शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

परिवर्तनवादी संघटनांतर्फे गुरुवारी जातिअंत परिषद

By admin | Updated: March 17, 2015 00:11 IST

चळवळीत इकडे आणि सत्तेत तिकडे, चालणार नाही

कोल्हापूर : महाराष्ट्रातील वाढत्या जातीय आणि सामाजिक अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी डाव्या परिवर्तनवादी आणि आंबेडकरवादी पक्ष संघटनांतर्फे सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जाती मुक्ती आंदोलनाची स्थापना करण्यात आली आहे. या आंदोलनातर्फे कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग येथे गुरुवारी (दि. १९) जातिअंत परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटणकर म्हणाले, महाराष्ट्रात खैरलांजी, खर्डा, सोनई यासारख्या जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. आजही आंतरजातीय विवाहाला प्रचंड विरोध होत आहे. जातिव्यवस्थेमुळे होणारे शोषण मान्य होण्यासारखे नाही. त्यामुळे सामाजिक अत्याचाराच्या घटनांना पायबंद बसावा आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना संरक्षण मिळण्यासाठी संरक्षण केंद्रे निर्माण करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत जातिअंत चळवळीचे मुख्य निमंत्रक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, अरविंद देशमुख, प्रतिमा परदेशी, आदी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील डाव्या परिवर्तनवादी आणि आंबडेकरवादी चळवळीतील सुमारे सोळा संघटना सहभागी होत आहेत. यापूर्वी लातूर, नागपूर येथे ही परिषद घेण्यात आली आहे. या परिषदांमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना वडिलांच्या जातीचा उल्लेख करता येणार नाही, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या मुलांना जात लावली जाऊ नये, असा कायदा शासनाने करावा, असे ठराव मांडण्यात आले आहेत, अशी माहितीही पाटणकर यांनी दिली.या पत्रकार परिषदेस लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे, गौतमीपुत्र कांबळे, अनिल म्हमाणे, सुरेखा कांबळे, शिवाजी शिंदे, दिगंबर सकट, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )चळवळीत इकडे आणि सत्तेत तिकडे, चालणार नाहीपरिवर्तनवादी चळवळीत काम करायचे आणि सत्तेसाठी प्रतिगाम्यांसोबत जायचे, अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना या चळवळीत प्रवेश दिला जाणार नाही, असा सूरही या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. आर्थिक, सामाजिक, राजकीय, उत्पादन क्षेत्रातही जातिअंतासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा निर्धार जातिअंत परिषद करणार असल्याचे अतुल दिघे यांनी सांगितले.