मित्र विनायक जाधव याच्याकडून ६९ लाख रुपये घेऊन त्यातील ६८ लाख रुपये मैनुद्दीनने स्वत: जवळ ठेवून तो पसार झाला. ३१ मे २०१६ ला सरनोबत यांचा पुरवणी जबाब झाला. सरनोबत यांनी ही रक्कम परत मिळण्यासाठी पन्हाळा न्यायालयात अर्ज केला होता. तेव्हा संशयित आरोपी मैनुद्दीन मुल्ला याने ही रक्कम सरनोबत यांची नाही आहे. ही रक्कम मुंबई येथील गुन्ह्यातील आहे.त्याच्यावर मुंबईतील सात कोटी रुपयांचा आरोप आहे. तसेच मिरज बेथलहेमनगर येथे सापडलेली मैनुद्दीन मुल्लाच्या मेहूणीच्या घरात सापडलेली सुमारे तीन कोटी रुपयांची रक्कम ही चिकोडी येथील कॉलेज समोरुन लावलेल्या एका कारमधून त्याचा मित्र रेहान अन्सारी या दोघांनी चोरीस केली होती. यावरुन सरनोबत हे पोलिस , प्राप्तिकर विभाग यांची दिशाभूल करीत असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड.आर.के.धायगुडे यांनी केला. धायगुडे यांना अ‍ॅड. अजित सावंत यांनी सहकार्य केले.