शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

‘एफआरपी’ देण्यात ‘जवाहर’ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:49 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी फेबु्रवारीअखेर गाळप झालेल्या उसाची ७५ टक्के एफआरपीची ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी फेबु्रवारीअखेर गाळप झालेल्या उसाची ७५ टक्के एफआरपीची रक्कम आदा केली आहे. यामध्ये पूर्ण एफआरपी देण्याबरोबरच गाळप उसाच्या पैशापैकी तब्बल ९३ टक्के पैसे आदा करत, हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना राज्यात आघाडीवर राहिला आहे. ‘वारणा’ कारखाना मात्र सर्वांत मागे असून, १८४ कोटी एफआरपी थकीत आहे.राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर विभागातील १७ कारखान्यांचा हंगाम संपला असून, येत्या आठ-१0 दिवसांत उर्वरित कारखाने बंद होतील. यंदाच्या हंगामात साखरेच्या दरातील घसरणीने एफआरपीचा पेच निर्माण झाला होता. एकरकमी एफआरपीच्या मुद्यावरून शेतकरी संघटना व कारखानदारांमध्ये संघर्ष झाला. बॅँकांकडून पैसे उपलब्ध होतील, तसे कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले जात आहेत. फेबु्रवारीअखेर कोल्हापूर विभागात एक कोटी ८८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाची चार हजार ८९९ कोटी २६ लाख एफआरपीची रक्कम होते. फेबु्रवारीअखेर यातील तीन हजार ६६० कोटी ९७ लाख रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना आदा केलेले आहेत. अद्याप १२३८ कोटी २९ लाख रुपये देय एफआरपी आहे.विभागातील कारखान्यांचा विचार करायचा झाल्यास चार कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी एफआरपी दोन टप्प्यांत आदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील कारखान्यांनी प्रतिटन सरासरी २३०० रुपये, तर सांगलीतील कारखान्यांनी सरासरी २४०० रुपयांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे; पण कोल्हापुरातील जवाहर व पंचगंगा कारखान्यांनी अनुक्रमे २९०६ व २९६६ रुपये, तरसांगलीतील ‘वसंतदादा’ने २७१७ रुपये व विश्वासराव नाईकने २८२३ रुपये प्रमाणे पैसे आदा केले आहेत. पहिल्या उचलीनुसार फेबु्रवारीअखेर सर्वाधिक पैसे ‘जवाहर’ व ‘निनाईदेवी’ कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. गाळप उसाच्या एकूण एफआरपीपैकी ‘जवाहर’ने ९३ टक्के तर निनाईदेवीने ९४ टक्के पैसे आदा केले आहेत. ‘भोगावती’ने ५६ टक्के, ‘इको केन’ने ५८ टक्के, ‘महाकाली’ने ५३ टक्के ‘सोनहिरा’ने ५७ टक्के पैसे दिले आहेत. तर सर्वांत कमी ‘वारणा’ कारखान्याने एफआरपीतील केवळ २२ टक्के दिले असून, फेबु्रवारीअखेर तब्बल १८४ कोटी रुपये थकीत आहेत.कारवाईच्या नोटिसा उद्या शक्यज्या कारखान्यांनी गाळप उसाच्या होणाºया एफआरपीपैकी किमान ६० टक्के आदाकेलेली नाही.त्या कारखान्यांवर कारवाई करण्याचीशिफारस प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने आयुक्तांकडे केली आहे.उद्या, बुधवारपर्यंत कारवाईच्या नोटिसालागू होण्याची शक्यता आहे.