शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

‘एफआरपी’ देण्यात ‘जवाहर’ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:49 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी फेबु्रवारीअखेर गाळप झालेल्या उसाची ७५ टक्के एफआरपीची ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी फेबु्रवारीअखेर गाळप झालेल्या उसाची ७५ टक्के एफआरपीची रक्कम आदा केली आहे. यामध्ये पूर्ण एफआरपी देण्याबरोबरच गाळप उसाच्या पैशापैकी तब्बल ९३ टक्के पैसे आदा करत, हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना राज्यात आघाडीवर राहिला आहे. ‘वारणा’ कारखाना मात्र सर्वांत मागे असून, १८४ कोटी एफआरपी थकीत आहे.राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर विभागातील १७ कारखान्यांचा हंगाम संपला असून, येत्या आठ-१0 दिवसांत उर्वरित कारखाने बंद होतील. यंदाच्या हंगामात साखरेच्या दरातील घसरणीने एफआरपीचा पेच निर्माण झाला होता. एकरकमी एफआरपीच्या मुद्यावरून शेतकरी संघटना व कारखानदारांमध्ये संघर्ष झाला. बॅँकांकडून पैसे उपलब्ध होतील, तसे कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले जात आहेत. फेबु्रवारीअखेर कोल्हापूर विभागात एक कोटी ८८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाची चार हजार ८९९ कोटी २६ लाख एफआरपीची रक्कम होते. फेबु्रवारीअखेर यातील तीन हजार ६६० कोटी ९७ लाख रुपये कारखान्यांनी शेतकऱ्यांना आदा केलेले आहेत. अद्याप १२३८ कोटी २९ लाख रुपये देय एफआरपी आहे.विभागातील कारखान्यांचा विचार करायचा झाल्यास चार कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी एफआरपी दोन टप्प्यांत आदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील कारखान्यांनी प्रतिटन सरासरी २३०० रुपये, तर सांगलीतील कारखान्यांनी सरासरी २४०० रुपयांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे; पण कोल्हापुरातील जवाहर व पंचगंगा कारखान्यांनी अनुक्रमे २९०६ व २९६६ रुपये, तरसांगलीतील ‘वसंतदादा’ने २७१७ रुपये व विश्वासराव नाईकने २८२३ रुपये प्रमाणे पैसे आदा केले आहेत. पहिल्या उचलीनुसार फेबु्रवारीअखेर सर्वाधिक पैसे ‘जवाहर’ व ‘निनाईदेवी’ कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. गाळप उसाच्या एकूण एफआरपीपैकी ‘जवाहर’ने ९३ टक्के तर निनाईदेवीने ९४ टक्के पैसे आदा केले आहेत. ‘भोगावती’ने ५६ टक्के, ‘इको केन’ने ५८ टक्के, ‘महाकाली’ने ५३ टक्के ‘सोनहिरा’ने ५७ टक्के पैसे दिले आहेत. तर सर्वांत कमी ‘वारणा’ कारखान्याने एफआरपीतील केवळ २२ टक्के दिले असून, फेबु्रवारीअखेर तब्बल १८४ कोटी रुपये थकीत आहेत.कारवाईच्या नोटिसा उद्या शक्यज्या कारखान्यांनी गाळप उसाच्या होणाºया एफआरपीपैकी किमान ६० टक्के आदाकेलेली नाही.त्या कारखान्यांवर कारवाई करण्याचीशिफारस प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने आयुक्तांकडे केली आहे.उद्या, बुधवारपर्यंत कारवाईच्या नोटिसालागू होण्याची शक्यता आहे.