शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

जिल्ह्यात ६९ गावांत ‘जलयुक्त शिवार अभियान’

By admin | Updated: November 9, 2015 00:31 IST

पालकमंत्री : ‘कोल्हापूर पर्यटन हब’ बनवण्यासाठी आराखड्यावर काम

कोल्हापूर : राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवून लोकसहभागातून केवळ १४०० कोटी रुपयांत २४.५९ टी. एम. सी. जलसाठा निर्माण करून सहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. या योजनेत जिल्ह्यातील ६९ गावे निवडण्यात आली आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती देताना वर्षभरात राबविलेल्या विविध योजना व घेण्यात आलेल्या लोकाभिमुख निर्णयांचे विवेचन पालकमंत्र्यांनी केले.पालकमंत्री पाटील म्हणाले, पहिल्याच वर्षात राज्यातील ६ हजार १८० गावांत १ लाख २० हजार कामे हाती घेऊन लोकसहभागासह केवळ १४०० कोटी रुपयांत २४.५९ टी. एम. सी. जलसाठा निर्माण करून सहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर जिल्हा नियोजनाच्या वार्षिक आराखड्यात भरीव वाढीसह २२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी साडेसहा कोटी रुपये व अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी ९३ कोटी ५४ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिवडाव-सोनवडे घाटरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. नाबार्ड योजनेंतर्गत १५ कोटी अर्थसंकल्पीय तरतूद २७.५० कोटी, तर ‘सीआरएफ’च्या माध्यमातून मोठ्या पुलांसाठी ४९ कोटींचा भरीव निधी दिला आहे. ‘पर्यटन हब’ म्हणून कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी महालक्ष्मी व ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र यांचे विकास आराखडे तयार केले जात आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जलयुक्त शिवारसाठी निवडलेली गावे ही सरकारच्या निकषांनुसारच निवडली आहेत. एखादे गाव लोकसहभागातून स्वत:हून पुढे येत असेल तर त्यांचा समावेश यामध्ये केला जाईल. तसेच कृषी पर्यटनांतर्गत ऊस उत्पादक वाढ, मध संवर्धन व मत्स्य व्यवसाय हे तीन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. गरज पडल्यास धरणांच्या पाण्यावर आरक्षणसध्या जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या भेडसावत नाही. तरीही चिकोत्रा धरणक्षेत्रातील पाणी हे आरक्षित केले आहे. पिण्यासाठी व त्यानंतर शेतीसाठी हे पाणी राहणार आहे. गरज पडल्यास इतर धरणांतील पाण्यावरही असेच आरक्षण ठेवले जाईल, असे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सांगितले.टोलप्रश्नी दिवाळी पाडव्याला बैठकटोल प्रश्नावर चर्चा करण्यासाठी टोलविरोधी कृती समितीला गुरुवारी (दि. १२) दिवाळी पाडव्यादिवशी निमंत्रित केले जाणार आहे. दुपारी चारच्या सुमारास त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना १ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत टोल राहणार नाही, याची हमी देऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.