शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

जय सामंत यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार

By admin | Updated: September 17, 2014 00:07 IST

स्वातंत्र्यसैनिक दत्ता शिंदे यांच्या हस्ते वितरण-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव :

  कोल्हापूर : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत दिला जाणारा वसुंधरा सन्मान हा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जय सामंत यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. १८) ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे कार्यकारी संचालक आर. आर. देशपांडे असतील. उद्घाटन समारंभानंतर आरती कुलकर्णी निर्मित ‘नाते पश्चिम घाटाचे’ व संदेश कडूर यांच्या ‘नॅशनल अँथम’ या लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. महोत्सवाचा समारोप २१ तारखेला सायंकाळी पाच वाजता होणार असून, यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी दत्ता शिंदे यांच्या हस्ते डॉ. जय सामंत यांना वसुंधरा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येईल. डॉ. जय सामंत यांनी प्राणिशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी व पुढे पीएच. डी. पूर्ण केली. मुंबई व शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून काम करण्याबरोबरच ते बीएनएचएससारख्या संस्थेचे संचालकही झाले. आपल्या पर्यावरणविषयक कामातून ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सातत्याने जोडले गेले. तसेच १९९२ ला झालेल्या रिओ, ब्राझील येथील वसुंधरा परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. केंद्र व राज्य शासनाच्या पर्यावरणविषयक समित्यांवर ते कार्यरत राहिले. पश्चिम घाट बचाव यात्रा, सायलेंट व्हॅली अशा उपक्रमांचे संयोजनही त्यांनी केले आहे. त्यांनी पन्नासहून अधिक संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, अनेक संशोधन निबंध, लेख लिहिले आहेत. पत्रकार परिषदेस कृष्णा गावडे, संजय बाबर, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) सेवानिवृत्तीनंतर प्रा. जय सामंत हे देवराई या संस्थेच्या माध्यमातून आजही कार्यरत आहेत. त्यांनी पर्यावरण क्षेत्रात दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांना हा गौरव प्रदान करण्यात येणार आहे.