शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर शहराला अवजड वाहनांचा भार

By admin | Updated: December 3, 2015 23:49 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : पर्यायी मार्ग असूनही शहरातून वाहतूक

संतोष बामणे--जयसिंगपूर -शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांची मोठी डोकेदुखी वाढली असून, या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. अवजड वाहतुकीबाबत पालिका व पोलीस प्रशासन या दोन्ही यंत्रणेने कानावर हात ठेवले आहेत. सांगली-कोल्हापूर महामार्गाला पर्यायी बायपास रस्ता असतानाही शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातून अवजड वाहनांना बंदी केलेली असताना सर्रासपणे अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. शहरातील मुख्य सांगली-कोल्हापूर मार्ग अपुरा असून ओव्हरलोड वाहनांची ये-जा सातत्याने होत असते. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. अशा वाहनांमुळे नेहमी छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. सांगली-कोल्हापूर मार्गावरून अवजड वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून चौंडेश्वरी फाटा केपीटीवरून उदगाव, असा मार्ग दिलेला असतानाही अवजड वाहने व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची शहरातूनच वाहतूक कशी होते, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.शहरात सांगली-कोल्हापूर महामार्गालगतच बसस्थानक असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जयसिंगपूर बसस्थानकातून सुमारे दररोज १६००हून अधिक बसेस ये-जा करीत असतात. तसेच शिरोळ तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून जयसिंगपूरची ओळख आहे. त्यामुळे परिसरातील २० ते २५ गावांतील नागरिकांची वर्दळ या ठिकाणी असल्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. यातच सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तसेच शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीला धोका निर्माण होत आहे. अवजड वाहनांना पर्यायी मार्गावरून वाहतूक सक्ती केली असूनही शहरातूनच अवजड वाहनांची वाहतूक सर्रास होत असल्यामुळे अशा वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात अवजड वाहनांना मज्जाव केल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे. यासाठी स्थानिक पोलीस व पालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.वाहनचालकांना पोलिसांनी शिस्त लावण्याची गरज आहे. चारचाकी वाहने रस्त्याजवळ कोठेही उभी केली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. बेशिस्त पार्किंगमुळे दोन वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंगही उद्भवतात. पोलिसांकडून थातूर-मातूर कारवाई होत असल्यामुळे पुन्हा ‘जैसे थै’ परिस्थिती निर्माण होते. यावर सक्त कारवाईची गरज आहे.