शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जिल्ह्यात ६९ गावांत ‘जलयुक्त शिवार अभियान’

By admin | Updated: November 9, 2015 00:31 IST

पालकमंत्री : ‘कोल्हापूर पर्यटन हब’ बनवण्यासाठी आराखड्यावर काम

कोल्हापूर : राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवून लोकसहभागातून केवळ १४०० कोटी रुपयांत २४.५९ टी. एम. सी. जलसाठा निर्माण करून सहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणले आहे. या योजनेत जिल्ह्यातील ६९ गावे निवडण्यात आली आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्य शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती देताना वर्षभरात राबविलेल्या विविध योजना व घेण्यात आलेल्या लोकाभिमुख निर्णयांचे विवेचन पालकमंत्र्यांनी केले.पालकमंत्री पाटील म्हणाले, पहिल्याच वर्षात राज्यातील ६ हजार १८० गावांत १ लाख २० हजार कामे हाती घेऊन लोकसहभागासह केवळ १४०० कोटी रुपयांत २४.५९ टी. एम. सी. जलसाठा निर्माण करून सहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर जिल्हा नियोजनाच्या वार्षिक आराखड्यात भरीव वाढीसह २२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी साडेसहा कोटी रुपये व अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी ९३ कोटी ५४ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिवडाव-सोनवडे घाटरस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. नाबार्ड योजनेंतर्गत १५ कोटी अर्थसंकल्पीय तरतूद २७.५० कोटी, तर ‘सीआरएफ’च्या माध्यमातून मोठ्या पुलांसाठी ४९ कोटींचा भरीव निधी दिला आहे. ‘पर्यटन हब’ म्हणून कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी महालक्ष्मी व ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र यांचे विकास आराखडे तयार केले जात आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जलयुक्त शिवारसाठी निवडलेली गावे ही सरकारच्या निकषांनुसारच निवडली आहेत. एखादे गाव लोकसहभागातून स्वत:हून पुढे येत असेल तर त्यांचा समावेश यामध्ये केला जाईल. तसेच कृषी पर्यटनांतर्गत ऊस उत्पादक वाढ, मध संवर्धन व मत्स्य व्यवसाय हे तीन कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. गरज पडल्यास धरणांच्या पाण्यावर आरक्षणसध्या जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या भेडसावत नाही. तरीही चिकोत्रा धरणक्षेत्रातील पाणी हे आरक्षित केले आहे. पिण्यासाठी व त्यानंतर शेतीसाठी हे पाणी राहणार आहे. गरज पडल्यास इतर धरणांतील पाण्यावरही असेच आरक्षण ठेवले जाईल, असे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी सांगितले.टोलप्रश्नी दिवाळी पाडव्याला बैठकटोल प्रश्नावर चर्चा करण्यासाठी टोलविरोधी कृती समितीला गुरुवारी (दि. १२) दिवाळी पाडव्यादिवशी निमंत्रित केले जाणार आहे. दुपारी चारच्या सुमारास त्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना १ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत टोल राहणार नाही, याची हमी देऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.