शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जयसिंगपूर शहराला अवजड वाहनांचा भार

By admin | Updated: December 3, 2015 23:49 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : पर्यायी मार्ग असूनही शहरातून वाहतूक

संतोष बामणे--जयसिंगपूर -शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांची मोठी डोकेदुखी वाढली असून, या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अवजड वाहतुकीबाबत पालिका व पोलीस प्रशासन या दोन्ही यंत्रणेने कानावर हात ठेवले आहेत. सांगली-कोल्हापूर महामार्गाला पर्यायी बायपास रस्ता असतानाही शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातून अवजड वाहनांना बंदी केलेली असताना सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. शहरातील मुख्य सांगली-कोल्हापूर मार्ग अपुरा असून ओव्हरलोड वाहनांची ये-जा सातत्याने होत असते. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. अशा वाहनांमुळे नेहमी छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. सांगली-कोल्हापूर मार्गावरून अवजड वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून चौंडेश्वरी फाटा केपीटीवरून उदगाव, असा मार्ग दिलेला असतानाही अवजड वाहने व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची शहरातूनच वाहतूक कशी होते, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.शहरात सांगली-कोल्हापूर महामार्गालगतच बसस्थानक असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जयसिंगपूर बसस्थानकातून सुमारे दररोज १६००हून अधिक बसेस ये-जा करीत असतात. तसेच शिरोळ तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून जयसिंगपूरची ओळख आहे. त्यामुळे परिसरातील २० ते २५ गावांतील नागरिकांची वर्दळ या ठिकाणी असल्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. यातच सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तसेच शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीला धोका निर्माण होत आहे. अवजड वाहनांना पर्यायी मार्गावरून वाहतूक सक्ती केली असूनही शहरातूनच अवजड वाहनांची वाहतूक सर्रास होत असल्यामुळे अशा वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात अवजड वाहनांना मज्जाव केल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. यासाठी स्थानिक पोलीस व पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.वाहनचालकांना पोलिसांनी शिस्त लावण्याची गरज आहे. चारचाकी वाहने रस्त्याजवळ कोठेही उभी केली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. बेशिस्त पार्किंगमुळे दोन वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंगही उद्भवतात. पोलिसांकडून थातूर-मातूर कारवाई होत असल्यामुळे पुन्हा ‘जैसे थै’ परिस्थिती निर्माण होते. यावर सक्त कारवाईची गरज आहे.