शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

तात्यांच्या निवडीत जयंतरावांची खेळी

By admin | Updated: May 21, 2015 00:03 IST

जिल्हा बॅँक अध्यक्ष निवड : इस्लामपूरच्या राजकारणाची झालर

अशोक पाटील - इस्लामपूर-स्वत:च्या इस्लामपूर मतदारसंघातील ताकद वाढविण्यासाठी दिलीपतात्या पाटील यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देऊन माजी मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय खेळी खेळली आहे. भविष्यातील राजकीय धोके संपवण्यासाठीच त्यांनी हे पाऊल टाकले आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. मात्र इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांनी बालेकिल्ला अबाधित ठेवला. या मतदार संघावरील पकड मजबूत करण्यासाठी पाटील यांनी वाळवा जिल्हा परिषद मतदार संघातील दिलीपतात्यांना बँकेवर संधी दिली आहे. यामागे दिलीपतात्यांचे वाळव्यातील विरोधक वैभव नायकवडी यांची ताकद कमी करण्याचाही डाव आहे.वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच गावांचा संपर्क आष्टा शहराशी आहे. आष्टा शहर इस्लामपूर मतदारसंघातील मोठे मतदान असणारे गाव आहे. या शहरात माजी आमदार विलासराव शिंदे यांच्यासह दिलीपतात्यांच्या गटाची ताकद आहे. दिलीपतात्या हे राजारामबापू पाटील यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. त्यांचा उल्लेख जयंत पाटील यांचे थोरले बंधू म्हणूनच केला जातो. त्यामुळे विश्वासू व निष्ठावान असलेल्या दिलीपतात्यांना बँकेवर संधी देऊन, विलासराव शिंदे आणि वैभव नायकवडी या गटांना शह देण्याची खेळी खेळली आहे.प्रारंभीच्या टप्प्यात शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती, परंतु राज्य सहकारी बँकेवर त्यांना संधी मिळू देण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिले नसावे, असे सांगितले जाते. माजी अध्यक्ष बी. के. पाटील यांचे गाव कोरेगाव आहे. या गावात आर. के. पाटील आणि बी. के. पाटील यांचे स्वतंत्र गट कार्यरत आहेत. बी. के. पाटील यांना संधी दिली असती, तर दुसरा गट नाराज झाला असता. याचाही विचार जयंत पाटील यांनी केला असावा. शिकंदर जमादार हे मदन पाटील यांचे कट्टर समर्थक असून ते डिग्रजचे असल्याने त्यांचेही नाव आघाडीवर होते. परंतु भविष्यातील राजकारणात मदन पाटील यांच्या भूमिकेविषयी साशंकता असल्याने जमादार यांचाही पत्ता कटला आहे.राजारामबापू पाटील यांचे मानसपुत्र असलेले दिलीपतात्या हे जयंत पाटील यांचे निष्ठावान समजले जातात. जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीतील आक्रमक प्रचारक म्हणून त्यांची ख्याती आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्यावर दिलेली वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. तोट्यात गेलेल्या सूतगिरण्या फायद्यात आणून त्यांनी कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या अध्यक्षपद निवडीला कोणीही विरोध करणार नाही, हे ओळखून जयंत पाटील यांनी त्यांना संधी दिली आहे.या माध्यमातून जयंत पाटील यांनी मतदारसंघावरील पकड मजबूत करण्याचा हेतू स्पष्ट होत आहे.निष्ठा आणि आक्रमकताराजारामबापू पाटील यांचे मानसपुत्र असलेले दिलीपतात्या हे जयंत पाटील यांचे निष्ठावान समजले जातात. जयंत पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीतील आक्रमक प्रचारक म्हणून त्यांची ख्याती आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्यावर दिलेली वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. तोट्यात गेलेल्या सूतगिरण्या फायद्यात आणून त्यांनी कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या अध्यक्षपद निवडीला कोणीही विरोध करणार नाही, हे ओळखून जयंत पाटील यांनी त्यांना संधी दिली आहे.