शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

कुरुंदवाड-शिरढोण पुलाला जलपर्णी तटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:16 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णी अद्याप कुरुंदवाड पुलाला तुंबलेलीच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने जलपर्णी काढण्याचा ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्रातील जलपर्णी अद्याप कुरुंदवाड पुलाला तुंबलेलीच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. त्यामुळे जलपर्णी हटवायची कशी, असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला असून, पुलाला धोका निर्माण झाला आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणामुळे जलपर्णीचे संकट निर्माण होते. हिवाळ्यात तयार होऊन जलपर्णी उन्हाळ्यात संपूर्ण नदीपात्राला व्यापून टाकते.

पावसाळ्यातील पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्यानंतर नदीला जलपर्णीपासून मुक्ती मिळते. यंदा मान्सूनने सुरुवातीलाच झोडपून काढल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली. पाण्याबरोबर कोल्हापूरपासून पात्रात वाढलेली जलपर्णी वाहून गेली. मात्र वाहत आलेली जलपर्णी कुरुंदवाड पुलाला तटल्याने पुलापासून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत सात ते आठ फूट उंचीचा जलपर्णीचा थर रचला आहे. पाण्याचा प्रवाह आणि जलपर्णीचा दाब यामुळे या परिसरातील लोखंडी विद्युत पोलही भुईसपाट झाले आहेत. त्यामुळे पुलालाही धोका निर्माण झाल्याने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी शनिवारी पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन जेसीबी मशीनच्या साहाय्याने जलपर्णी हटविण्याची मोहीम राबविली. मात्र सात ते आठ फूट जाडीची घट्ट विणलेली जलपर्णी जेसीबी मशीनलाही काढणे शक्य झाली नाही. त्यामुळे ती हटविण्याची मोहीम थांबविण्यात आली आहे. पुलाचे संरक्षित कठडे तोडून काढल्याने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. मात्र जलपर्णी आणि पाण्याचा प्रवाह पुलाला प्रचंड दाब देत असून, पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलपर्णी हटविणे गरजेचे आहे.

फोटो - २१०६२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - पंचगंगा नदीवरील कुरुंदवाड-शिरढोण पुलाला जलपर्णी तटली आहे.